शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

सुखाच्या ठिपक्यांची रांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2023 09:40 IST

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संशोधकांनी नामवंतांची उणीव भासू दिली नाही.

देश-विदेशातील वैज्ञानिक, अभ्यासक, संशोधकांचा महामेळावा असे ज्याचे वर्णन केले जाते ती इंडियन सायन्स काँग्रेस नागपुरात पार पडली. स्वातंत्र्यापूर्वी, किंबहुना जनमानसात स्वातंत्र्याची ऊर्मी दाटून येण्याआधी, १९१४ साली सुरू झालेल्या आयोजनाची ही १०८ वी आवृत्ती. शताब्दी साजरी करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे या काँग्रेसचे यजमानपद होते. तिकडे चीनमधून कोविड-१९ विषाणूचा नवा अवतार पुन्हा एकदा जगात विध्वंस घालायला निघालेला असताना हे आयोजन झाले. २००९ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल विजेत्या एडा योनाथ वगळता विदेशातून कुणी मोठे शास्त्रज्ञ न येण्यामागे कदाचित ते कारण असावे; पण विज्ञान कोणाची वाट पाहात नाही याचा प्रत्यय आला.

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संशोधकांनी नामवंतांची उणीव भासू दिली नाही. अनेक विस्मयकारक संशोधनांची माहिती जगासमोर आली. विशेषत: संरक्षण सिद्धता, गुप्तचर यंत्रणा, मानसिक आरोग्य, वाढत्या नैराश्याचा धोका, प्राणी व वनस्पतींची जनुकीय रचना, जीव वाचविण्यासाठी व सामान्यांचे जगणे सुखी बनविण्यासाठी होणारे जनुकीय बदल, बदलती जीवनशैली व अन्य कारणांनी नपुंसकत्वासारखे धोके, जीवघेण्या आजारांवरील लस, अंतराळस्वारीची स्वप्ने, अंतराळातील पोटपूजा अशा बऱ्याच नव्या गोष्टींची ओळख या सायन्स काँग्रेसने करून दिली.

राेजच्या बातम्यांनी सामान्यांचे जगणे जितके भयप्रद व संकटग्रस्त वाटते तितके ते नाही किंवा भविष्यात तरी ते तसे असणार नाही, याची खात्री देणारे हे प्रयोग व्याख्याने, परिसंवाद व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या हजारोंना भावले. गेल्या काही वर्षांमधील ही अधिवेशने अवैज्ञानिक गोष्टींसाठीच गाजली. कुणी महाभारतकाळात दूरचित्रवाणीच्या गप्पा हाणल्या, कुणी गणेशाचा जन्म हाच मुळी विश्वातली पहिली प्लास्टिक सर्जरी होती, असे सांगितले. असे काही चित्र- विचित्र नागपूरमधून बाहेर गेले नाही. त्याचे कारण, या ना त्या कारणांनी राजकीय मंडळी आली नाहीत.

बऱ्यापैकी शुद्ध वैज्ञानिक चर्चा अनुभवता आली. महिला सशक्तीकरणातून शाश्वत विकास हे नागपूरच्या सायन्स काँग्रेसचे सूत्र होते. सोबत शेतकरी व आदिवासींच्या जगण्यातील विज्ञानही जोडले गेले. तथापि, बीजमाता, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची उपस्थिती सोडली तर या तिन्ही घटकांच्या जगण्यातील, भावविश्वातील विज्ञानाचे पापुद्रे फारसे उलगडले नाहीत. उलट,  अधिवेशनाला महिलांची गर्दी व्हावी म्हणून हळदी-कुंकू व संक्रांतीच्या तोंडावर तीळगूळ वाटप झाले. आयोजकांपैकी एका विदुषींनी घरासमोरची रांगोळी वैज्ञानिकदृष्ट्या कशी शुभ असते, यावर तारे तोडल्याने माध्यमांना चटपटीत बातम्या मिळाल्या. बाकी या सायन्स काँग्रेसचे आयोजन मात्र दर्जाला साजेसे झाले नाही. सगळीकडे सावळागोंधळ होता.

विद्यापीठ परिसरात आलेल्या प्रत्येकाची ससेहोलपट होत होती. अर्थात, ही टीका करतानाच विद्यापीठाच्या अडचणीही समजून घ्यायला हव्यात. पहिली बाब म्हणजे हे एक आपत्कालीन आयोजन होते. दरवर्षी जानेवारी महिन्यात ३ तारखेला ही काँग्रेस सुरू होते आणि समारोपावेळी ७ तारखेला पुढच्या स्थळाची घोषणा होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे आयोजन झाले नाही. त्याआधीची काँग्रेस बंगळुरू येथे जानेवारी २०२१ मध्ये झाली; परंतु, पुढचे ठिकाण ठरले नाही. आताही ते ठरलेले नाही. गेल्या ऑगस्ट महिन्यात नागपूर विद्यापीठाचे शताब्दी वर्ष सुरू झाले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे आयोजन नागपूरकडे आले. तयारीला चार-पाच महिनेच मिळाले. शिरस्त्याप्रमाणे उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. त्यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे ते आले नाहीत. या आठवड्यातील बहुतेक कार्यक्रम त्यांनी आभासी पद्धतीने केले.

पंतप्रधान येणार म्हणून भव्य शामियाना उभारण्यात आला होता. काही परिसंवादांवेळी रिकामा दिसला तो हाच मंडप. १९७४ नंतर प्रथमच नागपूरमध्ये सायन्स काँग्रेस झाली. अशा मोठ्या आयोजनाची विद्यापीठाची पाच दशकांमधील पहिलीच वेळ. काही निमंत्रितांनी पाठ फिरवली तरी किमान निमंत्रित विमानतळ, रेल्वेस्थानकापासून मुक्कामाच्या ठिकाणी सहज पोचतील, नोंदणी, व्याख्याने, प्रदर्शन, भोजनकक्ष अशा ठिकाणी त्यांना कमीतकमी त्रास होईल, रोजच्या कार्यक्रमांची आगाऊ माहिती, त्यातील बदल तातडीने कळतील, अशी व्यवस्था करणे शंभर वर्षे जुन्या विद्यापीठाला अशक्य नव्हते; पण ते झाले नाही हे मात्र खरे! हे नियोजनातले गालबोट सोडले, तर या इंडियन सायन्स काँग्रेसने भविष्याची उमेद तेवढी दिली!

टॅग्स :nagpurनागपूर