शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाष्य - जन्मदात्यांची निष्ठूरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:18 IST

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच.

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच. अशा खडतर प्रसंगातून सहीसलामत मार्ग काढणे म्हणजेच जीवनाच्या कसोटीला उतरणे होय. जन्मदाते इतके निष्ठूर होण्याची आणि टोकाचे पाऊल उचलण्याची ही घटना तशी पहिल्यांदाच घडली असे नव्हे. कल्याण येथील घटनेच्या तीन दिवस आधी नगर जिल्ह्यातील पोखरी बाळेश्वरच्या सोंडवस्तीत पत्नी माहेरी गेलेली असताना चिमुकला मुलगा व मुलीचा गळा आवळून अशोक फटांगरे नामक पित्याने खून केला व स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी २०१६ साली यवतमाळमध्ये कौटुंबिक कलहातून तीन मुलांसह पित्याने आत्महत्या तर एप्रिल २०१७ मध्ये नाशिकरोड येथेही याच कारणाने दोन मुलांचा गळा आवळून सुनील बेलदार या पित्याने स्वत:ला जाळून आत्महत्या केली होती. अशा प्रकारात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. कर्ज आणि कलह या गोष्टी ‘घरोघरी मातीच्या चुली’ याप्रमाणे प्रत्येक घरी आहेत, म्हणून काय प्रत्येक जण इतक्या टोकाची भूमिका घेत नसतो. एकीकडे मूलबाळ होत नसलेले दाम्पत्य वंध्यत्व निवारणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती असताना, दुसरीकडे आपल्या सोन्यासारख्या मुलांचा निष्ठूरपणे गळा आवळून, जाळून आणि भोजनात विष कालवून त्यांचा जीव घेतला जातो, यास काय म्हणावे? माता-पिता मग ते कोणतेही असोत, त्यांना केवळ जन्म देण्याचा अधिकार असतो, जीव घेण्याचा नव्हे. त्यांच्या बिकट परिस्थितीची, कर्जाची आणि कलहाची शिक्षा त्या निष्पाप कळ्यांच्या माथी मारणे हे केवळ निष्ठूरतेचेच नव्हे, तर विकृत मनोवृत्तीचे लक्षण मानायला हवे. मानवी जन्म मिळणे हे इतर जीवसृष्टीमध्ये भाग्याचे मानले जाते. त्यामुळे त्या चिमुकल्यांना जीवनाचा आनंद उपभोगण्याचा, आयुष्य म्हणजे नेमके काय असते, हे अनुभवण्याचा पूर्ण अधिकार असतो. जीवनाचा अर्थ उमगण्याच्या आतच त्यांना मृत्यू नावाच्या काळोखी खोल दरीत कायमचे लोटले जाणे आणि तेही जन्मदात्यांच्या हाताने, यासारखा दैवदुर्विलास दुसरा कोणता असूच शकत नाही. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा