शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

समर्पित कार्यकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 04:34 IST

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा तळमळीचा सेवक हरपला आहे. ते ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून झालेले पहिले वकील होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा तळमळीचा सेवक हरपला आहे. ते ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून झालेले पहिले वकील होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या वकिलीचाही प्रारंभ तलासरी आणि पालघर परिसरातच केला. भाजपा आणि संघाशी ते अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिलेत. लोकसभेवर ते तीन वेळा निवडून गेले. एकदा ते आमदारही झाले होते. त्यांनी आपली लोकप्रतिनिधित्वाची कारकीर्द इतक्या साधेपणाने पूर्ण केली की तीनदा खासदारकी आणि एकदा आमदारकी, ठाणे जिल्हा भाजपाचे अध्यक्षपद भूषविल्यानंतरही त्यांच्याकडे नाव घ्यावे अशी एकही मालमत्ता नव्हती. जी काही जमीन आणि घर होते ते वडिलोपार्जित होते. त्यांनी घेतलेली इंडिका कार ही एकच मोठी मालमत्ता त्यांच्याकडे होती. तिचाही वापर ते समाजकार्यासाठीच अधिक करायचे. भाजपासारख्या पक्षात राहूनही त्यांनी कधीही कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही. आग्रह धरला नाही. २००९ मध्ये ते विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २0१४ च्या निवडणुकीवेळी विष्णू सवरांचा पारंपारिक वाडा मतदार संघाचे आरक्षण बदलावे लागले होते. त्यावेळी तिकिट वाटपाच्या बैठकीत वनगा यांनी स्वत:चा विक्रमगड मतदारसंघ सवरांसाठी सोडण्याची तयारी दर्शविली. त्याचे बक्षीस म्हणून भाजपाने त्यांना पालघर लोकसभेसाठी उमेदवारी दिली. तिचेही त्यांनी सोने केले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांनी त्यांचा जवळपास १३ हजार मतांनी पराभव केला होता. त्याचे उट्टे त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काढले. त्यांनी जाधव यांचा २ लाख ३९ हजार ५२० मतांनी पराभव केला. ते आदिवासी असले तरी संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीनही स्वरूपाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. एका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्न केले. चार दशकांच्या राजकीय जीवनात त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नोंदविला गेलेला नव्हता. अलीकडच्या काळात आपल्या ज्येष्ठत्वाचा मान राखला जात नाही, अशी त्यांची खंत होती. या भावना पक्षातील योग्य व्यासपीठावर ते मांडतही होते. प्रसारमाध्यमांकडे धाव घेण्याचा आततायीपणा मात्र त्यांनी कधीही केला नाही. त्यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा एक समर्पित कार्यकर्ता भाजपाने गमावला यात शंका नाही.

टॅग्स :Chintaman Wangaचिंतामण वनगाBJPभाजपा