शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

‘तिहेरी तलाक’च्या तरतुदीत भेदभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 01:58 IST

केंद्रीय विधि आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकारांचे रक्षण) विधेयक-२०१९ हे लोकसभेत सादर केल्यावर विरोधकांनी त्यावर आक्षेप नोंदवले.

- पवन के. वर्मा (राजकीय विश्लेषक)‘तलाक’ या शब्दाचा तीन वेळा उच्चार केल्यानंतर मुस्लीम विवाहित स्त्रीला अपरिवर्तनीय असा घटस्फोट मिळण्याची प्रथा अत्यंत घृणास्पद आहे. ही प्रथा नष्ट व्हायलाच हवी. अनेक इस्लामिक राष्ट्रांनी ती नष्टसुद्धा केली आहे. या प्रथेवर बंदी लागू करून सर्वोच्च न्यायालयाने योग्य आणि प्रगतिशील पाऊल उचलले आहे. त्यामुळे कायद्याने तलाक ही प्रथा अस्तित्वशून्य आणि अंमलबजावणी करण्यास अयोग्य ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे योग्य आहे, ते केले आहे.

आता त्याचा पाठपुरावा लोकसभेने त्याबाबत कायदा करून करायला हवा. या कायद्याचे स्वरूप कसे असावे, यावरून लोकसभेत वाद सुरू आहेत. केंद्रीय विधि आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकारांचे रक्षण) विधेयक-२०१९ हे लोकसभेत सादर केल्यावर विरोधकांनी त्यावर आक्षेप नोंदवले. सत्तारूढ पक्षाकडे असलेले बहुमत लक्षात घेता, हे विधेयक त्यावर मतदान करण्यासाठीच सादर करण्यात आले असावे.

या विधेयकातील तरतुदींवर काळजीपूर्वक विचार होण्याची गरज आहे. विधेयकातील कलम ३ अन्वये, मुस्लीम विवाहित पुरुषाने आपल्या पत्नीला उद्देशून तीन वेळा ‘तलाक’ शब्दाचा उच्चार केला, मग तो वाचेने, लिखित वा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा अन्य पद्धतीने केला असो, तो निरर्थक आणि बेकायदेशीर ठरेल, असे घोषित करण्यात आले आहे. ही तरतूद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अनुरूप अशीच आहे. मात्र, विधेयकातले कलम ४ हे वादग्रस्त ठरू शकते. मुस्लीम विवाहित पुरुषाने कलम ३ अन्वये तीन वेळा ‘तलाक’ शब्दाचा उच्चार केला, तर त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा दिली जाऊ शकते, अशी त्यात तरतूद आहे.

विधेयकातील कलम ७(अ) अनुसार हा गुन्हा दखलपात्र ठरेल. म्हणजेच असा गुन्हा करणाऱ्यास पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतील. ज्या विवाहित स्त्रीला ‘तलाक’ देण्यात आला आहे, तिने त्याविषयी तक्रार केल्यानंतर तिच्या नवºयाला अशी अटक होऊ शकते. इतकेच नाही, तर तिच्या रक्ताच्या नातलगांनी अशी तक्रार केल्यासही अटक होऊ शकते. तलाकची बळी ठरलेल्या स्त्रीनेच नव्हे, तर तिच्या नातलगांनी तक्रार केल्यास एवढ्या मोठ्या शिक्षेच्या तरतुदीच्या गैरफायदाही घेतला जाऊ शकेल. कारण कलम ७(अ) अन्वये, शिक्षा दिलेल्या कोणत्याही आरोपीने अर्ज केल्यावर त्यावर मॅजिस्ट्रेटने सुनावणी घेतल्यावर, जामीन मंजूर करण्यासाठी योग्य कारण आहे, याविषयी समाधान झाल्यावरच त्या व्यक्तीला मॅजिस्ट्रेटकडून जामीन मंजूर होऊ शकेल.

प्रस्तावित विधेयकाचे कलम ५ म्हणते, ज्या मुस्लीम महिलेला तलाक लागू करण्यात आला आहे, तिला व तिच्यावर अवलंबून असणाऱ्यांना तिच्या नवºयाकडून पोटगी मिळू शकेल. पोटगीची रक्कम मॅजिस्ट्रेट निर्धारित करतील, पण आरोपी पती जर तुरुंगात असेल आणि त्यामुळे तो कमाई करू शकत नसेल, तर ही पोटगीची रक्कम तो कुठून देईल, तसेच अस्तित्वात असलेल्या सिव्हिल कायद्यानुसार या गुन्ह्याला शिक्षा का देता येणार नाही, याची पुरेशी कारणे विधेयकात देण्यात आलेली नाहीत. तसेही सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक देण्यावर बंदी घातलेलीच आहे. अशा स्थितीत प्रश्न शिल्लक राहतो, तो आपल्या पत्नीला व मुलाबाळांना स्वेच्छेने सोडून देण्याचा.

गरज पडेल, तेव्हा व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करणे आवश्यक असेल, तर योग्य मार्ग हा राहील की, या सुधारणा समन्यायी आणि टिकाऊ असल्या पाहिजेत, हे पाहिले गेले पाहिजे. या संदर्भात विधि आयोगाचे अध्यक्ष न्या.मू. बी.एस. चौहान यांनी समान नागरी कायद्याच्या संदर्भात जी प्रश्नमालिका पाठविली होती, तिच्या उत्तरात नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री, तसेच जद.(यु) चे अध्यक्ष या नात्याने जे विचार व्यक्त केले आहेत.

आपल्या उत्तरात नितीशकुमार यांनी लिहिले आहे, ‘केंद्र सरकारने समान नागरी कायदा आणायलाच हवा, पण तो सर्व समावेशक व टिकाऊ व्हावा, यासाठी त्यातील तरतुदी यावरून लादण्याऐवजी त्या सर्व संमतीवर आधारित असल्या पाहिजेत. आपल्या देशात विविध धर्म जसे आहेत, तसेच वांच्छिक समाजही आहेत, तेव्हा सर्व घटकांसोबत विचारविनिमय करून सर्व धार्मिक गटांची विशेषत: अल्पसंख्य समाजाची संमती प्राप्त करून न घेता, जर समान नागरी कायदा लादण्याचा प्रयत्न केला, तर सामाजिक संघर्ष निर्माण होऊन घटनेने दिलेले धार्मिक व अन्य स्वातंत्र्य धोक्यात येईल,’ असे स्पष्ट करून नितीशकुमार यांनी पुढे नमूद केले आहे की, ‘समान नागरी कायद्याचा वापर राजकीय हत्यार म्हणून करण्यासाठी तो कुणाशीही विचारविनिमय न करता घाईघाईने, लोकांच्या इच्छेविरुद्ध लागू करण्यात येऊ नये.’

या सर्व भक्कम निरीक्षणांच्या आधारे भाजपला विचारायला हवे की, त्यांचा पक्ष सर्वांसोबत आवश्यक ती सल्लामसलत न करता, हे विधेयक घाईगर्दीने सादर करण्याचा का प्रयत्न करीत आहे? संसदेच्या सिलेक्ट समितीकडे हे प्रस्तावित विधेयक पाठवायला काहीच हरकत नाही. व्यापक सल्लामसलतीतून मुस्लीम महिलांसाठी आणि मुस्लीम समाजासाठी योग्य ठरणारा न्याय्य कायदा अस्तित्वात येऊ शकेल.

(लेखकाचे हे व्यक्तिगत विचार आहेत.)

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक