शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

मेक इन इंडिया विरुध्द दिल्लीचे जेएनयु

By admin | Updated: February 20, 2016 02:31 IST

देशाच्या दोन भागात, तरुणांशी संबंधित दोन घटना एकाच आठवड्यात घडल्या. पहिली, दिल्लीत जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची होती. दुसरी घटना मुंबईतली.

अतुल कुलकर्णी, (वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)

देशाच्या दोन भागात, तरुणांशी संबंधित दोन घटना एकाच आठवड्यात घडल्या. पहिली, दिल्लीत जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची होती. दुसरी घटना मुंबईतली. उद्योग विश्वाशी संबंधित जवळपास ५० हजार प्रतिनिधी मेक इन इंडियाच्या निमित्ताने एकत्र आले. आठवडाभर चाललेल्या उद्योग प्रदर्शनाला भेट देण्यासाठी तरुणांनी लक्षणीय गर्दी केली. या दोन घटनांचे पडसाद दोन वेगवेगळ्या पध्दतीने उमटताना दिसत आहेत. दिल्लीतल्या घटनेवरुन तमाम बुध्दिजिवींमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरु असताना दुसरीकडे हा तरुण स्वत:चा उद्योग कसा सुरु करायचा हे समजून घेण्यासाठी मेक इन इंडियात उभारण्यात आलेल्या कॉर्पोरेट मंत्रालय विभागाच्या दालनापुढे रांगा लावून उभा होता. मेक इन इंडियात किती कोटींचे करार झाले, त्यांचे पुढे काय होणार, प्रत्यक्षात किती उतरणार, यावर पुढचे काही महिने चर्चेच्या फैरी झडतील. याआधीच्या सरकारने असे एमओयू केले होते. त्यांचे पुढे काय झाले हा सवाल आता सत्तेत असणाऱ्या, तेव्हाच्या विरोधकांनी केला होता. तोच प्रश्न आताचे विरोधक विचारु लागले आहेत. (पुण्याजवळच्या उद्योग विश्वात कोणत्या पक्षाच्या आमदारामुळे अस्वस्थता पसरली होती आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या पध्दतीने जी कारवाई करायची ती करा, असे कोणत्या नेत्याने विद्यमान मुख्यमंत्र्याना सांगितले होते याचीही चर्चा या निमित्ताने व्हायला हरकत नाही) मात्र या सो कॉल्ड इव्हेंटने काय साध्य केले, याचा सारासार विचार, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून केला पाहिजे. चांगल्याला चांगले आणि चुकीला चूक ठामपणे म्हणावे लागेल. ज्या पध्दतीने तरुणांची गर्दी या संपूर्ण परिसरात होती, ज्या रितीने ते विविध दालनांमधून माहिती घेत फिरत होते ते पाहिले तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना त्यांच्या भविष्याचा विचार करणारी यंत्रणा हवी आहे. ‘शार्क टँक’ नावाचा कार्यक्रम एका चॅनलवर येतो. अमेरिकेतले काही प्रख्यात उद्योजक एकत्र येतात आणि तरुण पिढींच्या उद्योगविषयक कल्पना तपासतात. त्या आवडल्या तर त्यांच्या कल्पना खऱ्या करण्यासाठी त्यांना भांडवलही पुरवतात. असाच खेळ ‘मेक इन इंडिया’त रंगला. तरुणाना कोणत्या कल्पना सुचतात, त्यासाठी ते कसा विचार करतात यावर स्पर्धा ठेवण्यात आली. मुंगी शिरायला जागा नव्हती एवढी गर्दी तिथे होती. वेअर हाऊसिंग सॉफ्टवेअरसाठी राजेश मनपट या तरुण उद्योजकाने ‘आर्क रोबोट’ या त्याच्या कल्पनेचे सॉफ्टवेअर अवघ्या सहा मिनिटात सादर केले. त्यावर उपस्थित उद्योजकांच्या पॅनलने त्याला अनेक प्रश्न विचारले. त्यात राजेश केवळ विजयी झाला नाही तर त्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचा धनादेशही बक्षीस म्हणून तत्काळ देण्यात आला. याच कार्यक्रमात उत्कृष्ट स्पर्धक कोण यासाठी उपस्थित प्रेक्षकांकडून एसएमएस मागविण्यात आले व त्यातून आनंद मदनगोपाल हा तरुण विजयी ठरला.सरकार कोणत्या पक्षाचे आहे याचे या तरुण पिढीला घेणेदेणे नाही. त्यांच्या कल्पनांना बळ देणारी व्यवस्था त्यांना हवी आहे. ती जो कोणी देईल त्याच्यासोबत जाण्यास कोणालाही ना नाही. सगळ्यात जास्त केंद्रीय संरक्षण विभागाच्या स्टॉल्सवर गर्दी होती. त्यांना लागणाऱ्या यंत्रसामुग्रीसाठी आम्ही पूरक उद्योग म्हणून काय करु शकतो याची विचारणा ते तरुण करत होते. मेक इन इंडियात आठ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी २५९४ एमओयू महाराष्ट्राने केले. त्यातले खरे किती, खोटे किती, फसवे किती, हे येणारा काळच सांगेल. मात्र या निमित्ताने राज्यातल्या उद्योग विश्वात एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे व ते जास्त महत्वाचे. देशातल्या उद्योग जगतातले एकही नाव असे नव्हते जे तिथे आले नाही. १७ राज्ये आपापली दालने घेऊन आली. येणारा काळ उद्योगांच्या मागे लागून आपापल्या राज्यात उद्योग खेचून नेण्याचा आहे. या उद्योगवारीत जे आले त्या प्रत्येकाने काही ना काही कमाई केली. जे आले नाहीत त्यांनी काय गमावले हे त्यांचे त्यांना ठाऊक.महाराष्ट्राने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यातून खूप काही कमावले. राज्यभर चांगले वातावरण तयार करण्यात त्यांना यश मिळाले. १०२ देशातून आणि जवळपास २० राज्यातून हजारो लोक आले. त्यांनी मुंबईत जो पैसा खर्च केला, त्यातून काही काळ जो रोजगार तयार झाला त्याचे मूल्य कशातही करता येणार नाही. टॅक्सीवाल्यापासून ते हॉटेल इंडस्ट्री पर्यंत सगळ्यांसाठी ही पर्वणी होती. जेएनयुमध्ये तरुण विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून डावे, उजवे जे काही राजकारण चालू आहे त्याच्या उलट चित्र मुंबईत होते. येथे येणारा तरुण जेएनयुमुळे ना अस्वस्थ होता ना या देशात आपले कसे होईल याचा विचार त्याला त्रस्त करत होता. त्याच्या डोक्यातल्या कल्पनांना कुठे आणि कसा वाव मिळेल याचाच शोध घेत तो फिरताना दिसत होता. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करतो आहोत हे त्यांच्याच भाषेत सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आज तरी बाजी मारली आहे. आठ लाख कोटींच्या एमओयूपैकी २० टक्के जरी वास्तवात उतरले तरी ती रक्कम १ लाख ६० हजार कोटींच्या घरात जाते. फडणवीस हे करु शकले तर त्यांच्यासारखे यशस्वी तेच. आज तरी ते या निमित्ताने प्रचंड यशस्वी झाले आहेत.