शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

विनाश काले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:00 IST

बरोबर एक वर्षापूर्वी दि. ८ नोव्हेंबर २०१६ ला नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा आदेश जारी करून अमलात आणला तेव्हाच तो ‘विनाशकारी’

बरोबर एक वर्षापूर्वी दि. ८ नोव्हेंबर २०१६ ला नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा आदेश जारी करून अमलात आणला तेव्हाच तो ‘विनाशकारी’ असल्याचा अभिप्राय माजी पंतप्रधान व ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. डॉ. सिंग यांचा अभिप्राय नंतरच्या घटनांनी खराही ठरवला. त्यांच्या कार्यकाळात १०.३ टक्क्यांपर्यंत वाढलेला देशाच्या आर्थिक विकासाचा दर ६.४ टक्क्यांपर्यंत खाली आला. निर्यात घटली, रोजगाराच्या संधी कमी म्हणजे ५२ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आल्या, शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या, जीवनावश्यक वस्तूंच्या भावांनी आसमान गाठले, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस भडकला, धान्ये महागडी झाली आणि भाज्याही कडाडल्या. लाखोंच्या संख्येने लोक चलनबदलासाठी बँकांसमोर रांगा लावून उभे राहिले आणि तो मनस्ताप पुरुषांएवढाच स्त्रियांनीही अनुभवला. एवढे सारे करूनही सरकारच्या हाती येणारा काळा पैसा त्याला मिळाला नाही. शून्य रकमेनिशी बँकांमध्ये खाती उघडायला लोकांना सांगितले गेले तेव्हा कोट्यवधी लोकांनी ती उघडली. सरकार त्यात आपल्या रकमा जमा करणार होते. प्रत्यक्षात त्या झाल्याच नाहीत उलट नियमानुसार कमीतकमी रक्कम भरण्यासाठी साºया खातेदारांना सांगितले गेले. शिवाय त्यांची खाती सांभाळण्याचा दर आकारायलाही बँकांनी सुरुवात केली. आता ही खाती बंद करायची तरी त्यासाठी ५०० रु. भरावे लागतात. लोकांचा पैसा काढून घेण्याची व त्यांना ‘कॅशलेस’ बनविण्याची मोदी सरकारची ही किमया जागतिक बँका, नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनांनीही चुकीची व समाजविरोधी असल्याचा एकमुखी अभिप्राय दिला. आज या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या कुमुहूर्तावर ‘आता तरी आपली चूक कबूल करा आणि साºयांचा सल्ला घेऊन अर्थव्यवस्थेला चांगले दिवस आणा’ असा सल्ला डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदींना दिला आहे. त्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी सरकारला दिले आहे. ते मान्य करण्याची व डॉ. सिंग यांचे सहकार्य घेण्याची बुद्धी मोदी सरकारला अर्थातच होणार नाही. मुजोर मनाची माणसे आम्हीच तेवढे खरे असे समजणारी असतात आणि इतरांचा सल्ला घेणे त्यांना कमीपणाचे वाटत असते. आम्ही बुडू आणि आमच्यासोबत इतरांनाही बुडवू अशीच मानसिकता असणाºयांना इतरांची मदत हाच आपला पराभव वाटत असतो. त्यामुळे डॉ. सिंग यांचा सल्ला घेण्याऐवजी त्यांना ‘प्रत्युत्तर’ कसे द्यायचे याच्या तयारीला सरकार लागले आहे. त्यासाठी त्यांनी आपले अपयशी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे कायदेपांडित्य वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सारांश, आम्ही चुका करू आणि त्या चुका कशा नाहीतच हेही वर सांगू असा हा पवित्रा आहे. अर्थकारणाच्या प्रत्येकच बाबीवर सरकारला त्याचे पाऊल आता मागे घ्यावे लागले आहे. औद्योगिक उत्पादन घटले आहे. मूठभर उद्योगपतींचा एक वर्ग सोडला तर बाकी साºयांनी चिंता करावी असा हा काळ आहे. बांधकाम व्यवसाय कोलमडला आहे, बाजारात असंतोष आहे, प्रत्यक्ष गुजरातमध्ये व्यापाºयांनी सरकारविरोधी मोर्चे काढले आहेत आणि होरपळलेला सामान्य माणूस आपली व्यथा आता उघडपणे सांगू लागला आहे. खोटी आश्वासने काही काळच लोकांना भुलवू शकतात. मात्र तो प्रकार नेहमीचा झाला की लोकांना त्यातले वैय्यर्थ कळू लागते. मग ते पंतप्रधानांना ‘फेकू’ म्हणू लागतात. त्यांची भाषणेही मग कुणाला ऐकाविशी वाटत नाहीत. मनमोहन सिंग यांनी या स्थितीत पुढे केलेला सहकार्याचा हात स्वीकारणे हे शहाणपण आहे. तो नाकारणे हा करंटेपणा आहे.

टॅग्स :Note BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदी