शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नाचक्की झालीच!

By admin | Updated: December 18, 2015 03:02 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या वतीने कपिल सिब्बल यांच्यासारखा तगडा वकील देऊनही आणि खुद्द सिब्बल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या वतीने कपिल सिब्बल यांच्यासारखा तगडा वकील देऊनही आणि खुद्द सिब्बल यांनी न्यायालयाला कळकळीची विनंती करुनही अखिलेश सरकारची नाचक्की अखेर टळू शकली नाही. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील रिक्त झालेले लोकआयु्क्त पद तत्काळ भरावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्या सरकारला एकदा नव्हे तीन वेळा अंतिम मुदत दिली होती. पण या मुदतीत सरकार निर्णय करु शकले नाही. त्यामुळे अखेर राज्यघटनेने बहाल केलेल्या विशेषाधिकाराचा वापर करुन सर्वोच्च न्यायालयानेच अलाहाबाद उच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्या. विरेन्द्र सिंह यांची नवे लोकआयुक्त म्हणून नियुक्ती जाहीरही करुन टाकली. गेल्या तब्बल अठरा महिन्यांपासून नियुक्तीचा घोळ सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित होता. या काळात तीनदा न्यायालयाने सरकारला अंतिम मुदत दिली होती. तरीही राज्य सरकार निर्णय करु शकले नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्या. रंजन गोगोई आणि एन.व्ही. रमण यांचे खंडपीठ अत्यंत संतप्त झाले. सरकारला आणखी थोडी मुदत मिळावी म्हणून कपिल सिब्बल यांनी केलेली रदबदली तर खंडपीठाने फेटाळलीच पण आपल्या निवाड्यात उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे झाडू नयेत ही त्यांनीच केलेली विनंतीदेखील खंडपीठाने अमान्य केली. लोकआयुक्ताच्या निवडीसाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अशा तिघांची समिती असते आणि कोणत्याही नावावर तिघांचे एकमत होणे अनिवार्य असते. परंतु ते होत नव्हते. बुधवारी अंतिम सुनावणीच्या वेळी सिब्बल यांनी खंडपीठाला पाच नावांची यादी सादर केली पण ती सादर करताना सांगितले की या पाचही नावांवर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता यांच्यात सहमती असली तरी ती नावे मुख्य न्यायाधीशांनी नाकारली आहेत. पण ती नाकारताना त्यांनी आपणहून कोणत्याही नावाची शिफारस मात्र केलेली नाही. याआधी अशीच एक यादी अखिलेश सरकारने राज्यपाल राम नाईक यांना सादर केली असता त्यातील नावांना मुख्य न्यायाधीशांची संमती नसल्याने राज्यपालांनी ती यादी परत केली होती. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता, सर्वोच्च न्यायव्यवस्थेने जरी अखिलेश सरकारला दोषी मानले असले तरी त्या दोषाशी न्यायव्यवस्थेचाही संबंध होताच. पण अखेर नाचक्की अखिलेश सरकारची झाली व ती टाळण्याचे प्रयत्नही विफल ठरले. मध्यंतरी अण्णा हजारे यांनी लोकपाल पदाच्या निर्मितासाठी मोठे आंदोनल उभे केले होते पण त्यातून लोकपाल अवतरलाच नाही. दिल्ली सरकारने तो अवतरावा म्हणून नुकताच एक निर्णय केला पण तोदेखील वादात सापडला असल्याने अशा त्रयस्थ पंचाची वाट किती खडतर असते याचा अदमास येऊ शकतो.