शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

‘नीती’चे विकासस्वप्न

By admin | Updated: April 28, 2017 23:33 IST

येत्या १५ वर्षात या देशातील प्रत्येक नागरिकाला शौचालय असलेले घर, दुचाकी अथवा चारचाकी वाहन, वीज, एसी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी

येत्या १५ वर्षात या देशातील प्रत्येक नागरिकाला शौचालय असलेले घर, दुचाकी अथवा चारचाकी वाहन, वीज, एसी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचे भव्यदिव्य स्वप्न नीती आयोगाने बघितले आहे म्हणतात. २०३१-३२ या सालात ही किमया घडून येणार आहे. एवढेच नाहीतर देशातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवा आणि पाणी मिळत असल्याचेही त्यांना या स्वप्नात दिसले आहे. स्वप्न फारच उत्तम आहे. पण सव्वाशे कोटींवर लोकसंख्या असलेल्या या देशात जेथे आजही लाखो लोक दररोज उपाशीपोटी झोपतात, भूक आणि कुपोषण हा प्रदीर्घ काळाचा अजेंडा झाला आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे नैराश्यग्रस्त शेतकरी आत्महत्या करीत असतात. अचानक अशी कुठली जादूची कांडी फिरणार आहे, ज्यामुळे प्रत्येकाला घर आणि घरासमोर कार किंवा दुचाकी उभी दिसेल तेच कळत नाही. गरिबी आणि श्रीमंतांमधील दरी मिटावी, ही प्रत्येकाचीच इच्छा आहे. परंतु आज भारताच्या प्रगतीचे जे चित्र आपण बघतो ते किती एकांगी आणि अपुरे आहे याचीही जाणीव सत्ताधारी तसेच राजकीय पुढाऱ्यांना असली पाहिजे. जगात दररोज उपाशी झोपणाऱ्या लोकांपैकी २५ टक्के एकट्या भारतातील आहेत. १५ टक्के जनता कुपोषणाने ग्रस्त आहे. जागतिक भूक निर्देशांकात जगातील ११८ विकसनशील देशांच्या यादीत भारताने ९७ क्रमांकावर असणे ही अत्याधिक शरमेची गोष्ट आहे. २०३० पर्यंत ही समस्या अशीच गंभीर असणार, असे तज्ज्ञांचे मत आहे. बेरोजगारीच्या दराने मागील १५ वर्षातील उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षी वायुप्रदूषणाने जे ४२ लाख लोक मृत्युमुखी पडले त्यातील २२ लाख केवळ भारत आणि चीनमधील आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास आर्थिक विकासाच्या स्वप्नांची गाडी सुसाट असली तरी देशातील अनेक घटकांना तिने मागे सोडून दिले आहे. म्हणूनच नीती आयोगाची ही योजना यशस्वी करण्यासाठी योग्य मार्गक्रमण आणि प्रयत्नांची गरज आहे.