शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

असंतोषाचा प्रतिनिधी

By गजानन जानभोर | Updated: August 15, 2017 01:14 IST

सामान्य माणसाचा हा ‘पुतळा’ मोडून पडलेल्या माणसाच्या मनातील परिवर्तनाचा, असंतोषाचा प्रतिनिधी आहे.

सामान्य माणसाचा हा ‘पुतळा’ मोडून पडलेल्या माणसाच्या मनातील परिवर्तनाचा, असंतोषाचा प्रतिनिधी आहे. त्याच्या कल्याणातच स्वातंत्र्याचा खरा अर्थ सामावलेला आहे.‘जनमंच’ च्या कार्यक्रमात व्यासपीठावरील एक अर्धपुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. उपस्थितांना उत्सुकता असते, हा कोण? एखादा महापुरुष, संत, दिवंगत पुढारी की आणखी कुणी? खांद्यावर उपरणे असल्याने तो काहीसा शेतकºयासारखाही दिसतो. कोण असेल? मनात आडाखे सुरू असतात. कार्यक्रम जसजसा पुढे सरकत जातो तो आणखी ओळखीचा वाटू लागतो. घरी परतताना मात्र तो आपल्यातीलच एक असल्याची जाणीव स्पर्शून जाते. हा सामान्य माणसाचा पुतळा. त्याला नाव नाही आणि जात- धर्मही सांगता येत नाही. ‘जनमंच’चा हा कार्यक्रम त्याच्यासाठीच. एरवी तो कुठल्यातरी गर्दीत बिनचेहºयाने, ओळख लपवत वावरत असतो. आता उजाडेल, मग उजाडेल, या भाबड्या आशेने लोंढ्यामागे फरफटत जात असतो. पाच वर्षांतून एकदाच त्याला मोल येते. एव्हाना तो थकलेला, निराश झालेला पण नव्या आशेने पुन्हा मतदानाला जाणारा. आपले भले कुणीच करू शकत नाही, याचे प्रत्यंतर त्याला पावलोपावली आलेले असते. त्याचे प्रश्न कधीच सुटत नाहीत. उलट दिवसेंदिवस ते भयप्रद होत असतात. तीच आश्वासने, त्याच भूलथापांना तो हरक्षणी बळी पडतो. पोलिसाला चिरीमिरी दिल्याशिवाय त्याला अजूनही न्याय मिळत नाही. बँकेत कर्जासाठी सुरू असलेले हेलपाटे संपलेले नाहीत. डोनेशन दिल्याशिवाय त्याच्या मुलाला शाळेत उभे केले जात नाही. थोडक्यात उपेक्षा, अपमानाशिवाय त्याचे जगणे अपूर्णच.गावात रस्ता नाही, शाळा आहे पण मुलांसाठी जागा नाही. विहीर आहे पण पाणी नाही. मुलांपेक्षा गुरुजींनाच शाळा सुटायची अधिक घाई. आरोग्य केंद्रातील डॉक्टर-नर्स गावात थांबायला तयार नाही. शेवटी करावे तरी काय? आपल्या मनातील सारा असंतोष तो असाच गिळून टाकतो. एक-दोन एकर शेती आहे पण नांगरण्यासाठी बैल नाही आणि नांगरही नाही. कुणी येते का त्याच्या मदतीला? तो शेवटी थकून जातो आणि आत्महत्या करतो. बापाच्या पाठी आपले कसे होईल, या विवंचनेत मग त्याची मुलगीही गळफास घेते. लाखाच्या मोर्चात तिचा टाहो कुणालाही ऐकू येत नाही. ज्यांना निवडून दिले ते आपले मायबाप तरी व्यथित होतात का ? नाही! कसे होणार? कारण ते फुटबॉल खेळण्यात दंग असतात. सामान्य माणूस मग तो खेड्यातला किंवा शहरातला त्याची होरपळ अशीच जीवघेणी. शहरातला माणूसही असाच नागवलेला. घराचा नकाशा मंजूर करण्यासाठी त्याला महापालिकेत लाच द्यावीच लागते. घरासमोरच्या सिमेंट रस्त्याच्या कामात शेण खाणाºया ठेकेदाराला तो काहीच म्हणू शकत नाही. मोहल्ल्यातील दारू दुकानाच्या त्रासासाठी त्याला लोकप्रतिनिधींचे पाय धरावे लागतात. तो लढत नाही की पेटूनही उठत नाही. अतिरेक झाल्यानंतरच जागे व्हायचे, एरवी निद्रिस्त राहायचे. त्याचेही काय चुकले? एकटा माणूस मोडून पडतो, पराभूत होतो. त्याला कापून काढणे सोपे असते. पण, हीच सामान्य माणसे परिवर्तनासाठी एकत्र आली तर... त्यासाठीच हे ‘जनमंच’ आहे.विदर्भातील सामान्य माणसांची प्रामाणिक चळवळ म्हणून ‘जनमंच’बद्दल साºयांनाच आदर आहे. जनमंचच्या जनेरिक औषध चळवळीची दखल अमीर खानला घ्यावी लागते. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याकडे साºया देशाचे लक्ष वेधले जाते ते जनमंचमुळेच. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही संघटना धडपडते. या संघटनेतील कार्यकर्तेही कधीकाळी गर्दीतील. आता मात्र ते कुणासमोर वाकत नाहीत. वैयक्तिक जीवनातही ते नीतिमूल्ये जपतात. मेडिकल, तहसील कार्यालयात अडल्यानडल्यांना मदत करताना ते दिसतात. सामान्य माणूस आनंदी राहावा, यासाठीच त्यांची ही धडपड आहे. त्या माणसासाठी प्रार्थना म्हणजे जनमंचच्या व्यासपीठावरील हा पुतळा. विदर्भ साहित्य संघाच्या भिंतींवर ‘म्युरल’ तयार करताना एक हाडकुळा कलावंत दिसतो, त्या किशोर पवारने हा पुतळा तयार केला. ‘सामान्य माणसाच्या मनात परिवर्तनाआधी असंतोष निर्माण झाला पाहिजे’, असे गांधींनी सांगून ठेवले आहे. तो पुतळा त्या महात्म्याच्या अंतर्मनातील असंतोषाचा प्रतिनिधी. त्याच्या कल्याणातच स्वातंत्र्याचा खरा अर्थही सामावलेला आहे.