शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या घोळाचे अपराधी

By admin | Updated: July 15, 2014 08:56 IST

नरेंद्र मोदींचे सरकार व विशेषत: अर्थमंत्री अरुण जेटली गुंतवणूक येत्या काळात वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

डॉ.मनमोहनसिंग यांचे सरकार पायउतार झाले, तेव्हा देशाच्या बाजारपेठेत विदेशी गुंतवणूक ५० टक्क्यांच्या पुढे गेली होती. त्याअगोदरचे वाजपेयी सरकार सत्तेवरून खाली आले तेव्हाही ही गुंतवणूक २० टक्क्यांहून कमी होती. मनमोहनसिंगांच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत ती ३० टक्क्यांनी वाढली, असा याचा अर्थ आहे. आताचे नरेंद्र मोदींचे सरकार व विशेषत: अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला त्यांचा पहिला अर्थसंकल्प पाहता, ही गुंतवणूक येत्या काळात वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता दिसू लागली आहे. तिचा परिणाम चलनवाढीवर, भाववाढीवर आणि विदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीच्या अपुरेपणावर एवढ्यातच दिसूही लागला आहे. जेटली यांचा अर्थसंकल्प तत्काळ परिणाम करणाऱ्या अ‍ॅलोपॅथी औषधासारखा नसून विलंबाने कामी येणाऱ्या होमिओपॅथीच्या पांढऱ्या गोळ्यांसारखा आहे, अशी टीका जाणते अर्थशास्त्रज्ञ करू लागले आहेत. ही स्थिती अशीच चालू राहिल्यास देशाची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत पुन्हा एकवार २००४च्या वा १९९९च्या काळात जाईल, असा या तज्ज्ञांचा इशारा आहे. विदेशी गुंतवणूक ही देशाच्या आर्थिक विकासाची गती वाढविणारी महत्त्वाची बाब आहे. ही गुंतवणूक १९९१मध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि देशाच्या आर्थिक विकासाचा वार्षिक दर साडेतीन टक्क्यांहून पाच टक्क्यांवर गेला व पुढे तो साडेआठ टक्क्यांवर गेलेला जगाला दिसला. भारत ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होणार, असे भाकीत तेव्हा जगातल्या अर्थकारणाने करायला सुरुवात केली होती. मात्र, नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारच्या मागे असलेली संघ परिवाराची जुनाट मानसिकताच विदेशी गुंतवणुकीच्या विरोधात जाणारी आहे. विदेशी गुंतवणूक विदेशाचा प्रभाव आणणार आणि भारताचे सार्वभौमत्व त्यामुळे धोक्यात येणार, अशी धास्तीच या परिवाराने घेतली आहे. याचमुळे अमेरिकेशी केलेल्या अणुकराराला त्या परिवाराने व भाजपाने विरोध केला. विदेशांशी होत असलेल्या प्रत्येकच कराराला आणि त्यातून येणाऱ्या प्रत्येकच प्रस्तावाला या धास्तीपायी विरोध करण्याची संघ परिवाराची मानसिकता, हाच विकासाच्या या गतिमानतेच्या मार्गातला खरा अडसर आहे. याअगोदरची दहा वर्षे याच मानसिकतेला तोंड देत व तिच्याशी प्रखर झुंज देत डॉ. मनमोहनसिंग यांच्या चमूने देशात विदेशी पैसा आणला व तो त्याच्या विकासात गुंतविला. या ठिकाणी एका दुर्दैवी वास्तवाची नोंद करणे आवश्यक आहे. भारताला १९६७मधील जपानच्या आर्थिक विकासाचा दर्जा गाठायचा असेल व त्याला त्याच्या स्वत:च्या उत्पन्नावर तो मिळवायचा असेल, तर त्यासाठी १२७ वर्षे लागतील, असा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या दक्षिण आशियाविषयक अर्थ समितीने प्रकाशित केला होता. १९९१मध्ये देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले, तेव्हापासून त्याच्या विकासाचा दर वाढला व तो साऱ्यांना विस्मयकारीही वाटला. विदेशी गुंतवणुकीमुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येते वा त्याचा संकोच होतो, असे म्हणणे हा शुद्ध गाफीलपणा आहे. २००५पर्यंत भारतात अमेरिकेची जेवढी गुंतवणूक होती तिच्या ४५ पटींनी अधिक तिची गुंतवणूक चीनमध्ये होती. चीनचे अमेरिकेशी असलेले वैर जगजाहीर आहे, तरीही त्या देशाने अमेरिकेची प्रचंड गुंतवणूक स्वीकारली आणि त्यासाठी आपल्या सार्वभौमत्वाचा कुठेही संकोच करून घेतला नाही. भारताच्या सरकारलाही हे करता येईल. त्यासाठी त्याला राजकीय नव्हे, तर एक मानसिक बळ उभे करावे लागणार आहे. विदेशांची मदत घेऊ; मात्र ती आपल्या स्वातंत्र्याधिकाराच्या आड येऊ देणार नाही एवढेच त्याला मनोमन ठरवायचे आहे. संघ परिवाराचा साध्या किरकोळ बाजारातील, लष्करातील, विमान कंपन्यांतील विदेशी गुंतवणुकीला विरोध आहे आणि शेतीविकासाच्या योजनांतील गुंतवणूकही त्याला चालणारी नाही. मोदींचे सरकार संघाचे म्हणणे फारसे ऐकताना दिसत नसले, तरी संघाने त्या सरकारवर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी काही माणसे नियुक्त केल्याची बातमी वाचली. हा प्रकार केवळ राजकीय वा वैचारिक नियंत्रणाचा नाही, तो विकासाच्या चाकात खीळ घालणाराही आहे. शेवटी विकास करू इच्छिणाऱ्यांनाही जबर इच्छाशक्तीची जोड लागत असते. ती मनमोहनसिंगांच्या अल्पमतातील सरकारजवळ होती. ती मोदी सरकारजवळ नसेल व त्यामुळे आर्थिक विकासाची गती मंदावत असेल, तर तो केवळ त्या सरकारचा दोष ठरणार नसून साऱ्या संघ परिवाराचा अपराध राहणार आहे.