शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

मतदाराच्या मानसिकतेविषयी उत्कंठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 13:26 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य मतदारावर वेगवेगळ्या मुद्यांचा भडीमार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. भारताची ऐतिहासिक, भौगोलिक रचना ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य मतदारावर वेगवेगळ्या मुद्यांचा भडीमार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. भारताची ऐतिहासिक, भौगोलिक रचना पाहता वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे प्रश्न, भूमिका घेऊन राजकीय पक्ष प्रचार करताना दिसत आहेत. मतदारांना मनविण्यासाठी सत्ताधारी पक्ष हा स्वत: पाच वर्षे केलेल्या कामगिरीची वैशिष्ट्ये सांगत असतो. पाच वर्षांतील कामगिरीला उजाळा देत असतो. काही त्रूटी, कमतरता असतील, त्याकडे मतदारांनी दुर्लक्ष करावे म्हणून उजळ गोष्टींवर अधिक भर देताना दिसतो. याउलट विरोधी पक्ष हा सरकारच्या त्रुटी, कमतरता, अयशस्वी किंवा अपयश आलेल्या बाबींवर अधिक जोर देत असतो. केवळ त्या आणि त्याच गोष्टी मतदारांपुढे मांडायचा प्रयत्न करीत असतो.भाजपने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्याची स्थिती आठवून पहा. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांच्याविषयी दोन मतप्रवाह होते. गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतरच्या दंगलींची पार्श्वभूमी एकीकडे आणि विकासाचे मॉडेल म्हणून गुजराथ राज्याचे नाव घेतले जाणे हे दुसरीकडे होते. मोदी यांच्यासारखा नेता हा गुजरातसारख्या एका राज्याचा विकास करु शकतो, तर देशाचा विकास करण्यासाठी त्यांच्यासारखे नेतृत्व हवे, असा प्रचार भाजपने खुबीने केला आणि मतदारांना तो भावला. जे राज ठाकरे हे मोदी आणि त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीवर बोट ठेवत आहेत, तेच राज ठाकरे हे गुजरात राज्याचे राजशिष्टाचारासह प्रमुख अतिथी म्हणून तेथे गेले आणि मोदींची तोंडभरुन स्तुती अनेक दिवस करीत राहिले. मोदी यांच्या पायाचे तीर्थ महाराष्टÑातील सत्ताधाऱ्यांनी रोज सकाळी प्यायला हवे, हे त्यांचेच वाक्य आता भाजप ‘लाव रे तो व्हीडिओ’ला प्रत्युत्तर म्हणून मतदारांपुढे आणत आहे. विकासपुरुष म्हणून मोदी यांची प्रतिमानिर्मिती करण्यात आली आणि ती मतदारांना भावली. अण्णा हजारे, आम आदमी पार्टी, केजरीवाल, रामदेवबाबा यांनी त्यावेळी सुरु केलेले भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चरमसीमेवर पोहोचले होते. पाकिस्तानशी संबंध ताणलेले होते. अशावेळी मोदी हेच सर्व प्रश्नांना उत्तर आहे, हे भासविण्यात, ठसविण्यात भाजप यशस्वी झाला आणि मतदार राजी झाला.आता विरोधी पक्षदेखील भाजपच्या रणनीतीचा अवलंब करीत पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष कृती यातील फरक ठळकपणे मतदारांपुढे मांडत आहे. प्रत्येक मतदाराच्या खात्यात १५ लाख रुपये, काळा पैसा बाहेर आणणे, पाकिस्तानला जशास तसे उत्तर, दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकरी ही प्रमुख आश्वासने भाजपने पाच वर्षांपूर्वी दिली होती. आता याच मुद्यांवर विरोधी पक्षांनी भाजपला घेरले आहे. काँग्रेसने तर ७२ हजार रुपयांची गरीब लोकांसाठीची न्याय योजना आणून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने गरिबांची जनधन खाती उघडली, त्यात आम्ही ही रक्कम टाकू, असे आता काँग्रेस सांगत आहे. काळा पैसा तर आला नाही, परंतु नोटबंदीने उद्योग-व्यापाराला फटका बसल्याचा आणि नोटा बदलण्यासाठी रांगा लावणाºया सुमारे २०० लोकांचा मृत्यू झाला आहे, हेदेखील विरोधक प्रकर्षाने मांडत आहेत. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी ४० जवानांची हत्या केली, पण आम्ही एअर स्ट्राईक केल्याचे भाजप म्हणत आहे. २५० दहशतवादी ठार केल्याचा दावा केला जात आहे, या दाव्यावर विरोधी पक्ष शंका घेत आहे. आमचा एक सैनिक मारला तर आम्ही त्यांचे दहा मारु हा दावा भाजप करीत होता, पण पुलवामानंतर असे कुठे घडले, असा सवाल विरोधक विचारत आहेत. दोन कोटी लोकांना दरवर्षी नोकरी हे आश्वासन तर हवेत विरले. नोटबंदी, जीएसटी, रेरा या लागोपाठ घेतलेल्या आर्थिक निर्णयामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. भाजपचे आश्वासन हवेत विरले, हे विरोधक आक्रमकपणे मांडत आहे.पाच वर्षांपूर्वी भाजपच्या विकासाच्या स्वप्नाला भुललेला मतदार आता देशातील वास्तवाविषयी भाजप आणि विरोधी पक्ष यांनी केलेल्या दाव्यामुळे पुरता गोंधळला आहे. त्यामुळे नेमके कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे हे त्याने त्याच्यापुरते ठरविले आहे. चार टप्प्यात झालेले कमी मतदान हे मतदाराच्या गोंधळलेल्या मानसिकतेचा तर परिणाम नाही ना? ज्यांनी केले त्यांनी कुणाला केले हे कोडे अखेर २३ मे रोजी उलगडणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव