शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकमानसाची योग्य दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:42 IST

‘मन की बात’च्या माध्यमाने देशवासीयांच्या नियमित संपर्कात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता लोकांच्या हृदयाचा ठाव घेत त्यानुसार वागण्याबोलण्याची कला चांगलीच अवगत झाली आहे.

‘मन की बात’च्या माध्यमाने देशवासीयांच्या नियमित संपर्कात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता लोकांच्या हृदयाचा ठाव घेत त्यानुसार वागण्याबोलण्याची कला चांगलीच अवगत झाली आहे. त्यांच्या विरोधकांनाही हे मान्य करावे लागेल. लोकांशी थेट संपर्क साधण्याचा त्यांचा स्वभाव देशवासीयांना भावला आहे. आपल्या संपर्कात येणाºया प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थात भावनांच्या या देवाणघेवाणीत सोशल मीडियाचीही मोठी भूमिका आहे. मध्यंतरी आग्राच्या मिर्झापूरमधील एका शेतकरी दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव पंतप्रधानांनी ठेवावे अशी इच्छा जाहीर केली होती. एरवी हा खुळेपणाच समजला गेला असता. पण मोदींनी त्यांना निराश न करता त्यांच्या कन्येचे ‘वैभवी’ असे नामकरण केले. अलीकडेच मोदींच्या अ‍ॅपचे लाँचिंग झाले. यावर त्यांनी लोकांच्या सूचना मागितल्या होत्या. पंतप्रधानांनी पुष्पगुच्छ स्वीकारु नये अशा आशयाच्या सूचनाही यावर प्राप्त झाल्या होत्या. आपण एकट्याने पुष्पगुच्छ स्वीकारणे बंद केले तरी वर्षाला दीड कोटी रुपयांची बचत होईल, हे लक्षात आणून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशांतर्गत दौºयात पुष्पगुच्छ देऊ नका असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. हा निर्णय स्वागतार्ह असाच आहे. पंतप्रधानांप्रमाणेच इतर नेते, केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनीही त्याचे पालन केल्यास पुष्पगुच्छांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार असून गरिबांसाठी राबविल्या जाणाºया योजना आणि सामाजिक उत्थानासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. पुष्पगुच्छांवर खर्च केला जावा की जाऊ नये यावर नेहमीच चर्चा होत असते. पुष्पगुच्छ खरेदी बंद झाल्यास फुलांचा व्यवसाय करणाºयांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु भावना व्यक्त करण्यासाठी दिला जाणारा ५०० ते १००० रुपयांचा हा पुष्पगुच्छ अवघ्या काही मिनिटातच कोमेजतो आणि कचरापेटीत जातो, हे सुद्धा एक वास्तव आहे. हा पैसा विधायक कार्यात लागू शकतो. यासंदर्भातील एक स्तुत्य उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंटस् असोसिएशनतर्फे राबविला जात आहे. दीक्षाभूमी अथवा चैत्यभूमीवर बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरिता पुष्पहार अथवा फुले आणण्यापेक्षा एक वही व पेन आणावा, असे आवाहन संघटनेने केले आहे आणि हा उपक्रम यशस्वी ठरतो आहे. या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. देश आणि देशवासीयांप्रती असलेली हीच संवेदनशिलता कुठल्याही देशास प्रगतीपथावर नेत असते.