शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

चर्चेची गुऱ्हाळं...

By admin | Updated: June 11, 2015 00:33 IST

दोन वर्षांत ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा ‘मुहूर्त’च जुळून आला नाही, जो येईल की नाही याची स्वत: साहित्य महामंडळालादेखील खात्री नाही

दोन वर्षांत ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा ‘मुहूर्त’च जुळून आला नाही, जो येईल की नाही याची स्वत: साहित्य महामंडळालादेखील खात्री नाही, त्या संमेलनाच्या चर्चेची गुऱ्हाळं साहित्य विश्वात रंगू लागली आहेत. जगभरात मराठी भाषक विखुरला गेला आहे. त्याची भाषिक अस्मिता जोपासण्याच्या नावाखाली विश्व साहित्य संंमेलनाचा हा भव्य ‘इमला’ रचण्यात आला. मात्र, आयोजक आणि महामंडळ यांच्यातील समन्वयाअभावी या संमेलनाचा पायाच खचत चालल्याचे दिसत आहे. टोरॅन्टो (कॅनडा) आणि जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनांनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली. ‘बाकी कशाचेही सोंग करता येते पण पैशाचे येत नाही’असे म्हणतात, त्यामुळे शासनाने २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे विश्व साहित्य संमेलन भारताबाहेर घेण्याची कवाडं जवळपास बंदच झाली आहेत. म्हणूनच की काय ‘पदरी पडलं नि पवित्र झालं’ या उक्तीप्रमाणे यंदाच्या वर्षी साहित्य महामंडळाने विश्व साहित्य संमेलनासाठी अंदमानच्या आलेल्या प्रस्तावावरच समाधान मानायचे ठरवले आहे. पण विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी न मिळालेल्या ज्येष्ठ कवींना मात्र ही गोष्ट काहीशी ‘जिव्हारी’च लागल्याचे दिसते. दुष्काळामुळे ना. धों. महानोर यांनी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणे सयुक्तिक वाटत नसल्याचे कारण पुढे करीत हे अध्यक्षपद नाकारले असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, दुष्काळाचा संदर्भ विश्व साहित्य संमेलनाशी जोडण्यामागचा महानोरांचा हेतू सुस्पष्ट होत नाही. ज्या वेळी साहित्य महामंडळाने टोरॅन्टोसाठी महानोरांची अध्यक्षपदी निवड केली होती, तेव्हाही दुष्काळसदृशच परिस्थिती होती. मग तेव्हा त्यांना दुष्काळाची दाहकता जाणवली नाही का? ते स्वत: शेतकरी असल्याने त्याबाबतची संवेदनशीलता जशी त्यांच्या लेखनातून अनुभवायला मिळते तशी मग आचरणात का दिसली नाही? तेव्हाच त्यांनी अध्यक्षपद नाकारणे अपेक्षित होते. महानोर हे प्रतिभावंत कवी आहेत, यात कुणाचेच दुमत नाही! पण एकंदरच त्यांच्या विचार आणि वर्तणुकीमध्ये वक्तव्यांमधूनच विसंगती आढळत आहे. विश्व साहित्य संमेलन निधीअभावी बंद पडण्याची शक्यता अधिक असल्याने अध्यक्षपदी निवड होऊनही ते भूषविण्याची संधी न मिळाल्याचा सल नको किंवा उगाच चर्चेला अधिक खतपाणी नको, म्हणून तर ना.धों.नी हा पवित्रा घेतला नाही ना, अशा शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे त्यामागचे ‘गूढ’ कायम आहे! ज्याची सत्यता त्यांनाच अधिक अवगत आहे. तूर्तास विश्व साहित्य संमेलन होवो की न होवो त्याच्या ‘बिनबुडाच्या’ चर्चांनी साहित्य विश्वातील वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघत आहे...