शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भाष्य - जन्मदात्यांची निष्ठूरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:18 IST

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच.

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच. अशा खडतर प्रसंगातून सहीसलामत मार्ग काढणे म्हणजेच जीवनाच्या कसोटीला उतरणे होय. जन्मदाते इतके निष्ठूर होण्याची आणि टोकाचे पाऊल उचलण्याची ही घटना तशी पहिल्यांदाच घडली असे नव्हे. कल्याण येथील घटनेच्या तीन दिवस आधी नगर जिल्ह्यातील पोखरी बाळेश्वरच्या सोंडवस्तीत पत्नी माहेरी गेलेली असताना चिमुकला मुलगा व मुलीचा गळा आवळून अशोक फटांगरे नामक पित्याने खून केला व स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी २०१६ साली यवतमाळमध्ये कौटुंबिक कलहातून तीन मुलांसह पित्याने आत्महत्या तर एप्रिल २०१७ मध्ये नाशिकरोड येथेही याच कारणाने दोन मुलांचा गळा आवळून सुनील बेलदार या पित्याने स्वत:ला जाळून आत्महत्या केली होती. अशा प्रकारात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. कर्ज आणि कलह या गोष्टी ‘घरोघरी मातीच्या चुली’ याप्रमाणे प्रत्येक घरी आहेत, म्हणून काय प्रत्येक जण इतक्या टोकाची भूमिका घेत नसतो. एकीकडे मूलबाळ होत नसलेले दाम्पत्य वंध्यत्व निवारणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती असताना, दुसरीकडे आपल्या सोन्यासारख्या मुलांचा निष्ठूरपणे गळा आवळून, जाळून आणि भोजनात विष कालवून त्यांचा जीव घेतला जातो, यास काय म्हणावे? माता-पिता मग ते कोणतेही असोत, त्यांना केवळ जन्म देण्याचा अधिकार असतो, जीव घेण्याचा नव्हे. त्यांच्या बिकट परिस्थितीची, कर्जाची आणि कलहाची शिक्षा त्या निष्पाप कळ्यांच्या माथी मारणे हे केवळ निष्ठूरतेचेच नव्हे, तर विकृत मनोवृत्तीचे लक्षण मानायला हवे. मानवी जन्म मिळणे हे इतर जीवसृष्टीमध्ये भाग्याचे मानले जाते. त्यामुळे त्या चिमुकल्यांना जीवनाचा आनंद उपभोगण्याचा, आयुष्य म्हणजे नेमके काय असते, हे अनुभवण्याचा पूर्ण अधिकार असतो. जीवनाचा अर्थ उमगण्याच्या आतच त्यांना मृत्यू नावाच्या काळोखी खोल दरीत कायमचे लोटले जाणे आणि तेही जन्मदात्यांच्या हाताने, यासारखा दैवदुर्विलास दुसरा कोणता असूच शकत नाही. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा