शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाण्यासाठीचे पैसे पाण्यातच गेले का?

By किरण अग्रवाल | Updated: April 24, 2022 10:55 IST

Did the money for water go to the water? :

- किरण अग्रवाल

उन्हाचा चटका वाढला असतानाच पाणी समस्येच्या तक्रारीही येऊ लागल्या आहेत. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासनातर्फे कोट्यवधी रुपयांच्या योजना आखल्या जातात; पण त्या पूर्णत्वास येताना पाणी मिळण्याऐवजी नागरिकांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली गेल्याचा अनुभव येतो. काही केल्या ही स्थिती फारशी बदलताना दिसत नाही.

 

पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करणे उचित ठरत नाही; पण या मुद्यावर निवडणुका लढल्या जातात आणि तरी प्रश्न निकाली निघत नाही. विशेषत: यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला जातो व तो खर्चीही पडतो, तरी माता- भगिनींना पाण्यासाठी वणवण करीत ठणाणा करायची वेळ येते. अकोल्यातही तेच झाले असून, जसजसा उन्हाचा चटका वाढत आहे, तसतशी पाण्याची समस्या उग्र रूप धारण करून समोर येऊ पाहते आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप होणे स्वाभाविक ठरले आहे.

 

अकोल्यातील ऊन जागतिक पातळीवर कडक ठरले आहे. मागे आठ दिवसांपूर्वी जगात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली होती, तर दोन दिवसांपूर्वी हे शहर तिसऱ्या क्रमांकावर होते. अकोलेकरांना उन्हाचा हा चटका नवीन नाही. मात्र, याबरोबरच आता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विलंबाने होऊ लागल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील धरण प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही पुरवठ्याबाबतची अडचण समोर आली आहे. शहरातील काही भागांत चक्क चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने यासाठी शासनाच्या अमृत योजनेंतर्गत लाभलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कोठे गेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी म्हणजे शहरातील जलवाहिन्या बदलून नवीन जलकुंभ उभारण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीतून आतापर्यंत महापालिकेने सुमारे ९० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्ची घातली असल्याने यंदा शहरवासीयांना नियमित पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने या योजनेची कामे झाल्यानंतर शहरवासीयांना प्रतिदिन पाणीपुरवठा करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, प्रत्यक्षात चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने कोट्यवधीचा निधी नेमका मुरला कुठे, असा प्रश्न केला जात आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे पाणीपुरवठ्याची बोंब असताना नळाच्या मीटरचे रीडिंग न घेताच नागरिकांना दोन ते तीन वर्षांची मोघम बिले देण्यात येत असल्याने संतापात भर पडून गेली आहे. यातही शहरातील काही भागांत नळांना मीटर बसविण्यात आलेले नाही. सुमारे अर्ध्यापेक्षा अधिक नागरिकांच्या नळांना मीटरच नसल्याचे समोर आले आहे, म्हणजे ज्यांनी मीटर बसविले त्यांनाच प्रामाणिकतेचा भुर्दंड सोसावा लागत आहे, यामुळेही नाराजी आहे. उन्हाच्या चटक्यांपेक्षा हा असमानतेचा चटका नागरिकांना असहनीय वाटत आहे.

 

अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी जी कामे हाती घेण्यात आली त्यात शहरात आठ जलकुंभ उभारावयाचे होते, त्यातील जुने शहरातील भीमनगर परिसरात प्रस्तावित असलेला जलकुंभ अद्याप महापालिकेला उभारता आलेला नाही. या जलकुंभाला तेथील काही स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने महापालिकेने पोलिसांचे संरक्षण मागितले आहे व त्यासाठीची रक्कमही भरली आहे; पण पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे, म्हणजे सर्वच पातळ्यांवर अनास्था आहे. जलकुंभाच्या प्रस्तावित जागेला विरोध असेल, तर नवीन जागा निश्चित करून काम पूर्णत्वास न्यायला हवे; पण याबाबत महापालिका प्रशासनही निवांत आहे. पाण्यासारख्या जीवन- मरणाच्या प्रश्नावर स्थानिक प्रशासनाची अशी सुस्ताड भूमिका संशयास्पदच म्हणता यावी.

 

अकोलाच नव्हे, संपूर्ण वऱ्हाडात स्थिती जवळपास सारखी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ११ पालिकांक्षेत्रात सरासरी ८ दिवसांआड नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. बहुतांश ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना जुन्या झाल्या आहेत. वाढती लोकसंख्या पाहता दीर्घकालीन नियोजनाचा तेथे अभाव दिसतो. लोणार, मलकापूरसारख्या शहरांत तर १५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. बुलडाणा शहरात तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. कारण दररोज पाणीपुरवठा करण्याची पालिकेची क्षमताच नाही. वाशिममध्ये पाइपलाइन जुनाट झाल्याने अनेक भागांत दूषित, म्हणजे अगदी अळीयुक्त पाणीपुरवठा होतो.

 

सारांशात, पाणीपुरवठ्याबाबत सर्वच ठिकाणच्या तक्रारी कायम आहेत; पण तेवढ्यापुरती बोंबाबोंब होते आणि वेळ निभावून नेली जाते. याकडे प्राधान्याने व गांभीर्याने पाहिलेच जात नाही. शासनाकडून पाण्यासाठी मिळणारे पैसे पाण्यातच जातात, असा आरोप होणे त्यामुळेच स्वाभाविक ठरते.