शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मतदाराच्या मानसिकतेविषयी उत्कंठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 13:26 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य मतदारावर वेगवेगळ्या मुद्यांचा भडीमार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. भारताची ऐतिहासिक, भौगोलिक रचना ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य मतदारावर वेगवेगळ्या मुद्यांचा भडीमार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. भारताची ऐतिहासिक, भौगोलिक रचना पाहता वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे प्रश्न, भूमिका घेऊन राजकीय पक्ष प्रचार करताना दिसत आहेत. मतदारांना मनविण्यासाठी सत्ताधारी पक्ष हा स्वत: पाच वर्षे केलेल्या कामगिरीची वैशिष्ट्ये सांगत असतो. पाच वर्षांतील कामगिरीला उजाळा देत असतो. काही त्रूटी, कमतरता असतील, त्याकडे मतदारांनी दुर्लक्ष करावे म्हणून उजळ गोष्टींवर अधिक भर देताना दिसतो. याउलट विरोधी पक्ष हा सरकारच्या त्रुटी, कमतरता, अयशस्वी किंवा अपयश आलेल्या बाबींवर अधिक जोर देत असतो. केवळ त्या आणि त्याच गोष्टी मतदारांपुढे मांडायचा प्रयत्न करीत असतो.भाजपने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्याची स्थिती आठवून पहा. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांच्याविषयी दोन मतप्रवाह होते. गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतरच्या दंगलींची पार्श्वभूमी एकीकडे आणि विकासाचे मॉडेल म्हणून गुजराथ राज्याचे नाव घेतले जाणे हे दुसरीकडे होते. मोदी यांच्यासारखा नेता हा गुजरातसारख्या एका राज्याचा विकास करु शकतो, तर देशाचा विकास करण्यासाठी त्यांच्यासारखे नेतृत्व हवे, असा प्रचार भाजपने खुबीने केला आणि मतदारांना तो भावला. जे राज ठाकरे हे मोदी आणि त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीवर बोट ठेवत आहेत, तेच राज ठाकरे हे गुजरात राज्याचे राजशिष्टाचारासह प्रमुख अतिथी म्हणून तेथे गेले आणि मोदींची तोंडभरुन स्तुती अनेक दिवस करीत राहिले. मोदी यांच्या पायाचे तीर्थ महाराष्टÑातील सत्ताधाऱ्यांनी रोज सकाळी प्यायला हवे, हे त्यांचेच वाक्य आता भाजप ‘लाव रे तो व्हीडिओ’ला प्रत्युत्तर म्हणून मतदारांपुढे आणत आहे. विकासपुरुष म्हणून मोदी यांची प्रतिमानिर्मिती करण्यात आली आणि ती मतदारांना भावली. अण्णा हजारे, आम आदमी पार्टी, केजरीवाल, रामदेवबाबा यांनी त्यावेळी सुरु केलेले भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चरमसीमेवर पोहोचले होते. पाकिस्तानशी संबंध ताणलेले होते. अशावेळी मोदी हेच सर्व प्रश्नांना उत्तर आहे, हे भासविण्यात, ठसविण्यात भाजप यशस्वी झाला आणि मतदार राजी झाला.आता विरोधी पक्षदेखील भाजपच्या रणनीतीचा अवलंब करीत पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष कृती यातील फरक ठळकपणे मतदारांपुढे मांडत आहे. प्रत्येक मतदाराच्या खात्यात १५ लाख रुपये, काळा पैसा बाहेर आणणे, पाकिस्तानला जशास तसे उत्तर, दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकरी ही प्रमुख आश्वासने भाजपने पाच वर्षांपूर्वी दिली होती. आता याच मुद्यांवर विरोधी पक्षांनी भाजपला घेरले आहे. काँग्रेसने तर ७२ हजार रुपयांची गरीब लोकांसाठीची न्याय योजना आणून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने गरिबांची जनधन खाती उघडली, त्यात आम्ही ही रक्कम टाकू, असे आता काँग्रेस सांगत आहे. काळा पैसा तर आला नाही, परंतु नोटबंदीने उद्योग-व्यापाराला फटका बसल्याचा आणि नोटा बदलण्यासाठी रांगा लावणाºया सुमारे २०० लोकांचा मृत्यू झाला आहे, हेदेखील विरोधक प्रकर्षाने मांडत आहेत. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी ४० जवानांची हत्या केली, पण आम्ही एअर स्ट्राईक केल्याचे भाजप म्हणत आहे. २५० दहशतवादी ठार केल्याचा दावा केला जात आहे, या दाव्यावर विरोधी पक्ष शंका घेत आहे. आमचा एक सैनिक मारला तर आम्ही त्यांचे दहा मारु हा दावा भाजप करीत होता, पण पुलवामानंतर असे कुठे घडले, असा सवाल विरोधक विचारत आहेत. दोन कोटी लोकांना दरवर्षी नोकरी हे आश्वासन तर हवेत विरले. नोटबंदी, जीएसटी, रेरा या लागोपाठ घेतलेल्या आर्थिक निर्णयामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. भाजपचे आश्वासन हवेत विरले, हे विरोधक आक्रमकपणे मांडत आहे.पाच वर्षांपूर्वी भाजपच्या विकासाच्या स्वप्नाला भुललेला मतदार आता देशातील वास्तवाविषयी भाजप आणि विरोधी पक्ष यांनी केलेल्या दाव्यामुळे पुरता गोंधळला आहे. त्यामुळे नेमके कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे हे त्याने त्याच्यापुरते ठरविले आहे. चार टप्प्यात झालेले कमी मतदान हे मतदाराच्या गोंधळलेल्या मानसिकतेचा तर परिणाम नाही ना? ज्यांनी केले त्यांनी कुणाला केले हे कोडे अखेर २३ मे रोजी उलगडणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव