शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

विकास एके विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:37 IST

- मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. स्वबळ, युती, आघाडीचे दावे हवेत विरले. आयाराम-गयाराम सर्वच पक्षांमध्ये झाले. आता प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांची कसोटी आहे. शिवसेनेने ‘युती’साठी पुढे केलेला हात झिडकारलेल्या भाजपाने स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे; पण भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे ...

- मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. स्वबळ, युती, आघाडीचे दावे हवेत विरले. आयाराम-गयाराम सर्वच पक्षांमध्ये झाले. आता प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांची कसोटी आहे. शिवसेनेने ‘युती’साठी पुढे केलेला हात झिडकारलेल्या भाजपाने स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे; पण भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे अद्याप प्रचारासाठी आलेले नसल्याने उमेदवार चिंतेत आहेत. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीच्या १५ वर्षांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत विकासाचे दावेभाजपा करीत आहे. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिका कर्जमुक्त करू, असा वायदा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जळगावच्या विकासासाठी राज्य सरकारकडून २०० कोटी रुपयांचा निधी आणू असा दावादेखील महाजन यांनी केला आहे. विकासाच्या नव्या आश्वासनांना खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी आक्षेप घेत, जळगावच्या विकासात आडकाठी घालण्याचे काम राज्य सरकार आणि भाजपाचे आमदार यांनीच केल्याचा आरोप केल्याने प्रचारात रंगत वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांचा विशेष निधी केवळ आमदारांच्या आडमुठेपणामुळे अद्याप खर्ची झाली नसल्याचे सांगत एकप्रकारे भाजपाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खासदार, आमदार आणि मंत्री भाजपाचे असताना जळगाव महापालिकेला सावत्रपणाची वागणूक देण्यात आल्याचे मतदारांच्या लक्षात आणून देण्यात जैन यांना यश आले आहे. ‘बदल घडविणार’ म्हणणाऱ्या भाजपाला त्यामुळे नव्या रणनीतीचा शोध घ्यावा लागत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक हे या निवडणुकीच्यानिमित्ताने ‘संपर्कसे समर्थनतक’ या अभियानाची उजळणी करीत आहे. प्रचार सभांपेक्षा २५-५० नागरिकांशी संवाद साधताना केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीविषयी जनमानसाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न हे नेते करीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर पेटलेले आंदोलन, मालवाहतूकदारांच्या संपामुळे त्रस्त झालेले व्यापारी, उद्योजक हे भाजपापुढे अडचणीचे विषय आहेत. भाजपाचा समर्थक असलेला व्यापारी, उद्योजक केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे. चार वर्षांत नोटाबंदी, जीएसटी, रेरा, प्लॅस्टिकबंदी असे मोठे आर्थिक निर्णय घेतल्याने या वर्गात असंतोष आहे. त्याची कल्पना नेते आणि मंत्र्यांना आलेली आहे. शिवसेनेकडून सुरेशदादा जैन यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली आहे. आरोप-प्रत्यारोपापेक्षा मतदारांची भेट घेऊन त्याच्याशी सुसंवाद साधण्यावर जैन यांनी भर दिला आहे. विकासाचा मुद्दा या निवडणुकीत ऐरणीवर आला आहे.

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव