शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

असंतोषाचा प्रतिनिधी

By गजानन जानभोर | Updated: August 15, 2017 01:14 IST

सामान्य माणसाचा हा ‘पुतळा’ मोडून पडलेल्या माणसाच्या मनातील परिवर्तनाचा, असंतोषाचा प्रतिनिधी आहे.

सामान्य माणसाचा हा ‘पुतळा’ मोडून पडलेल्या माणसाच्या मनातील परिवर्तनाचा, असंतोषाचा प्रतिनिधी आहे. त्याच्या कल्याणातच स्वातंत्र्याचा खरा अर्थ सामावलेला आहे.‘जनमंच’ च्या कार्यक्रमात व्यासपीठावरील एक अर्धपुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. उपस्थितांना उत्सुकता असते, हा कोण? एखादा महापुरुष, संत, दिवंगत पुढारी की आणखी कुणी? खांद्यावर उपरणे असल्याने तो काहीसा शेतकºयासारखाही दिसतो. कोण असेल? मनात आडाखे सुरू असतात. कार्यक्रम जसजसा पुढे सरकत जातो तो आणखी ओळखीचा वाटू लागतो. घरी परतताना मात्र तो आपल्यातीलच एक असल्याची जाणीव स्पर्शून जाते. हा सामान्य माणसाचा पुतळा. त्याला नाव नाही आणि जात- धर्मही सांगता येत नाही. ‘जनमंच’चा हा कार्यक्रम त्याच्यासाठीच. एरवी तो कुठल्यातरी गर्दीत बिनचेहºयाने, ओळख लपवत वावरत असतो. आता उजाडेल, मग उजाडेल, या भाबड्या आशेने लोंढ्यामागे फरफटत जात असतो. पाच वर्षांतून एकदाच त्याला मोल येते. एव्हाना तो थकलेला, निराश झालेला पण नव्या आशेने पुन्हा मतदानाला जाणारा. आपले भले कुणीच करू शकत नाही, याचे प्रत्यंतर त्याला पावलोपावली आलेले असते. त्याचे प्रश्न कधीच सुटत नाहीत. उलट दिवसेंदिवस ते भयप्रद होत असतात. तीच आश्वासने, त्याच भूलथापांना तो हरक्षणी बळी पडतो. पोलिसाला चिरीमिरी दिल्याशिवाय त्याला अजूनही न्याय मिळत नाही. बँकेत कर्जासाठी सुरू असलेले हेलपाटे संपलेले नाहीत. डोनेशन दिल्याशिवाय त्याच्या मुलाला शाळेत उभे केले जात नाही. थोडक्यात उपेक्षा, अपमानाशिवाय त्याचे जगणे अपूर्णच.गावात रस्ता नाही, शाळा आहे पण मुलांसाठी जागा नाही. विहीर आहे पण पाणी नाही. मुलांपेक्षा गुरुजींनाच शाळा सुटायची अधिक घाई. आरोग्य केंद्रातील डॉक्टर-नर्स गावात थांबायला तयार नाही. शेवटी करावे तरी काय? आपल्या मनातील सारा असंतोष तो असाच गिळून टाकतो. एक-दोन एकर शेती आहे पण नांगरण्यासाठी बैल नाही आणि नांगरही नाही. कुणी येते का त्याच्या मदतीला? तो शेवटी थकून जातो आणि आत्महत्या करतो. बापाच्या पाठी आपले कसे होईल, या विवंचनेत मग त्याची मुलगीही गळफास घेते. लाखाच्या मोर्चात तिचा टाहो कुणालाही ऐकू येत नाही. ज्यांना निवडून दिले ते आपले मायबाप तरी व्यथित होतात का ? नाही! कसे होणार? कारण ते फुटबॉल खेळण्यात दंग असतात. सामान्य माणूस मग तो खेड्यातला किंवा शहरातला त्याची होरपळ अशीच जीवघेणी. शहरातला माणूसही असाच नागवलेला. घराचा नकाशा मंजूर करण्यासाठी त्याला महापालिकेत लाच द्यावीच लागते. घरासमोरच्या सिमेंट रस्त्याच्या कामात शेण खाणाºया ठेकेदाराला तो काहीच म्हणू शकत नाही. मोहल्ल्यातील दारू दुकानाच्या त्रासासाठी त्याला लोकप्रतिनिधींचे पाय धरावे लागतात. तो लढत नाही की पेटूनही उठत नाही. अतिरेक झाल्यानंतरच जागे व्हायचे, एरवी निद्रिस्त राहायचे. त्याचेही काय चुकले? एकटा माणूस मोडून पडतो, पराभूत होतो. त्याला कापून काढणे सोपे असते. पण, हीच सामान्य माणसे परिवर्तनासाठी एकत्र आली तर... त्यासाठीच हे ‘जनमंच’ आहे.विदर्भातील सामान्य माणसांची प्रामाणिक चळवळ म्हणून ‘जनमंच’बद्दल साºयांनाच आदर आहे. जनमंचच्या जनेरिक औषध चळवळीची दखल अमीर खानला घ्यावी लागते. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याकडे साºया देशाचे लक्ष वेधले जाते ते जनमंचमुळेच. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही संघटना धडपडते. या संघटनेतील कार्यकर्तेही कधीकाळी गर्दीतील. आता मात्र ते कुणासमोर वाकत नाहीत. वैयक्तिक जीवनातही ते नीतिमूल्ये जपतात. मेडिकल, तहसील कार्यालयात अडल्यानडल्यांना मदत करताना ते दिसतात. सामान्य माणूस आनंदी राहावा, यासाठीच त्यांची ही धडपड आहे. त्या माणसासाठी प्रार्थना म्हणजे जनमंचच्या व्यासपीठावरील हा पुतळा. विदर्भ साहित्य संघाच्या भिंतींवर ‘म्युरल’ तयार करताना एक हाडकुळा कलावंत दिसतो, त्या किशोर पवारने हा पुतळा तयार केला. ‘सामान्य माणसाच्या मनात परिवर्तनाआधी असंतोष निर्माण झाला पाहिजे’, असे गांधींनी सांगून ठेवले आहे. तो पुतळा त्या महात्म्याच्या अंतर्मनातील असंतोषाचा प्रतिनिधी. त्याच्या कल्याणातच स्वातंत्र्याचा खरा अर्थही सामावलेला आहे.