शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दीदी तेरा देवर दिवाना

By admin | Updated: January 21, 2015 23:43 IST

नव्या दीदीचा जन्म झाला आहे. ‘मै किरण बेदी नही, किरण दीदी’. तेव्हां नरेन्द्र मोदी यांना आत्तापासूनच शुभेच्छा द्यायला हरकत नाही.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाचा ही किस्सा. त्यांच्या भेटीला एक संपादक गेले होते. मनमोकळ्या गप्पा झाल्या. भेटीची वेळ संपत आली आणि वाजपेयींचा चेहरा त्रासिक भासू लागला. संपादकांनी न राहून कारण विचारले. काहीसे गंभीर आणि काहीसे खट्याळ भाव चेहऱ्यावर आणून अटलजी म्हणाले, ‘अब दीदी जो आनेवाली है’. आता ही दीदी कोण हे सांगायची गरज नाही. कारण तोवर देशात दोनच दीदी. एक लतादीदी आणि दुसऱ्या ममतादीदी. त्यातील लतादीदींनी राज्यसभेच्या सदस्य असूनही संसदेच्या दिशेने सहसा आपली पावले वळवली नाहीत म्हणून अटलजींनी त्रासायचं काही कारण नव्हतं. तेव्हां त्राग्याचं कारण उरलं एकच. पण आता त्रस्त करुन सोडायची ममतादीदींची मक्तेदारी संपुष्टात येणार अशी लक्षणं दिसू लागली आहेत. कारण नव्या दीदीचा जन्म झाला आहे. ‘मै किरण बेदी नही, किरण दीदी’. तेव्हां नरेन्द्र मोदी यांना आत्तापासूनच शुभेच्छा द्यायला हरकत नाही. इंडियन पोलीस सर्व्हिसमधील देशातल्या पहिल्या अधिकारी म्हणून त्यांना साऱ्यांनीच डोक्यावर घेतले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मोटारीचे चलन भरणे असो वा तिहार जेलमधील सुधारणा असोत, माध्यमांसकट साऱ्यांनी त्यांचे यथोचित कौतुक केले. त्यांना दिल्लीचे पोलीस आयुक्तपद नाकारले गेले, तेव्हांही माध्यमे त्यांच्या बाजूने उभी राहिली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांनाही अमाप प्रसिद्धी मिळाली. यथावकाश त्या सेवेतून निवृत्तही झाल्या. पूर्वीच्या काळातील अखिल भारतीय सेवेतील लोक निवृत्तीनंतर अज्ञातात राहणे पसंत करीत. पण आता तसे नाही. निवृत्त होण्यापूर्वीच अनेकाना समाजकारणाचे आणि त्या माध्यमातून राजकारणाचे वेध लागू लागले आहेत. मग बेदीबाई त्याला कशा अपवाद ठरणार? त्यांच्या नशिबाचा धार्जिणगुण चांगला म्हणायचा. त्यांना अण्णा हजारे गवसले. अण्णादेखील अशा काही लोकाना गवसत होतेच. सरकार हेच साऱ्या समस्यांचे मूळ आणि आगर अशी भूमिका घेऊन वावरणाऱ्या शरद जोशी यांच्यासारखीच अण्णा हजारे यांचीही भूमिका. ती जशी अरविंद केजरीवालांना भावली तशीच किरण बेदी यांनादेखील भावली. पण हे भावणं तात्पुरतं होतं, हे कालांतराने केजरीवाल यांनी कृतीनं दाखवून दिलं. त्यांच्यातील राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यांनी अण्णांचं बोट सोडून दिलं. केजरीवाल हेदेखील अखिल भारतीय सेवेच्या राजस्व विभागाचे अधिकारी राहिलेले असल्याने त्यांना उपयुक्ततेचा सिद्धांत चांगलाच ठाऊक होता. त्यामुळे अण्णांची उपयुक्तता आता संपल्याचं त्यांच्या वेळीच लक्षात आलं. त्यांनी आप नावाच्या पक्षाची स्थापना केली. बेदीबाई काही त्यांंच्या समवेत गेल्या नाहीत. किंवा त्यांनीच दीदीला सोबत घेतलं नसावं. एक शाझीया इल्मी आपच्या दृष्टीनं पुरेशी असावी. केजरीवालांनी दिल्लीचं तख्त काबीज केलं आणि लगेच ते यमुनेच्या डोहात विसर्जीतही करुन टाकलं. त्यापायीच आता पुन्हा दिल्लीच्या निवडणुका. त्यात केजरीवालांच्या पुढ्यात भाजपाकडून थेट किरण दीदी. मुळात भाजपातील अवस्था एक अनार सौ बिमार अशातली. त्यात किरण बेदी कानामागून आल्या आणि दिल्ली सरकारच्या भाजपाच्या भावी मुख्यमंत्री म्हणून घोषितही केल्या गेल्या. साहजिकच भाजपातील अनेक देवर दिवाने होऊन गेले. किरण बेदींच्या पाठोपाठ शाझियादेखील भाजपात डेरेदाखल झाल्या, त्यामुळे घरचे आणि बाहेरचे असा नवाच वाद तिथे सुरु झाला आहे. बेदीबाईना त्याच्याशी काही घेणेदेणे असण्याचे कारण नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली. या वाटचालीला आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनातील आपले आद्य गुरु अण्णा हजारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केला. पण अण्णा घुश्श्यात. गेल्या घरी सुखी रहा, पण आशीर्वाद मात्र मागू नको, असा सांगावा म्हणे त्यांनी धाडला. पण म्हणजे ते आशीर्वाद देणारच नाहीत असे नाही. उद्या दिल्लीत जाऊन बेदीबाईंचा प्रचारदेखील करतील. त्यामुळे अण्णांचं कुणीच काही फार मनावर घ्यायचं नसतं. बेदीबाईंच्या भाजपा प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने दिवाने झालेले दोघे. अरविंद केजरीवाल आणि योगेन्द्र यादव. केजरीवालांनी दिलेल्या आमनेसामनेच्या आवाहन वा आव्हानाची किरण बेदी यांनी चक्क तमाशा म्हणून संभावना करुन टाकली आहे. पण तरीही केजरीवालांना एक लक्ष्य मात्र जरुर मिळाले आहे. कारण मोदी लक्ष्य करुन काही उपयोग होत नाही, हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले आहे. योगेन्द्र यादव यांचा मात्र खूपच तिळपापड झालेला दिसतो. का होऊ नये? अण्णांच्या आंदोलनात ज्यांनी कंधेसे कंधा मिलाकर काम केले, त्यांनीच शत्रू म्हणून उभे ठाकावे, याला काय अर्थ? त्यामुळे मोदी यांचा प्रभाव आता पार उतरला असल्याने भाजपाला मार खाण्यासाठी एक चेहरा आवश्यकच होता व तो त्यांनी किरण बेदी यांच्यात शोधला, अशी जहरी टीका योगेन्द्र यांनी केली आहे. पण त्यांनी एक धमालदेखील केली आहे. सरकारच्या म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात लढणाऱ्यांनी हात झटकून सत्तेच्या वर्तुळात शिरणे तसे घातक असते, यावर त्यांनी जोर दिला आहे. याचा अर्थ योगेन्द्र वा अरविंद सत्तेच्या वर्तुळात शिरण्यास नाखुष असावेत असे दिसते. याला काय, युद्धाआधीच शस्त्रबंदी म्हणायचे?