शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

विशेष मुलाखत - पैसा आणि बळ वापरून लोकशाहीची हत्या सुरू आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:59 IST

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांची लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत.

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांची लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत.

नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर  आपण निवडणूक लढवत आहात?घटनात्मक लोकशाही प्रक्रिया आणि संस्था वाचवणे, हा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आज लोकशाही संकटात आहे.

मोदी सरकारला तर सतत लोकांचे समर्थन मिळते आहे, मग लोकशाही संकटात कशी? त्यांना कर्नाटकात बहुमत मिळाले होते का? मध्य प्रदेशात किंवा महाराष्ट्रात मिळाले होते का? लोकांनी निवडून दिलेली सरकारे भाजपा एकामागून एक पाडत आहे; आणि तेथे आपले सरकार स्थापन करत आहे. त्यांचे म्हणणे असे की, निवडणुकीत निवडून कोणीही येऊ द्या, सरकार आमचेच होईल. पैसा आणि बळ वापरून सरकारे स्थापन केली जात आहेत. राजकीय हितासाठी सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. लोकशाहीची हत्या होत असल्याने ती वाचवणे जरुरीचे आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर होईल का? या निवडणुकीत मतदारांची संख्या पुष्कळच कमी असते. देशातले खासदार अधिक परिपक्व आणि समजदार आहेत. सर्वच पक्षातले खासदार सध्याची राजकीय परिस्थिती पाहून चिंतित आहेत. या निवडणुकीत आपल्याला धक्का देणारा निकाल पाहायला मिळेल, असा मला विश्वास वाटतो.

यशवंत सिन्हा यांना केवळ २०८ खासदारांचा पाठिंबा मिळाला. आपल्याला काय अपेक्षा आहेत? द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. अनेक पक्षातले आदिवासी आमदार आणि खासदार यांनी खुलेपणाने मत दिले. त्यामुळे सिन्हा यांना जितकी मते मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाहीत.

मग काँग्रेस पक्षाने इतक्या वर्षात एखाद्या आदिवासीला एवढ्या महत्त्वाच्या पदाची उमेदवारी न देऊन चूक केली का? तो एक स्वतंत्र प्रश्न आहे. काँग्रेसने के. आर. नारायणन यांच्या रूपात पहिला दलित राष्ट्रपती देशाला दिला. प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिली महिला राष्ट्रपती, डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या रूपात पहिला अल्पसंख्याक राष्ट्रपती दिला.

अल्पसंख्याक वर्गातील दक्षिण भारतीय महिला असल्याने आपल्याला यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा जास्त मते मिळतील, असे वाटते का? सर्व पक्षात माझे मित्र आणि पाठीराखे आहेत. पक्षीय बंधने बाजूला ठेवून ते मला मत देतील, असा विश्वास वाटतो. गेली ५० वर्षे मी अत्यंत स्वच्छ असे सामाजिक जीवन जगले.

पण आता तर तृणमूल काँग्रेसने आपला पाठिंबा काढून घेतला आहे?हे अत्यंत दुर्दैवी आहे, एवढेच मी म्हणू शकते.

मग आपली कामगिरी चांगली राहील, असे आपण कसे म्हणता? पूर्व आणि उत्तरेतल्या राज्यांपासून महाराष्ट्रापर्यंत मी काम केले आहे. माझी सासुरवाडी महाराष्ट्रातली आहे. माझे सासरे आणि सासूबाई स्वातंत्र्य सैनिक होते. दोघांनाही साडेतीन वर्षाचा कारावास झाला होता. एक आर्थर रोड तुरुंगात होते, तर दुसरे येरवड्याला. सासरे मुंबईचे शरीफ होते. मी स्वतः पाच वर्ष महाराष्ट्र काँग्रेसची प्रभारी महासचिव होते.

गेली सहा वर्षे आपण राजकारणात सक्रिय नव्हता. काँग्रेस पक्षातच होतात का? २००९ ते १४ राज्यपाल होते, तेव्हा मी काँग्रेसची सदस्य नव्हते. पण त्यानंतर पक्षाची सदस्य आहे. आता उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्यासाठी मी पक्ष सोडला आहे.

आपल्या आत्मचरित्रात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल आपण पुष्कळ गोष्टी लिहिल्या आहेत, आपल्याला आजही तसेच म्हणायचे आहे? हे पहा, निवडणूक माझ्या पुस्तकाविषयी नाही. मी माझ्या पुस्तकाचा प्रचार करत नाही. त्याविषयी स्वतंत्रपणे पाहिजे तितका वेळ आपण बोलू शकतो. मी मागे हटणारी नाही. मी जे काही लिहिले आहे, त्याच्याशी आजही बांधील आहे. परंतु त्यातला काही भाग संदर्भ सोडून उद्घृत करणे योग्य नाही.

सोनिया गांधी यांच्याशी आपले नाते कसे आहे? सोनियाजींशी माझे आजही जवळचे नाते आहे. २००४ नंतर पक्षाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी मला पाच वर्षे  पक्षाचे महासचिवपद दिले होते. आठ राज्यांची प्रभारी म्हणून मी काम पाहिले. आपल्याला यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे?

टॅग्स :congressकाँग्रेसPresident Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022