शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

प्याला अर्धा भरला आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 05:23 IST

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. या शहरांच्या निवडीकरिता सर्वांत महत्त्वाचा निकष होता तो लोकसंख्येचा. प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधा या चार निकषांवर ही क्रमवारी निश्चित केलेली आहे. गेली काही वर्षे गुजरातच्या आणि तेथील शहरांच्या विकासाच्या कहाण्या ऐकून महाराष्ट्रातील रहिवाशांना न्यूनगंड येऊ लागला होता. मात्र महाराष्ट्रातील शहरे यादीत अव्वल असताना गुजरातमधील एकाही शहराचा यादीत समावेश नाही हे आश्चर्यजनक आहे. आर्थिक विकास, रोजगार, गव्हर्नन्स, इज आॅफ डुर्इंग बिझनेस वगैरे निकषांवर महाराष्ट्रातील राज्यांनी सरस ठरणे अपेक्षित होते. महाराष्ट्राला श्रमाची व व्यापाराची, शिक्षणाची व सामाजिक चळवळींची उज्ज्वल परंपरा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था अशा अनेक बाबींमध्येही पुणे, नवी मुंबई, मुंबई तसेच ठाणे या शहरांमधील स्थिती अन्य राज्यांतील शहरांपेक्षा खूप चांगली आहे. केंद्र सरकारने ही स्पर्धा घेताना ढोबळमानाने चार निकष निश्चित केले. त्यातील कोणत्या निकषांना-त्या अंतर्गत बाबींना किती महत्त्व देऊन गुण दिले हेही तितकेच महत्त्वाचे आहे. वानगीदाखल सांगायचे तर आर्थिक उलाढालीत मुंबई, नवी मुंबई ही शहरे स्पर्धेत आघाडी घेणे स्वाभाविक आहे. शैक्षणिक संस्थांचे जाळे हा निकष प्रधान असेल तर पुणे अव्वल ठरणे ही काळ्या दगडावरील रेघ असेल. याच स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, प्रदूषण या निकषांवर शहरांची निवड केली गेली असती,तर कदाचित याच शहरांच्या पदरी निराशा आली असती. कचरा वर्गीकरणाबाबत ही शहरे अजून बरीच मागे आहेत. कचराकोंडीमुळे लक्षावधी लोकांची घुसमट होत आहे. या सर्वच शहरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था व वाहतूककोंडी या समस्या भीषण होत आहेत. मागील आठवड्यात मुंबई, ठाण्यात थोडेसे अंतर पार करण्याकरिता लोकांना तासन्तास कोंडीचा सामना करावा लागला. काही मोजके विभाग सोडले तर अनेक शहरांतील अनेक वस्त्यांमध्ये कचरा ही मोठी समस्या आहे. प्रदूषण ही तर या सर्वच शहरांची मोठी डोकेदुखी आहे. त्यातून श्वसनाचे, त्वचेचे व अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे ‘सुखावह’तेचे निकष कोणते त्यावर कोणते शहर बाजी मारणार ते ठरणार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘अर्धा प्याला भरला आहे, असंदेखील म्हणता येतं. अर्धा प्याला सरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की, भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा.’

टॅग्स :newsबातम्या