शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नाट्यात देशमुखांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

By किरण अग्रवाल | Updated: June 26, 2022 17:47 IST

सारांश : बुलडाण्यात पक्षाऐवजी नेत्यांशी निष्ठा असल्याचे अधोरेखित

किरण अग्रवाल

शिवसेनेतील बंडातून आमदार नितीन देशमुख यांनी बाहेर पडून सत्तेचे राजकारण करू पाहणाऱ्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. उद्या राजकीय जोडतोड काहीही होवो; पण देशमुखांची ही व्हाया गुवाहाटी, सुरतेहून सुटकेची हाराकिरी नोंद घेण्याजोगीच ठरून गेली आहे, हे नक्की.

--------------------------

राज्याच्या राजकारणात घडून आलेल्या भूकंपामुळे सध्या जर-तरच्या शक्यतांची चर्चा जोरात आहे; पण त्याचसोबत पक्षाऐवजी व्यक्तिगत निष्ठांची चलतीही अधोरेखित होऊन गेली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार गुवाहाटी मुक्कामी असून, आता त्यांचे समर्थनही सुरू झाल्याने ही व्यक्तीनिष्ठा उघड झाली आहे.

---------------------

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षात घडवून आणलेल्या बंडामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. अर्थात शिवसेनेला बंडाळ्या नवीन नसल्या तरी, यंदाचे बंड मोठे आहे व त्याची धग पक्ष संघटनेला मोठ्या प्रमाणात बसण्याची लक्षणे दिसत आहेत. विशेष बाब अशी की, या बंडातही वऱ्हाडातील नेत्यांनी चर्चेचा झोत आपल्याकडे राखून या संदर्भातील परंपरा अबाधित राखली म्हणायचे. विद्यमान सरकारच्याच प्रारंभीच्या काळात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित दिसलेले राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे नंतर माघारी फिरत पक्षासोबत राहिल्याचे दिसले होते, त्याचप्रमाणे आताच्या शिंदे यांच्या बंडात प्रारंभी सहभागी दिसलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख हे तेथून सुटका करून घेत अकोलामार्गे मुंबईत परतले आहेत. या सुटकेच्याही वेगवेगळ्या कथा पुढे येत आहेत, हा भाग वेगळा; परंतु यासंदर्भाने तेव्हाही व आजही घडलेल्या राजकीय नाट्यात अडचणीत आलेल्या पक्षासाठी या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचा इतिहास मात्र नोंदला गेला आहे.

---------------------

उद्या काय होईल, याबाबत सारे जर-तरच्याच पातळीवर असले तरी आमदार देशमुख यांनी यात बहुतेक साथीदारांच्या भूमिकेपेक्षा वेगळा विचार करीत त्यांच्यापासून निसटण्याची जी बाजी लावली ती कौतुकास्पद म्हणता यावी. पक्षातील अन्य काही सहकारी एकापाठोपाठ एक प्रवाहपतित होत असताना देशमुख यांनी असा बाणेदारपणा दाखवावा, हे यात लक्षणीय आहे. त्यामुळेच नागपुरात व अकोल्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केल्याचे दिसून आले. यातून देशमुख यांची उंची तर वाढलीच, शिवाय सामान्य शिवसैनिकांची द्विधा अवस्थाही दूर झाली. राजकारणात सर्वच निर्णय लाभाचे ठरतात असे नाही. प्रसंगी नुकसान पत्करण्याची तयारी ठेवूनही निर्णय घ्यावे लागतात; पण असे होते तेव्हा त्यातून संबंधितांची प्रतिमा अधिक उजळून निघाल्याखेरीज राहत नाही. देशमुखांच्या वापसीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमाकडे त्याच दृष्टीने बघता यावे.

--------------------–-

बुलडाण्यात मात्र संजय रायमुलकर व संजय गायकवाड हे दोन्ही आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. या दोघांच्या निवडीत महत्त्वाची भूमिका असलेले खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेंसोबत नसल्याचे सांगत असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा भाजप परवडली, असे ते म्हणतात; यावरून त्यांचा कल लक्षात यावा. पूर्णपणे जाधव यांच्या मर्जीतील दोन्ही आमदार थेट काटकोनात वळून शिंदेंकडे जातात कसे, असा प्रश्न म्हणूनच शंकांना जन्म देणारा ठरला आहे. यातही लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ज्यांनी घडविले त्या जाधवांना विश्वासात न घेता हे दोन्ही आमदार शिंदेंकडे गेले असतील याबाबत कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. ज्येष्ठतेसोबतच पक्षातील संपर्क प्रमुख पदाचीही जबाबदारी असलेल्या जाधवांच्या जिल्ह्यात अपवाद वगळता त्यांचे समर्थनच होतांना दिसते, ते त्यामुळेच. खासदार जाधव असोत की दोघे आमदार, बुलडाणा जिल्ह्यात पक्षापेक्षा या नेत्यांवर निष्ठा असणाराच वर्ग असल्याचे यातून स्पष्ट व्हावे. तेव्हा असे का झाले?, जागोजागी पक्षापेक्षा नेत्यांच्या निष्ठेचे पेव का वाढीस लागले, याचाच विचार पक्षाने गांभीर्याने करण्याची गरज आहे.

--------------------

विदर्भातील शिवसेनेच्या तिघा खासदारांपैकी एक असलेल्या वाशिमच्या भावना गवळी यांनीही बंडखोरांची भावना समजून घेण्याची वकिली पक्षप्रमुखांकडे केल्याचे पाहता शंकांना संधी मिळून जावी. त्यांच्यामागे लागलेल्या ‘ईडी’च्या चौकशीचा फेरा लक्षात घेता या शंकांना आधार लाभत असल्याचा अंदाज बांधला गेला तर त्याकडेही दुर्लक्ष करता येऊ नये; पण वाशिममध्येही व्यक्तीनिष्ठांची मांदियाळी अधिक असल्याने संभ्रमाचेच चित्र आहे.

-------------------------------

सारांशात, राज्यातील राजकीय उलथापालथीच्या प्रयत्नातून निष्ठांचा बाजार चर्चेत येऊन गेला असून, या बंडात बुलडाणा जिल्ह्यातील दोघा आमदारांचा समावेश असल्याने व अकोल्याचे देशमुख माघारी आल्याने वऱ्हाडाचा डंका वाजून जाणे स्वाभाविक ठरले आहे.