शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

प्याला अर्धा भरला आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 05:23 IST

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. या शहरांच्या निवडीकरिता सर्वांत महत्त्वाचा निकष होता तो लोकसंख्येचा. प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधा या चार निकषांवर ही क्रमवारी निश्चित केलेली आहे. गेली काही वर्षे गुजरातच्या आणि तेथील शहरांच्या विकासाच्या कहाण्या ऐकून महाराष्ट्रातील रहिवाशांना न्यूनगंड येऊ लागला होता. मात्र महाराष्ट्रातील शहरे यादीत अव्वल असताना गुजरातमधील एकाही शहराचा यादीत समावेश नाही हे आश्चर्यजनक आहे. आर्थिक विकास, रोजगार, गव्हर्नन्स, इज आॅफ डुर्इंग बिझनेस वगैरे निकषांवर महाराष्ट्रातील राज्यांनी सरस ठरणे अपेक्षित होते. महाराष्ट्राला श्रमाची व व्यापाराची, शिक्षणाची व सामाजिक चळवळींची उज्ज्वल परंपरा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था अशा अनेक बाबींमध्येही पुणे, नवी मुंबई, मुंबई तसेच ठाणे या शहरांमधील स्थिती अन्य राज्यांतील शहरांपेक्षा खूप चांगली आहे. केंद्र सरकारने ही स्पर्धा घेताना ढोबळमानाने चार निकष निश्चित केले. त्यातील कोणत्या निकषांना-त्या अंतर्गत बाबींना किती महत्त्व देऊन गुण दिले हेही तितकेच महत्त्वाचे आहे. वानगीदाखल सांगायचे तर आर्थिक उलाढालीत मुंबई, नवी मुंबई ही शहरे स्पर्धेत आघाडी घेणे स्वाभाविक आहे. शैक्षणिक संस्थांचे जाळे हा निकष प्रधान असेल तर पुणे अव्वल ठरणे ही काळ्या दगडावरील रेघ असेल. याच स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, प्रदूषण या निकषांवर शहरांची निवड केली गेली असती,तर कदाचित याच शहरांच्या पदरी निराशा आली असती. कचरा वर्गीकरणाबाबत ही शहरे अजून बरीच मागे आहेत. कचराकोंडीमुळे लक्षावधी लोकांची घुसमट होत आहे. या सर्वच शहरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था व वाहतूककोंडी या समस्या भीषण होत आहेत. मागील आठवड्यात मुंबई, ठाण्यात थोडेसे अंतर पार करण्याकरिता लोकांना तासन्तास कोंडीचा सामना करावा लागला. काही मोजके विभाग सोडले तर अनेक शहरांतील अनेक वस्त्यांमध्ये कचरा ही मोठी समस्या आहे. प्रदूषण ही तर या सर्वच शहरांची मोठी डोकेदुखी आहे. त्यातून श्वसनाचे, त्वचेचे व अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे ‘सुखावह’तेचे निकष कोणते त्यावर कोणते शहर बाजी मारणार ते ठरणार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘अर्धा प्याला भरला आहे, असंदेखील म्हणता येतं. अर्धा प्याला सरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की, भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा.’

टॅग्स :newsबातम्या