शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

दशकपूर्तीतही मनसे हताशच!

By admin | Updated: March 12, 2016 03:41 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात आगलावू भाषा करीत पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात असताना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात आगलावू भाषा करीत पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात असताना, दुसरीकडे या पक्षाला राज्यात ज्या शहरात प्रथम सत्ता मिळाली त्या नाशकात मात्र दशकपूर्तीचा काडीमात्रही आनंद वा उत्साह दिसून येऊ नये, हे त्या पक्षातील हताशा दूर झालेली नसल्याचेच लक्षण म्हणायला हवे. पक्षातील ‘बडवेगिरी’चा प्रत्यय, सुस्पष्ट धोरणांचा अभाव व प्रारंभिक शिलेदारांची गळती यासारख्या कारणातून हे हबकलेपण ओढवले असून, त्यासंबंधीचा ‘उतारा’ केवळ तोडफोडीच्याच कार्यशैलीत शोधला जाणार आहे का, असा प्रश्नही यातून उपस्थित होणे स्वाभाविक ठरले आहे.कोणत्याही राजकीय पक्षासाठी दशकभराची वाटचाल ही काही लहान बाब नसते. कारण हा कालावधी त्या पक्षाच्या जडणघडणीचा काळ असतो. त्यातल्या त्यात जेव्हा एखाद्या ठिकाणची सत्ता मिळते तेव्हा त्या पक्षाची जबाबदारी अधिकच वाढून जाते. अशा स्थितीत काही करून दाखविता आले तर पुढील प्रगतीचे मार्ग आपोआप प्रशस्त होत जातात. पण ‘मनसे’ची याच बाबतीत नादारी आहे. या पक्षाला स्थापनेनंतर एकमेव नाशिक महापालिकेतील सत्ता लाभली. मात्र या सत्तेच्या माध्यमातून नवनिर्माणाचे प्रत्यंतर आणून देणे ‘मनसे’ला जमले नाही. म्हणायला राज ठाकरे लाख म्हणोत की, ‘सत्ता दिल्यास महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन’, पण येथे साधी नाशिक महापालिकेतील नोकरशाही त्यांना गेल्या चार वर्षात सरळ करता आलेली नाही. सध्याचेच उदाहरण घ्या, नाशकातील पाणीपुरवठ्याबाबत जनतेची ओरड वाढली आहे. पालिकेतील सत्ताधारी या नात्याने प्रशासनाला कामाला लावून यासंबंधीच्या तक्रारी दूर करणे अपेक्षित असताना, ‘मनसे’ने स्वत:च टँकर्स सुरू करून आपल्याच अपयशावर शिक्कामोर्तब करून घेतले आहे. पक्ष म्हणून असे करता येत असेल तर ते महापालिकेतील सत्ताधारी म्हणून का करता येऊ नये, असा यातील साधा सवाल आहे. ‘मनसे’च्या स्थापनेनंतर मुंबईपेक्षा नाशकात अधिक जल्लोष केला गेला होता. महापालिकेतील सत्तेखेरीज विधानसभेत शहरातून या पक्षाचे तीन तीन आमदार निवडून गेले होते. पण कुणालाही नवनिर्माण साधता न आल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीनही जागा हातच्या गेल्या. त्यानंतर पक्षात ‘बडवेगिरी’ वाढल्याचा आरोप करीत पक्ष स्थापना काळातील शिलेदार वसंत गिते पक्ष सोडून चालते झाले. पक्षाच्या पहिल्या महापौरपदाचा फेटा ज्यांच्या मस्तकी बांधला गेला ते अ‍ॅड. यतिन वाघ हेदेखील अगदी अलीकडेच पक्षाबाहेर पडले. आणखीही बरीच पडझड झाली आणि त्यातूनच पक्षात सुन्नता आली. पण त्यासंदर्भात कुठे काय चुकते आहे याचे आत्मपरीक्षणच कुणी करायला तयार नाही. तेव्हा केवळ मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून व नव्या रिक्षांच्या जाळपोळीतून पक्षातील ही सुन्नता वा अस्वस्थता दूर करता येईल का हा खरा प्रश्न असून, या प्रश्नाच्या मुळाशी असणारी हताशा यातून समोर येणारी आहे. ‘राजगड’ म्हणविल्या जाणाऱ्या पक्षाच्या नाशकातील मुख्यालयात पक्षाच्या दशकपूर्तीचा मागमूसही आढळून न येण्यामागे तेच कारण आहे.विशेष म्हणजे, राजकारणात आक्रमकता व सत्ता या नेहमीच आकर्षणाच्या बाबी ठरत आल्या आहेत. आज नरेंद्र मोदी व राज ठाकरे या दोघांकडेही वेगवेगळ्या संदर्भात त्या असताना, नाशकातील अनेकजण तुलनेने मवाळपंथीय म्हणविल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेने जात आहेत हे काहीसे अनाकलनीय व कुतुहलाचे असले तरी ते वास्तव आहे. राज्यातील सत्तेत शिवसेनेची स्थिती किती नाजूक आहे हे जगजाहीर असताना असे होते आहे. काही मनसैनिक थेट शिवसेनेत आले आहेत, तर काही ‘व्हाया भाजपा’ येऊ घातले आहेत. तेव्हा याही बाबतीत राज ठाकरे यांचे अपयश वा ‘मनसे’तील घसरगुंडी लक्षणीय ठरणारी आहे. - किरण अग्रवाल