शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

चर्चेची गुऱ्हाळं...

By admin | Updated: June 11, 2015 00:33 IST

दोन वर्षांत ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा ‘मुहूर्त’च जुळून आला नाही, जो येईल की नाही याची स्वत: साहित्य महामंडळालादेखील खात्री नाही

दोन वर्षांत ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा ‘मुहूर्त’च जुळून आला नाही, जो येईल की नाही याची स्वत: साहित्य महामंडळालादेखील खात्री नाही, त्या संमेलनाच्या चर्चेची गुऱ्हाळं साहित्य विश्वात रंगू लागली आहेत. जगभरात मराठी भाषक विखुरला गेला आहे. त्याची भाषिक अस्मिता जोपासण्याच्या नावाखाली विश्व साहित्य संंमेलनाचा हा भव्य ‘इमला’ रचण्यात आला. मात्र, आयोजक आणि महामंडळ यांच्यातील समन्वयाअभावी या संमेलनाचा पायाच खचत चालल्याचे दिसत आहे. टोरॅन्टो (कॅनडा) आणि जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनांनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली. ‘बाकी कशाचेही सोंग करता येते पण पैशाचे येत नाही’असे म्हणतात, त्यामुळे शासनाने २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे विश्व साहित्य संमेलन भारताबाहेर घेण्याची कवाडं जवळपास बंदच झाली आहेत. म्हणूनच की काय ‘पदरी पडलं नि पवित्र झालं’ या उक्तीप्रमाणे यंदाच्या वर्षी साहित्य महामंडळाने विश्व साहित्य संमेलनासाठी अंदमानच्या आलेल्या प्रस्तावावरच समाधान मानायचे ठरवले आहे. पण विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी न मिळालेल्या ज्येष्ठ कवींना मात्र ही गोष्ट काहीशी ‘जिव्हारी’च लागल्याचे दिसते. दुष्काळामुळे ना. धों. महानोर यांनी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणे सयुक्तिक वाटत नसल्याचे कारण पुढे करीत हे अध्यक्षपद नाकारले असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, दुष्काळाचा संदर्भ विश्व साहित्य संमेलनाशी जोडण्यामागचा महानोरांचा हेतू सुस्पष्ट होत नाही. ज्या वेळी साहित्य महामंडळाने टोरॅन्टोसाठी महानोरांची अध्यक्षपदी निवड केली होती, तेव्हाही दुष्काळसदृशच परिस्थिती होती. मग तेव्हा त्यांना दुष्काळाची दाहकता जाणवली नाही का? ते स्वत: शेतकरी असल्याने त्याबाबतची संवेदनशीलता जशी त्यांच्या लेखनातून अनुभवायला मिळते तशी मग आचरणात का दिसली नाही? तेव्हाच त्यांनी अध्यक्षपद नाकारणे अपेक्षित होते. महानोर हे प्रतिभावंत कवी आहेत, यात कुणाचेच दुमत नाही! पण एकंदरच त्यांच्या विचार आणि वर्तणुकीमध्ये वक्तव्यांमधूनच विसंगती आढळत आहे. विश्व साहित्य संमेलन निधीअभावी बंद पडण्याची शक्यता अधिक असल्याने अध्यक्षपदी निवड होऊनही ते भूषविण्याची संधी न मिळाल्याचा सल नको किंवा उगाच चर्चेला अधिक खतपाणी नको, म्हणून तर ना.धों.नी हा पवित्रा घेतला नाही ना, अशा शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे त्यामागचे ‘गूढ’ कायम आहे! ज्याची सत्यता त्यांनाच अधिक अवगत आहे. तूर्तास विश्व साहित्य संमेलन होवो की न होवो त्याच्या ‘बिनबुडाच्या’ चर्चांनी साहित्य विश्वातील वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघत आहे...