शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

ग्राहक हिताचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 04:03 IST

‘रेरा’ म्हणजेच स्थावर मालमत्ता नियामक कायद्यातील बहुसंख्य तरतुदींना आव्हान देत त्या कायद्याची धारच काढून घेण्याचे बांधकाम व्यावसायिकांचे प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाने उधळून लावले आहेत.

‘रेरा’ म्हणजेच स्थावर मालमत्ता नियामक कायद्यातील बहुसंख्य तरतुदींना आव्हान देत त्या कायद्याची धारच काढून घेण्याचे बांधकाम व्यावसायिकांचे प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाने उधळून लावले आहेत. त्यांच्या याचिका फेटाळून ग्राहकांच्या हितांना प्राधान्य दिले आहे. त्याबद्दल न्यायालयाचे अभिनंदनच करायला हवे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील व देशातील अनेक शहरांत या बºयाच बांधकाम व्यावसायिकांनी जो उच्छाद मांडला होता व आहे, त्याला न्यायालयाच्या निर्णयामुळे चाप बसणार आहे. रेरातील सर्व तरतुदी योग्य असल्याचेच न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एकीकडे खरेदीदारांकडून घरांसाठी आगाऊ रकमा घ्यायच्या, बांधकाम पूर्ण करायचे नाही, त्या रकमा अन्य प्रकल्पांत गुंतवायच्या, वेळेत पैसे न भरणाºया ग्राहकांचे बुकिंग रद्द करायचे, पण त्यावरील व्याज परत करायचे नाही, स्वत:कडून विलंब झाला तरी खरेदीदारांना त्याचे व्याज द्यायचे नाही, असे असंख्य गैरप्रकार या व्यावसायिकांनी चालविले होते. लोक बँका व वित्त संस्थांकडून कर्ज घेऊ न घरांचे बुकिंग करतात. घराच्या कर्जाचे हप्ते एकीकडून वसूल होत आहेत, पण घर मिळण्याची शाश्वती नाही, अशी अवस्था बांधकाम व्यावसायिकांनी करून ठेवली होती. हे थांबविण्यासाठीच केंद्र व राज्य सरकारने कायदा करताच त्यांचे धाबे दणाणले आणि कायद्याच्या वैधतेलाच त्यांनी आव्हान दिले. पण या व्यावसायिकांची न्यायालयात डाळ शिजली नाही आणि ग्राहकांच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला आहे. आता व्यावसायिकांना एका प्रकल्पासाठीचा पैसा अन्य प्रकल्पांत वळवता येणार नाही, नैसर्गिक आपत्ती वगळता ठरलेल्या मुदतीत खरेदीदाराला घर द्यावेच लागेल, त्यासाठीही स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल, बांधणीस विलंब केल्यास रकमेचे व्याज द्यावे लागेल. एवढेच नव्हे, तर प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याने एखाद्या खरेदीदाराने बुकिंग रद्द केले तरी त्याला मूळ रक्कम व व्याज द्यावे लागेल. अर्थात या तरतुदी कायद्यात होत्याच. पण त्याच रद्द व्हाव्यात, असा प्रयत्न होता. म्हणजे आपली लबाडी सुरू राहावी, अशीच जणू त्यांची इच्छा होती. शिवाय केवळ नव्याच नव्हे, तर सध्या सुरू असलेल्या घरबांधणी प्रकल्पांनाही आता कायदा लागू होणार असल्याने ज्यांची आधीपासून घरे रखडली आहे, त्यांना कदाचित दिलासा मिळू शकेल. वास्तविक झोपडपट्टी पुनर्वसन वा चाळींचे पुनर्वसन करणाºया विकासकांनाही या कायद्याच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे बांधकामे अर्धवट ठेवून, रहिवाशांना वाºयावर सोडणाºया बांधकाम व्यावसायिकांनाही धडा मिळायलाच हवा. वेळेत घरे बांधून न दिल्याने हजारो कुटुंबे ३0 ते ४0 वर्षे संक्रमण शिबिरांत राहत आहेत. काही बांधकामदारांनी झोपडीधारकांना पुनर्वसन योजनेतून हुसकावून लावले आहे, अनेक ठिकाणी रहिवाशांना भाडेही मिळत नाही, काहींनी एका पुनर्वसन प्रकल्पासाठी घेतलेली कर्जे भलतीकडेच वापरली आहेत. त्यामुळे हे प्रकल्पही रेराअंतर्गत आणावेत. तसे केल्यास ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था झालेल्यांच्या घरांचे स्वप्नही पूर्ण होईल. ‘रेरा’च्या प्रमुखपदी सरकारी नकोत, न्यायालयीन अधिकारी असावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. ते योग्यच आहे. अलीकडे घरबांधणीमध्ये राजकारणी, नोकरशहा यांना खूपच रस निर्माण झाला आहे. या मंडळींची कार्यपद्धती पाहूनच न्यायालयीन अधिकारी नेमण्याची सूचना करण्यात आली असावी. ती योग्यच आहे. राजकारणी व नोकरशहांच्या दबावाखाली राज्य सरकारनेच या तरतुदीला आव्हान दिले नाही, म्हणजे मिळवले.

टॅग्स :MumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय