शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

समर्पित कार्यकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 04:34 IST

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा तळमळीचा सेवक हरपला आहे. ते ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून झालेले पहिले वकील होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा तळमळीचा सेवक हरपला आहे. ते ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून झालेले पहिले वकील होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या वकिलीचाही प्रारंभ तलासरी आणि पालघर परिसरातच केला. भाजपा आणि संघाशी ते अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिलेत. लोकसभेवर ते तीन वेळा निवडून गेले. एकदा ते आमदारही झाले होते. त्यांनी आपली लोकप्रतिनिधित्वाची कारकीर्द इतक्या साधेपणाने पूर्ण केली की तीनदा खासदारकी आणि एकदा आमदारकी, ठाणे जिल्हा भाजपाचे अध्यक्षपद भूषविल्यानंतरही त्यांच्याकडे नाव घ्यावे अशी एकही मालमत्ता नव्हती. जी काही जमीन आणि घर होते ते वडिलोपार्जित होते. त्यांनी घेतलेली इंडिका कार ही एकच मोठी मालमत्ता त्यांच्याकडे होती. तिचाही वापर ते समाजकार्यासाठीच अधिक करायचे. भाजपासारख्या पक्षात राहूनही त्यांनी कधीही कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही. आग्रह धरला नाही. २००९ मध्ये ते विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २0१४ च्या निवडणुकीवेळी विष्णू सवरांचा पारंपारिक वाडा मतदार संघाचे आरक्षण बदलावे लागले होते. त्यावेळी तिकिट वाटपाच्या बैठकीत वनगा यांनी स्वत:चा विक्रमगड मतदारसंघ सवरांसाठी सोडण्याची तयारी दर्शविली. त्याचे बक्षीस म्हणून भाजपाने त्यांना पालघर लोकसभेसाठी उमेदवारी दिली. तिचेही त्यांनी सोने केले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांनी त्यांचा जवळपास १३ हजार मतांनी पराभव केला होता. त्याचे उट्टे त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काढले. त्यांनी जाधव यांचा २ लाख ३९ हजार ५२० मतांनी पराभव केला. ते आदिवासी असले तरी संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीनही स्वरूपाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. एका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्न केले. चार दशकांच्या राजकीय जीवनात त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नोंदविला गेलेला नव्हता. अलीकडच्या काळात आपल्या ज्येष्ठत्वाचा मान राखला जात नाही, अशी त्यांची खंत होती. या भावना पक्षातील योग्य व्यासपीठावर ते मांडतही होते. प्रसारमाध्यमांकडे धाव घेण्याचा आततायीपणा मात्र त्यांनी कधीही केला नाही. त्यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा एक समर्पित कार्यकर्ता भाजपाने गमावला यात शंका नाही.

टॅग्स :Chintaman Wangaचिंतामण वनगाBJPभाजपा