शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

सायबर संस्कार: एकविसाव्या शतकातील एक आवश्यक गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2024 07:35 IST

सध्या आपण सारेच इंटरनेटच्या नको इतके आहारी चाललो आहोत. गरज आणि हव्यास यातली सीमारेषा पाळताना सायबर संस्कारांची गरजही ओळखली पाहिजे.

डॉ. दीपक शिकारपूर, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक

मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मनुष्य. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालंय. एकविसाव्या शतकात संगणक व मोबाइल क्रांतीने जीवनपद्धतीचे सर्व संदर्भ बदलेले आहेत.  

तरुणांमध्ये इंटरनेट वापराच्या 3०% एवढा वेळ सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉग्जसाठी खर्च केला जातो; जो ई-मेलपेक्षाही जास्त आहे. वेळेअभावी पालक व पाल्यांचा संवाद कमी होत आहे. त्यामुळे संगणक, मोबाइल, टीव्ही ही उपकरणे मुलांच्या संवादाची साधने बनली आहेत. ८-१४ वयोगटातील अनेक विद्यार्थी त्याच्या आहारी जाऊन तेच आपले विश्व असल्याच्या भ्रमात वावरतात. नैराश्य, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व व काही व्यक्ती चक्क आत्महत्येचा मार्गही त्यामुळे स्वीकारत आहेत. 

पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्ट फोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञान हे सुऱ्यासारखे असते. त्याने एखादे फळ कापता येते, तसेच एखाद्याचा खूनही करता येऊ शकतो. अमेरिकेत अनेकवेळा शाळकरी मुलांवर खुनी हल्ले झालेत. ते आतापर्यंत कुठल्यातरी हाडामासाच्या विकृत व्यक्तीने केलेत; पण भविष्यात कदाचित  स्वयंचलित वाहन व यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल. त्या वेळी खुनी कोण, हे ठरवणे अवघड असेल. शाळा-महाविद्यालयांतही संगणक/ स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक व्हावे. आधुनिक तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरणे  म्हणजे सायबर संस्कार. सायबर संस्कार प्रशिक्षणात पुढील गोष्टी असाव्यात.

१- स्मार्टफोनचा वापर, २- सोशल मीडियावर  माहिती पोस्ट करणे, ३- मर्यादित सेल्फी, ४- योग्य चलतचित्रण, ५- सायबर गुन्हेगारी, ६- स्वतःला सायबर सुरक्षित ठेवणे, ७- सायबर कायदे व गुन्हेगारांना झालेल्या शिक्षेची माहिती.पूर्वी सुरक्षा ही फक्त भौतिक गोष्टींची गणली जायची. आता सायबर सुरक्षा व सर्व संगणकीय भांडवलाची व माहितीची सुरक्षा ही एक अत्यावश्यक बाब झाली आहे. कुंपण, पहारेकरी, कड्या-कुलूप, तिजोरी, शिस्त हे सर्व पर्याय पारंपरिक भौतिक जगातील व्यवसायांना ठीक आहेत; पण डिजिटल युगात ते कुचकामी ठरतात. त्यासाठी वेगळे सायबर नियम   अत्यावश्यक आहेत.

आगामी काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता, विश्लेषण, यंत्रमानव (रोबोटिक्स), इंटरनेट ऑफ थिंग्स यांसारख्या  तंत्रज्ञानामुळे  जगाच्या भल्यासाठी अनेक क्रांतिकारी शोध लागतील व नवीन उत्पादने बनतील; पण हेच सर्व तांत्रिक प्रवाह विकृत, गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींच्या हाती पडले तर नाशही होऊ शकतो. यामुळेच एमआयटी, स्टॅनफर्ड, हार्वर्डसारख्या प्रथितयश विद्यापीठात नैतिकता, नीतिमूल्य या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञांना व उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. त्यामुळे काय बरोबर, काय चूक याची जाणीव होईल. हा प्रवाह काही वर्षांतच भारतीय शिक्षणपद्धतीमध्येही अंतर्भूत होईल.

कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. तंत्रज्ञानाचेही असेच आहे. गरज असेल तरच ते वापरा. वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, योगा, फिरणे, संगीत असे अनेक पर्याय आहेत. इंटरनेट न वापरायचीही सवय झाली पाहिजे. स्वतःवर बंधन व शिस्त या बाबतीतही आवश्यक आहे. जर माफक प्रमाणात हवे तेव्हाच जर आपण तंत्रज्ञान वापरले तर त्याचे अनेक फायदेही आहेत. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम