शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' सीन; आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
10
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
11
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
13
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
14
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
15
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
16
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
17
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
18
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
20
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

चर्चेची गुऱ्हाळं...

By admin | Updated: June 11, 2015 00:33 IST

दोन वर्षांत ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा ‘मुहूर्त’च जुळून आला नाही, जो येईल की नाही याची स्वत: साहित्य महामंडळालादेखील खात्री नाही

दोन वर्षांत ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा ‘मुहूर्त’च जुळून आला नाही, जो येईल की नाही याची स्वत: साहित्य महामंडळालादेखील खात्री नाही, त्या संमेलनाच्या चर्चेची गुऱ्हाळं साहित्य विश्वात रंगू लागली आहेत. जगभरात मराठी भाषक विखुरला गेला आहे. त्याची भाषिक अस्मिता जोपासण्याच्या नावाखाली विश्व साहित्य संंमेलनाचा हा भव्य ‘इमला’ रचण्यात आला. मात्र, आयोजक आणि महामंडळ यांच्यातील समन्वयाअभावी या संमेलनाचा पायाच खचत चालल्याचे दिसत आहे. टोरॅन्टो (कॅनडा) आणि जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनांनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली. ‘बाकी कशाचेही सोंग करता येते पण पैशाचे येत नाही’असे म्हणतात, त्यामुळे शासनाने २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे विश्व साहित्य संमेलन भारताबाहेर घेण्याची कवाडं जवळपास बंदच झाली आहेत. म्हणूनच की काय ‘पदरी पडलं नि पवित्र झालं’ या उक्तीप्रमाणे यंदाच्या वर्षी साहित्य महामंडळाने विश्व साहित्य संमेलनासाठी अंदमानच्या आलेल्या प्रस्तावावरच समाधान मानायचे ठरवले आहे. पण विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी न मिळालेल्या ज्येष्ठ कवींना मात्र ही गोष्ट काहीशी ‘जिव्हारी’च लागल्याचे दिसते. दुष्काळामुळे ना. धों. महानोर यांनी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणे सयुक्तिक वाटत नसल्याचे कारण पुढे करीत हे अध्यक्षपद नाकारले असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, दुष्काळाचा संदर्भ विश्व साहित्य संमेलनाशी जोडण्यामागचा महानोरांचा हेतू सुस्पष्ट होत नाही. ज्या वेळी साहित्य महामंडळाने टोरॅन्टोसाठी महानोरांची अध्यक्षपदी निवड केली होती, तेव्हाही दुष्काळसदृशच परिस्थिती होती. मग तेव्हा त्यांना दुष्काळाची दाहकता जाणवली नाही का? ते स्वत: शेतकरी असल्याने त्याबाबतची संवेदनशीलता जशी त्यांच्या लेखनातून अनुभवायला मिळते तशी मग आचरणात का दिसली नाही? तेव्हाच त्यांनी अध्यक्षपद नाकारणे अपेक्षित होते. महानोर हे प्रतिभावंत कवी आहेत, यात कुणाचेच दुमत नाही! पण एकंदरच त्यांच्या विचार आणि वर्तणुकीमध्ये वक्तव्यांमधूनच विसंगती आढळत आहे. विश्व साहित्य संमेलन निधीअभावी बंद पडण्याची शक्यता अधिक असल्याने अध्यक्षपदी निवड होऊनही ते भूषविण्याची संधी न मिळाल्याचा सल नको किंवा उगाच चर्चेला अधिक खतपाणी नको, म्हणून तर ना.धों.नी हा पवित्रा घेतला नाही ना, अशा शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे त्यामागचे ‘गूढ’ कायम आहे! ज्याची सत्यता त्यांनाच अधिक अवगत आहे. तूर्तास विश्व साहित्य संमेलन होवो की न होवो त्याच्या ‘बिनबुडाच्या’ चर्चांनी साहित्य विश्वातील वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघत आहे...