शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

डीबीटी-शाप की वरदान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:35 IST

सध्याचा काळ ‘कमिशन’चा आहे. शासनाची योजना कितीही लोकउपयुक्त असो त्यात ‘कमिशन’चे गणित जुळत नसेल तर त्या योजनेचा बोजवारा उडालाच म्हणून समजा. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आल्याने शासनाच्या अनेक लोकउपयुक्त योजनांचा असाच बोजवारा उडायला लागला आहे. विशेष म्हणजे, डीबीटी येण्याआधी जे लोकप्रतिनिधी लोकउपयुक्त योजनांच्या माध्यमातून आपल्याही तुंबड्या भरून घ्यायचे त्यांच्या कमिशनखोरीवर ...

सध्याचा काळ ‘कमिशन’चा आहे. शासनाची योजना कितीही लोकउपयुक्त असो त्यात ‘कमिशन’चे गणित जुळत नसेल तर त्या योजनेचा बोजवारा उडालाच म्हणून समजा. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आल्याने शासनाच्या अनेक लोकउपयुक्त योजनांचा असाच बोजवारा उडायला लागला आहे. विशेष म्हणजे, डीबीटी येण्याआधी जे लोकप्रतिनिधी लोकउपयुक्त योजनांच्या माध्यमातून आपल्याही तुंबड्या भरून घ्यायचे त्यांच्या कमिशनखोरीवर डीबीटीमुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यात या लोकप्रतिनिधींना आता काडीचाही रस उरलेला नाही. परिणामी अनेक चांगल्या योजनांची पार वाट लागत आहे.वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ पूर्णपणे लाभार्थ्यांना मिळावा म्हणून शासनाने ५ डिसेंबर २०१६ ला थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रिया अमलात आणली व योजनांचे अनुदान संबंधित विभागांकडे जमाही केले. परंतु योजनांसाठी लाभार्थ्यांचे प्रस्तावच विभागाला येत नाहीत कारण लाभार्थ्यांची स्वत: खर्च करण्याची मानसिकताच नाही आणि त्या योजनांचे फायदे समजावून सांगणारे लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत.डीबीटी प्रक्रियेचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. आज अडीच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही डीबीटीमुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकले नाही. बँकेत संयुक्त खाते काढणे, खाते काढल्यानंतर गणवेश खरेदी करणे, खरेदी केलेल्या गणवेशाची पावती मुख्याध्यापकांना देणे आणि नंतर गणवेशाची रक्कम खात्यात जमा होणार, असे दिव्य पार पाडावे लागते.नागपूर जिल्ह्यात गणवेशाचे ७३,३७३ लाभार्थी आहेत. यातील फक्त १० हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान जमा झाले आहे. पीव्हीसी पाईप, पीक संरक्षण अवजारे, इलेक्ट्रिक मोटार इंजिन, सायकल, ताडपत्री, शिलाई मशीन लाभार्थ्यांना अनुदानाच्या स्वरुपात देण्यात येते. पूर्वी हे साहित्य लाभार्थ्यांना वस्तुरुपात मिळत होते. यावर्षीपासून शासनाने राबविलेल्या डीबीटीमुळे हे साहित्य लाभार्थ्यांना स्वत: खरेदी करून त्याची पावती संबंधित पंचायत समितीमध्ये दिल्यानंतर त्याचे रोख अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु या शासकीय योजनेचे स्वरूप आता बदलेले आहे, हे सांगणारेच कुणी नसल्याने डीबीटी-शाप की वरदान, असा प्रश्न निर्माण झाला आहे.