शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विकास एके विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:37 IST

- मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. स्वबळ, युती, आघाडीचे दावे हवेत विरले. आयाराम-गयाराम सर्वच पक्षांमध्ये झाले. आता प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांची कसोटी आहे. शिवसेनेने ‘युती’साठी पुढे केलेला हात झिडकारलेल्या भाजपाने स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे; पण भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे ...

- मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. स्वबळ, युती, आघाडीचे दावे हवेत विरले. आयाराम-गयाराम सर्वच पक्षांमध्ये झाले. आता प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांची कसोटी आहे. शिवसेनेने ‘युती’साठी पुढे केलेला हात झिडकारलेल्या भाजपाने स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे; पण भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे अद्याप प्रचारासाठी आलेले नसल्याने उमेदवार चिंतेत आहेत. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीच्या १५ वर्षांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत विकासाचे दावेभाजपा करीत आहे. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिका कर्जमुक्त करू, असा वायदा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जळगावच्या विकासासाठी राज्य सरकारकडून २०० कोटी रुपयांचा निधी आणू असा दावादेखील महाजन यांनी केला आहे. विकासाच्या नव्या आश्वासनांना खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी आक्षेप घेत, जळगावच्या विकासात आडकाठी घालण्याचे काम राज्य सरकार आणि भाजपाचे आमदार यांनीच केल्याचा आरोप केल्याने प्रचारात रंगत वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांचा विशेष निधी केवळ आमदारांच्या आडमुठेपणामुळे अद्याप खर्ची झाली नसल्याचे सांगत एकप्रकारे भाजपाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खासदार, आमदार आणि मंत्री भाजपाचे असताना जळगाव महापालिकेला सावत्रपणाची वागणूक देण्यात आल्याचे मतदारांच्या लक्षात आणून देण्यात जैन यांना यश आले आहे. ‘बदल घडविणार’ म्हणणाऱ्या भाजपाला त्यामुळे नव्या रणनीतीचा शोध घ्यावा लागत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक हे या निवडणुकीच्यानिमित्ताने ‘संपर्कसे समर्थनतक’ या अभियानाची उजळणी करीत आहे. प्रचार सभांपेक्षा २५-५० नागरिकांशी संवाद साधताना केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीविषयी जनमानसाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न हे नेते करीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर पेटलेले आंदोलन, मालवाहतूकदारांच्या संपामुळे त्रस्त झालेले व्यापारी, उद्योजक हे भाजपापुढे अडचणीचे विषय आहेत. भाजपाचा समर्थक असलेला व्यापारी, उद्योजक केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे. चार वर्षांत नोटाबंदी, जीएसटी, रेरा, प्लॅस्टिकबंदी असे मोठे आर्थिक निर्णय घेतल्याने या वर्गात असंतोष आहे. त्याची कल्पना नेते आणि मंत्र्यांना आलेली आहे. शिवसेनेकडून सुरेशदादा जैन यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली आहे. आरोप-प्रत्यारोपापेक्षा मतदारांची भेट घेऊन त्याच्याशी सुसंवाद साधण्यावर जैन यांनी भर दिला आहे. विकासाचा मुद्दा या निवडणुकीत ऐरणीवर आला आहे.

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव