शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीच्या अटकेमागचे दिल्ली कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 23:50 IST

अंमलबजावणी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी खास तेवढ्यासाठी दिल्लीहून मुंबईत आले.

- हरीष गुप्ताअमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने रिया चक्रवर्तीला अटक करून बिहारच्या राजकारणात तेल ओतले आहे. आता रियाबाबत गेले तीन महिने चाललेले गुºहाळ बहुधा एकदाचे थांबेल. या अटकेने ब्युरोचे महानिरीक्षक राकेश अस्थाना यांच्या करिअरचा आलेख दिल्लीपतींच्या नजरेत सरसर वर गेला. सीबीआयचे संचालक आर.के. शुक्ला आणि अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांनी गेले काही आठवडे पन्नासएक तास रियाला चौकशीच्या चक्रात फिरवले; पण अखेर सरशी अस्थाना यांची झाली.

अंमलबजावणी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी खास तेवढ्यासाठी दिल्लीहून मुंबईत आले; पण त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगून टाकले, ‘माफ करा, रियाला अटक करण्यासाठी कणभरही पुरावा नाही!’  मग अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो रिंगणात उतरला. हा ब्युरोच रियाला अटक करील हे या स्तंभाने गेल्याच आठवड्यात म्हटले होते. शुक्ला पुढच्या वर्षी निवृत्त होत आहेत. अस्थाना सीबीआयचे संचालक होण्याची शक्यता आता वाढली आहे. गतवर्षी सीबीआयमधून बाजूला केले गेल्यामुळे अस्थाना नाराज होते.

सोनिया गांधी आक्रमक, ‘जी २३’ बंडखोर बचावाच्या पवित्र्यात

गांधींविरुद्ध बंडाचे निशाण फडकवणारे काँग्रेसमधले २३ बंडखोर नेते आता तोंड लपवत फिरत आहेत. दडपण घेण्याऐवजी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी उलट आक्रमक झाल्या आहेत. राहुल निष्ठावंतांपैकी काहींना महत्त्वाच्या संसदीय पदांवर नेमून त्या थांबल्या नाहीत तर उत्तर प्रदेशातील काहींची पदे काढून त्यांना त्यांची जागा दाखवली गेली.

बिहारमध्ये राजकीय दृष्ट्या वजनदार अशा निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदावरून राज्यसभेतले खासदार अखिलेश प्रसाद सिंग यांना हटविण्यात आले. सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानायची तर ‘जी २३’ गटातले मुकुल वासनिक, मनीष तिवारी, शशी थरूर यांचे सूर वेगवेगळे उमटत आहेत. पत्राचा मसुदा जरा चुकलाच असे आता तिवारी जाहीरपणे म्हणू लागलेत. पत्र आनंद शर्मा यांनी लिहिले असल्याने हा बाण त्यांच्या दिशेने जाणार हे उघडच आहे ! केरळात भाजपची ताकद नसल्याने थरूर यांना वादात पडायचे नाही. माघार घेण्यात मुकुल वासनिक यांची काही कारणे असणार. सोनियांनी मुख्यमंत्रिपदावर बसवले होते हे आठवून पृथ्वीराज चव्हाणही आता तोंड लपवत आहेत.अमित शहा का अस्वस्थ आहेत?

कोरोनाची लागण आणि थकव्यातून बाहेर पडून गृहमंत्री अमित शहा कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी परतले. पंतप्रधान मोदींचे उजवे हात मानले जाणारे शहा कायम पुढे राहून लढत आले. मात्र गेल्या काही दिवसात ते प्रकाशझोतातून थोडे बाहेर गेले होते. कानावर आलेल्या माहितीनुसार अमित शहा कार्यालयात आले नसले तरी पूर्णपणे सक्रिय होते.

फायलींचा निपटारा त्यांनी चालू ठेवला. ल्यू टन्स दिल्लीतल्या कानगोष्टीतली एक म्हणजे रामजन्मभूमी शिलान्यासाला न बोलावले जाणे तसेच गुजरात भाजपच्या अध्यक्षपदी सी.आर. पाटील यांची नेमणूक यामुळे शहा अस्वस्थ आहेत. ‘एम्स’मधून परतल्यावर तसेच मेदान्ता इस्पितळात शहा दाखल असताना मोदी रोज त्यांची विचारपूस करत. सूत्र सांगतात की, मोदी आणि शहा यांचे नाते राम-हनुमानासारखे आहे. पृथ्वीतळावरची कोणतीच शक्ती त्याना अलग करू शकणार नाही.एअर इंडिया विकली जाणार का?

येत्या ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील २६ उद्योगांची विक्री सरकारने मुक्रर केली त्यात अग्रभागी एअर इंडिया आहे. बीपीसीएल आणि इतर कंपन्या घ्यायला बरेच उत्सुक आहेत; पण एअर इंडियाची विक्री हे नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यापुढील आव्हान ठरते आहे. असे म्हणतात की, टाटा उद्योगसमूह एअर इंडिया घ्यायला काहीसा अनुत्सुक आहे.

एअर एशिया आणि विस्तारा चालवत असताना नागरी उड्डयन व्यवसायात आणखी पैसे गुंतवायला टाटा समूहाचे सीईओ एन चंद्रशेखरन पूर्णत: तयार नाहीत. मात्र पंतप्रधान मोदींशी सौहार्दाचे संबंध असलेले दोन आखाती देश खरेदीस उत्सुक दिसतात. अर्थसंकल्पातील ८ टक्के तूट भरून काढण्यासाठी २०-२१ या आर्थिक वर्षात सरकार सार्वजनिक उद्योग विकून दोन लाख कोटी उभे करू पाहते आहे.

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीcongressकाँग्रेस