शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

ही तर ‘पर्यावरणप्रेमी श्रीं’ची इच्छा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:38 IST

विज्ञान, धर्म आणि पर्यावरण, बघायला गेलं तर काय फरक आणि काय नाही...

- बिल्वदा काळे-बक्षीविज्ञान, धर्म आणि पर्यावरण, बघायला गेलं तर काय फरक आणि काय नाही... वेगळे आहेत खरंच की सारे एकच? विज्ञान म्हणतं कणाकणात ऊर्जा आहे तर धर्म म्हणतो कणाकणात देव आहे, ऊर्जा किंवा शक्तीचा उगम म्हणजे देव, हो ना? म्हणून तर आपण प्रत्येक शुभ कार्य गणपती बाप्पाचं पूजन करून आरंभ करतो.खरेतर पर्यावरण आणि धर्म यातील काही सारखे तर काही वेगळे पैलू आहेत. गेल्या कित्येक वर्षांत आपला देश खूप विकसित झाला. आर्थिक, सामाजिक, तंत्रशास्त्र असा सर्वंकष विकास झाला. पण या विकासात एक अगदी महत्त्वाची बाजू कुठेतरी हरवली, ती म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. प्रगती तर झाली पण ती कायमस्वरूपी राखणंदेखील तितकंच आवश्यक आहे. या प्रगतीच्या मार्गावर पर्यावरण मागे सुटत गेलं. पर्यावरणाची होणारी हानी वाढू लागली. आपल्या भोवतीची जंगलं, झाडं, नद्या, काहीच प्रतिक्रिया न देता त्यांना होणारं प्रत्येक दु:ख आजवर सहन करत गेले पण गेल्या काही वर्षांत परिणाम दिसू लागले. नद्या सुकू लागल्या, ग्लोबल वॉर्मिंग वाढले, अ‍ॅसिड रेनचे प्रमाण वाढले. प्रदूषण तर सर्वांगीच पसरले. आता झालेल्या हानीची नोंद घेणं अनिवार्य झालं. आणि त्याचे परिणाम किती सुखद!पर्यावरणाबाबतची जागरूकता नक्कीच वाढत चालली आहे. आज फक्त काही पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर कंपनी, खास संघटना, एनजीओ, शैक्षणिक संस्था तसेच सरकारसुद्धा पर्यावरणासाठी कार्यरत होत आहे. अगदी सामान्य माणूससुद्धा दैनंदिन जीवनात पर्यावरणस्नेही कार्य करत असतो. हे अतिशय उठून दिसतं ते म्हणजे आपल्या सणावाराच्या दिवशी. गणेशोत्सवाचं बघा ना! पारंपरिक शाडूची मूर्ती परत स्वीकारली जातेय. त्याचसोबत आजकाल वेगवेगळे सर्जनशील पर्यावरणप्रेमी विविध नवीन प्रयोग करत असतात, जसे लाल मातीची मूर्ती ज्यात बिया पेरलेल्या असतात म्हणजे गणेश विसर्जन कुंडीत करा आणि त्याचे झाड जोपासता येईल! कागदाच्या लगद्याची मूर्तीसुद्धा तितकीच प्रसिद्धी मिळवतेय. आजकाल प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती कमी होऊन शाडूच्या मूर्ती जास्त दिसतात.बाप्पांभोवतीची आरास हल्ली बदलू लागली आहे. थर्मोकोलच्या जागी कागद, पुठ्ठा, कागदी फुले, खरी फुले, लाकडी देव्हारा जास्त बघायला मिळतो. हादेखील आशावादी संदेश म्हणू शकतो. थर्माकोल खूप काळ कचऱ्यात जसाच्या तसा राहतो आणि आपला परिसर अस्वच्छ करतो. याउलट कागदाचं विघटन लवकर होऊन हानी कमी होते. इतकंच नव्हेतर, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आता बदल होतोय. आपण निर्माल्य मातीत मिसळून त्याचं छान खत करू नये?आता तर सरकार नियम बदलतंय, सार्वजनिक गणेशोत्सवाचे मांडव कमी करणं, मिरवणुकीत आवाज नियंत्रित असावा, विसर्जनासाठी कृत्रिम स्रोत, तलाव बनवणं असे विविध उपक्रम राबवले जातात. लहान लहान मुलं पर्यावरणाची काळजी घेऊ लागलीत. अशीच वाटचाल करत निश्चितच पर्यावरणासोबत माणसाची प्रगती नुसती कायम नव्हे, तर अखंड होत राहील. मग पर्यावरण, विज्ञान आणि श्रद्धा व आपला धर्म हे एकत्र येऊन होणारा संगम अद्भुत होईल.(साहाय्यक प्राध्यापक, पारुल विद्यापीठ, बडोदा)