शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

भाष्य - जन्मदात्यांची निष्ठूरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:18 IST

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच.

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच. अशा खडतर प्रसंगातून सहीसलामत मार्ग काढणे म्हणजेच जीवनाच्या कसोटीला उतरणे होय. जन्मदाते इतके निष्ठूर होण्याची आणि टोकाचे पाऊल उचलण्याची ही घटना तशी पहिल्यांदाच घडली असे नव्हे. कल्याण येथील घटनेच्या तीन दिवस आधी नगर जिल्ह्यातील पोखरी बाळेश्वरच्या सोंडवस्तीत पत्नी माहेरी गेलेली असताना चिमुकला मुलगा व मुलीचा गळा आवळून अशोक फटांगरे नामक पित्याने खून केला व स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी २०१६ साली यवतमाळमध्ये कौटुंबिक कलहातून तीन मुलांसह पित्याने आत्महत्या तर एप्रिल २०१७ मध्ये नाशिकरोड येथेही याच कारणाने दोन मुलांचा गळा आवळून सुनील बेलदार या पित्याने स्वत:ला जाळून आत्महत्या केली होती. अशा प्रकारात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. कर्ज आणि कलह या गोष्टी ‘घरोघरी मातीच्या चुली’ याप्रमाणे प्रत्येक घरी आहेत, म्हणून काय प्रत्येक जण इतक्या टोकाची भूमिका घेत नसतो. एकीकडे मूलबाळ होत नसलेले दाम्पत्य वंध्यत्व निवारणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती असताना, दुसरीकडे आपल्या सोन्यासारख्या मुलांचा निष्ठूरपणे गळा आवळून, जाळून आणि भोजनात विष कालवून त्यांचा जीव घेतला जातो, यास काय म्हणावे? माता-पिता मग ते कोणतेही असोत, त्यांना केवळ जन्म देण्याचा अधिकार असतो, जीव घेण्याचा नव्हे. त्यांच्या बिकट परिस्थितीची, कर्जाची आणि कलहाची शिक्षा त्या निष्पाप कळ्यांच्या माथी मारणे हे केवळ निष्ठूरतेचेच नव्हे, तर विकृत मनोवृत्तीचे लक्षण मानायला हवे. मानवी जन्म मिळणे हे इतर जीवसृष्टीमध्ये भाग्याचे मानले जाते. त्यामुळे त्या चिमुकल्यांना जीवनाचा आनंद उपभोगण्याचा, आयुष्य म्हणजे नेमके काय असते, हे अनुभवण्याचा पूर्ण अधिकार असतो. जीवनाचा अर्थ उमगण्याच्या आतच त्यांना मृत्यू नावाच्या काळोखी खोल दरीत कायमचे लोटले जाणे आणि तेही जन्मदात्यांच्या हाताने, यासारखा दैवदुर्विलास दुसरा कोणता असूच शकत नाही. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा