शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

महाराष्ट्रातील ऊस कारखान्यांच्या गेटवर सीसीटीव्ही बसवा, राजू शेट्टी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:36 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज, शनिवारी जयसिंगपूर येथे सोळावी ऊस परिषद होत आहे. उसाला पहिली उचल किती मिळावी, याची मागणी या परिषदेत केली जाते. तिच्या आधारेच साखर कारखादारांशी चर्चा होऊन पहिली उचल ठरते. या पार्श्वभूमीवर या संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांच्याशी विश्वास पाटील यांनी केलेली बातचीत.महाराष्ट्रातील साखर कारखानदारीस ऊसदर आंदोलनामुळे ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज, शनिवारी जयसिंगपूर येथे सोळावी ऊस परिषद होत आहे. उसाला पहिली उचल किती मिळावी, याची मागणी या परिषदेत केली जाते. तिच्या आधारेच साखर कारखादारांशी चर्चा होऊन पहिली उचल ठरते. या पार्श्वभूमीवर या संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांच्याशी विश्वास पाटील यांनी केलेली बातचीत.महाराष्ट्रातील साखर कारखानदारीस ऊसदर आंदोलनामुळे शिस्त लागली असे वाटते का? ऊस आंदोलनामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारीस शिस्त लागली हे खरे असले, तरी वजनकाट्यातील लूट पूर्णत: रोखण्यास अद्याप आम्हाला यश आलेले नाही. त्यामुळे यापुढील काळात ही लूट थांबविणे हाच संघटनेचा मुख्य अजेंडा असणार आहे.इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांमुळे वजनात काटा मारता येत नाही असे म्हणतात. मग ही लूट कशाप्रकारे होते? मुख्यत: खासगी कारखाने व काही सहकारी कारखानदारही वजनकाट्याद्वारे लूट करतात. आता इलेक्ट्रॉनिक काटे बसविण्यात आले असले तरी विशिष्ट वेळेला त्याचे सेटिंग रिमोटद्वारे बदलून लुबाडणूक होते. काही कारखानदारांची मुले वजनकाट्यावर बसूनच असतात, अशाही तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत. काही लोक उतारा कमी दाखवितात. त्यामुळे साखर उत्पादन जास्त होते. मग ही साखर बिनशिक्क्याच्या पोत्यातून रात्री बाहेर काढली जाते. याला चाप लावण्यासाठीच साखरेच्या गोदामात व गेटवर सीसीटीव्ही बसविण्यात यावेत.शेतकरी चळवळीमुळे सहकारी साखर कारखानदारीत काय सुधारणा झाली असे तुम्हाला वाटते?शेतकरी चळवळीमुळे कारखान्यांकडून होणाºया अनावश्यक कपाती थांबल्या. बिनपरतीच्या व बिनव्याजाच्या ठेवी बंद झाल्या. मनमानी वाहतूक भाडे लावले जात होते, ते बंद झाले. त्यामुळे यापुढे २५ किलोमीटरच्या आत व २५ ते ५० किलोमीटरच्या अंतरातील ऊस वाहतुकीसाठी वेगळा दर असेल. त्यामुळे शेतकºयांची एफआरपीही त्यानुसार बदलणार आहे. काही कारखाने सरसकट ७५० रुपये वाहतूक खर्च लावत होते. ही मनमानी आता करता येणार नाही. तोडणीच्या खर्चात काही कारखाने अख्ख्या शेती खात्याचा पगार लावत होते. ते आम्ही बंद करायला लावले. आता फक्त स्लीप बॉयचा पगार आणि मजुरांना ने-आण व त्यांना तात्पुरत्या निवासासाठी दिलेल्या साहित्याचाच खर्च लावता येतो. अशा अनेक चांगल्या सुधारणा चळवळीच्या रेट्यामुळे झाल्या आहेत.‘स्वाभिमानी’चे ऊसदर आंदोलन पहिल्या उचलीपुरतेच असते असे म्हटले जाते ?यापूर्वी पहिली उचल दिल्यानंतर कारखाने अंतिम दराबाबत ‘ब्र’ शब्द काढत नव्हते. तेव्हा त्या परिस्थितीची गरज म्हणून आम्ही पहिली उचल जास्तीत जास्त शेतकºयांच्या पदरात कशी पडेल यासाठी संघर्ष केला. यापुढील काळात ही दिशा बदलून अंतिम दर कसा जास्तीत जास्त मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न राहील.कारण एफआरपी व ७०:३० चा फॉर्म्युला कायद्याने निश्चित करून दिला आहे. तो पाळणे कारखान्यांना बंधनकारक आहे. कारखान्याने मिळविलेल्या संपत्तीत शेतकºयाला वाटा मिळाला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. त्यासाठीच दबावगट म्हणून चळवळीचा वापर करू

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी