शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
8
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
9
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
10
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
11
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
12
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
13
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
14
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
15
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
16
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
17
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
18
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
19
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
20
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले

विकासाच्या घोळाचे अपराधी

By admin | Updated: July 15, 2014 08:56 IST

नरेंद्र मोदींचे सरकार व विशेषत: अर्थमंत्री अरुण जेटली गुंतवणूक येत्या काळात वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

डॉ.मनमोहनसिंग यांचे सरकार पायउतार झाले, तेव्हा देशाच्या बाजारपेठेत विदेशी गुंतवणूक ५० टक्क्यांच्या पुढे गेली होती. त्याअगोदरचे वाजपेयी सरकार सत्तेवरून खाली आले तेव्हाही ही गुंतवणूक २० टक्क्यांहून कमी होती. मनमोहनसिंगांच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत ती ३० टक्क्यांनी वाढली, असा याचा अर्थ आहे. आताचे नरेंद्र मोदींचे सरकार व विशेषत: अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला त्यांचा पहिला अर्थसंकल्प पाहता, ही गुंतवणूक येत्या काळात वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता दिसू लागली आहे. तिचा परिणाम चलनवाढीवर, भाववाढीवर आणि विदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीच्या अपुरेपणावर एवढ्यातच दिसूही लागला आहे. जेटली यांचा अर्थसंकल्प तत्काळ परिणाम करणाऱ्या अ‍ॅलोपॅथी औषधासारखा नसून विलंबाने कामी येणाऱ्या होमिओपॅथीच्या पांढऱ्या गोळ्यांसारखा आहे, अशी टीका जाणते अर्थशास्त्रज्ञ करू लागले आहेत. ही स्थिती अशीच चालू राहिल्यास देशाची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत पुन्हा एकवार २००४च्या वा १९९९च्या काळात जाईल, असा या तज्ज्ञांचा इशारा आहे. विदेशी गुंतवणूक ही देशाच्या आर्थिक विकासाची गती वाढविणारी महत्त्वाची बाब आहे. ही गुंतवणूक १९९१मध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि देशाच्या आर्थिक विकासाचा वार्षिक दर साडेतीन टक्क्यांहून पाच टक्क्यांवर गेला व पुढे तो साडेआठ टक्क्यांवर गेलेला जगाला दिसला. भारत ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होणार, असे भाकीत तेव्हा जगातल्या अर्थकारणाने करायला सुरुवात केली होती. मात्र, नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारच्या मागे असलेली संघ परिवाराची जुनाट मानसिकताच विदेशी गुंतवणुकीच्या विरोधात जाणारी आहे. विदेशी गुंतवणूक विदेशाचा प्रभाव आणणार आणि भारताचे सार्वभौमत्व त्यामुळे धोक्यात येणार, अशी धास्तीच या परिवाराने घेतली आहे. याचमुळे अमेरिकेशी केलेल्या अणुकराराला त्या परिवाराने व भाजपाने विरोध केला. विदेशांशी होत असलेल्या प्रत्येकच कराराला आणि त्यातून येणाऱ्या प्रत्येकच प्रस्तावाला या धास्तीपायी विरोध करण्याची संघ परिवाराची मानसिकता, हाच विकासाच्या या गतिमानतेच्या मार्गातला खरा अडसर आहे. याअगोदरची दहा वर्षे याच मानसिकतेला तोंड देत व तिच्याशी प्रखर झुंज देत डॉ. मनमोहनसिंग यांच्या चमूने देशात विदेशी पैसा आणला व तो त्याच्या विकासात गुंतविला. या ठिकाणी एका दुर्दैवी वास्तवाची नोंद करणे आवश्यक आहे. भारताला १९६७मधील जपानच्या आर्थिक विकासाचा दर्जा गाठायचा असेल व त्याला त्याच्या स्वत:च्या उत्पन्नावर तो मिळवायचा असेल, तर त्यासाठी १२७ वर्षे लागतील, असा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या दक्षिण आशियाविषयक अर्थ समितीने प्रकाशित केला होता. १९९१मध्ये देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले, तेव्हापासून त्याच्या विकासाचा दर वाढला व तो साऱ्यांना विस्मयकारीही वाटला. विदेशी गुंतवणुकीमुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येते वा त्याचा संकोच होतो, असे म्हणणे हा शुद्ध गाफीलपणा आहे. २००५पर्यंत भारतात अमेरिकेची जेवढी गुंतवणूक होती तिच्या ४५ पटींनी अधिक तिची गुंतवणूक चीनमध्ये होती. चीनचे अमेरिकेशी असलेले वैर जगजाहीर आहे, तरीही त्या देशाने अमेरिकेची प्रचंड गुंतवणूक स्वीकारली आणि त्यासाठी आपल्या सार्वभौमत्वाचा कुठेही संकोच करून घेतला नाही. भारताच्या सरकारलाही हे करता येईल. त्यासाठी त्याला राजकीय नव्हे, तर एक मानसिक बळ उभे करावे लागणार आहे. विदेशांची मदत घेऊ; मात्र ती आपल्या स्वातंत्र्याधिकाराच्या आड येऊ देणार नाही एवढेच त्याला मनोमन ठरवायचे आहे. संघ परिवाराचा साध्या किरकोळ बाजारातील, लष्करातील, विमान कंपन्यांतील विदेशी गुंतवणुकीला विरोध आहे आणि शेतीविकासाच्या योजनांतील गुंतवणूकही त्याला चालणारी नाही. मोदींचे सरकार संघाचे म्हणणे फारसे ऐकताना दिसत नसले, तरी संघाने त्या सरकारवर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी काही माणसे नियुक्त केल्याची बातमी वाचली. हा प्रकार केवळ राजकीय वा वैचारिक नियंत्रणाचा नाही, तो विकासाच्या चाकात खीळ घालणाराही आहे. शेवटी विकास करू इच्छिणाऱ्यांनाही जबर इच्छाशक्तीची जोड लागत असते. ती मनमोहनसिंगांच्या अल्पमतातील सरकारजवळ होती. ती मोदी सरकारजवळ नसेल व त्यामुळे आर्थिक विकासाची गती मंदावत असेल, तर तो केवळ त्या सरकारचा दोष ठरणार नसून साऱ्या संघ परिवाराचा अपराध राहणार आहे.