शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांकडून घटनेचा अनादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:40 IST

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपच्या येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देऊन घटनेचा अनादर केला आहे.

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपच्या येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देऊन घटनेचा अनादर केला आहे. मुळात येदियुरप्पा यांच्या पक्षाला बहुमत नाही. उलट काँग्रेस आणि जेडी (एस) यांच्या आघाडीजवळ ते आहे. या आघाडीने कुमारस्वामी यांची नेतेपदी निवड करून त्यांना मुख्यमंत्रिपद द्यावे अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. याउलट येदियुरप्पा यांचा दावा त्यांचा पक्ष विधानसभेत पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे हा आहे. घटना पक्ष मानत नाही. घटनेचे स्वरूप पक्षनिरपेक्ष आहे. घटनेला बहुमत समजते. त्याचाच आदर राष्ट्रपती वा राज्यपाल यांनी अशाप्रसंगी केला पाहिजे अशा तिच्या अपेक्षाच नव्हे तर अटीही आहे. असे असताना स्पष्ट बहुमत असणाऱ्या आघाडीकडे दुर्लक्ष करून वजूभार्इंनी अल्पमतात असलेल्या येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपद देऊ केले असेल तर तो त्यांनी घटनेचा केलेला अपमान आहे हे स्पष्टपणे त्यांनाही सांगितलेच पाहिजे. वजूभाई वाला हे गुजरातमधील भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते मोदींच्या जवळचे असणाच्या एकमेव कारणावरून त्यांना कर्नाटकचे राज्यपालपद दिले गेले आहे. या देणगीचे मोल चुकविण्याचे वजूभार्इंचे राजकारण त्यांच्या मोदीनिष्ठा व पक्षनिष्ठा सांगणारे असले तरी त्यातून त्यांची संविधानावरील निष्ठा मात्र प्रकट व्हायची राहिली आहे. आज अल्पमतात असलेले येदियुरप्पा मुख्यमंत्री झाल्यानंतर बहुमत गोळा करतील, त्यासाठी ते आमदारांची घोडेबाजारात खरेदी करतील व त्यातून बहुमत जमा करतील असा राज्यपालांचा विचार असेल तर त्यांनी घटनेचा त्यांच्या राजकीय खेळासाठी वापर केला आहे असेच म्हटले पाहिजे. एका विशिष्ट मुदतीच्या आत आपले बहुमत सिद्ध करायला त्यांनी येदियुरप्पांना जसे सांगितले तसे ते कुमारस्वामींनाही सांगू शकले असते. पण तसे न करता येदियुरप्पा यांना संधी द्यायचीच असा विचार त्यांनी केला असेल तर त्यांची पक्षनिष्ठा त्यांच्या संविधान निष्ठेहून मोठी आहे हे स्पष्ट आहे. अखेर हे सत्तेचे राजकारण आहे आणि राजकारणात सारेच क्षम्यही आहे. परंतु क्षम्य म्हटले तरी ते घटनेच्या नियमांना धरून आहे असे निदान दिसले तरी पाहिजे. परंतु कर्नाटकात तसे झाले नाही. तसे गोव्यात झाले नाही, मेघालयात झाले नाही, अरुणाचलात झाले नाही आणि मिझोरममध्येही झाले नाही. हा सारा अनुभव भाजपला सत्तेशीच केवळ मतलब आहे. त्याला संवैधानिक संकेतांची फारशी पर्वा नाही हे सांगणाराही आहे. देशातली बडी माध्यमे व विशेषत: प्रकाशमाध्यमे त्या पक्षाच्या वळचणीलाच बांधली असल्याने त्यातले कुणी या विसंगतीवर बोट ठेवीत नाही. विरोधी नेते पराभवाने खिन्न आणि जे पक्ष या निवडणुकीपासून दूर राहिले त्यांना या प्रकाराशी काही घेणे देणे नाही. सबब हा घटनाभंग पचणार आणि खपणार आहे. या निवडणुकीने एक गोष्ट मात्र पुन: एकवार स्पष्ट केली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर या लोकसभेच्या दोन क्षेत्रात मायावती आणि अखिलेश यांचे दोन पक्ष एकत्र आले, तेव्हा भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. कर्नाटकची आकडेवारीही भाजपला भेडसावणारी आहे. काँग्रेस आणि जेडी (एस) यांनी निवडणूकपूर्व युती केली असती तर २२४ सदस्यांच्या तेथील विधानसभेत त्या युतीला १५६ जागा मिळाल्या असत्या हे मतांच्या बेरजांनी उघड केले आहे. तात्पर्य राज्यपालांनी कसे वागू नये हे जसे या राज्यात साºयांना पाहता आले तसे निवडणूकपूर्व आघाड्यांची रचना करणे फायदेशीर व मतदानाचा खरा चेहरा उघड करणारे ठरते हे राजकीय पक्षांनाही त्यात समजून घेता आले आहे. नेत्यांच्या अहंता आणि प्रादेशिक स्वरूपाचे हट्ट बाजूला सारूनच हे साधता येईल हे आता देशातील सर्व राजकीय पक्षांनी समजून घेणे गरजेचे आहे.