शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लोटू पाटलांचे सुसंस्कृत सोयगाव

By admin | Updated: January 4, 2017 04:27 IST

सोयगाव लोटू पाटलांचे, महानोरांचे, त्यामुळेच ते रसिकांचे. या गावाची सुसंस्कृतपणाची परंपरा आहे आणि एवढ्या पडझडीत ती टिकून राहिली हेच संमेलनाच्या यशाचे कारण.

- सुधीर महाजनसोयगाव लोटू पाटलांचे, महानोरांचे, त्यामुळेच ते रसिकांचे. या गावाची सुसंस्कृतपणाची परंपरा आहे आणि एवढ्या पडझडीत ती टिकून राहिली हेच संमेलनाच्या यशाचे कारण.आडमार्गावरच्या सोयगावमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने ३८ वे साहित्य संमेलन घेतले. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये ‘गैरसोय गाव’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोयगावने या संमेलनाचे नेटके आयोजन केले आणि संमेलनामागचा हेतूही सफल केला, तो या अर्थाने की ते उत्सवी होऊ दिले नाही. ‘देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे’ असा हा सोहळा होता. सोयगाव हे खऱ्या अर्थाने रसिकांचे, मोठी सांस्कृतिक परंपरा असणारे अजिंठा लेणीच्या कुशीतील गाव. महानोरांचे सोयगाव त्याही अगोदर लोटू पाटील नावाच्या अवलियाचे सोयगाव. लोटू पाटील हे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात अजरामर. पाऊणशे वर्षापूर्वी ज्याने अशा आडवळणाच्या गावात रंगभूमीची सेवा केली; नव्हे पुण्या-मुंबईच्या बरोबरीने नाट्य चळवळ राबविली. आजही हे गाव आडवळणाचे वाटत असले तर त्या काळी तेथे पोहोचणे किती अवघड असेल, पण अशाही परिस्थितीत लोटू पाटलांनी येथे उत्तमोत्तम नाटके केली. स्थानिक लोकांमधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना रंगमंचावर उभे केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार, दामू अण्णा मालवणकर, नूतन पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर या त्या काळच्या रंगभूमीवरील बिनीच्या शिलेदारांनी सोयगावात हजेरी लावली. या नटांचा अभिनय पाहून सोयगावातील कलाकारांना काही शिकता येईल ही त्या मागची दूरदृष्टी लोटू पाटलांची होती. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘प्रेमसंन्यास’, ‘कवडी चुंबक’, ‘पुण्यप्रभाव’ ही त्या काळची गाजलेली नाटके सोयगावात झाली. लोटू पाटलांनी ‘श्रीराम संगीत मंडळ’ स्थापन करून नाटकाद्वारे सांस्कृतिक चळवळच उभी केली. रंगभूमीचा एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांचा विवाह येथेच लोटू पाटलांनी लावून दिला. अगदी घरच्यासारखे कार्य झाले.सोयगावकरांच्या सुसंस्कृतपणाचे हे लक्षण ही परंपरा आजही कायम आहे. या गावात शिक्षक म्हणून जीवन व्यतीत करताना गावाला संस्काराचे धडे देणाऱ्या नाईक गुरुजींचे त्यांच्या निधनानंतर येथे मंदीर बांधण्यात आले. एखाद्या गावाचे सांस्कृतिक असण्याचे यापेक्षा मोठे लक्षण काय असू शकते. ही घटना तर दोन वर्षांपूर्वीची; लोटू पाटलांची महाराष्ट्राला ओळख करून देताना सोयगावचे मोठेपणही माहीत होणे आवश्यक आहे. वर म्हटल्याप्रमाणे परवाच्या साहित्य संमेलनाचे नेटके नियोजन त्यांनी केले, कारण साहित्य, कला हे गावच्या गुणसूत्रातच आहे.संमेलन यशस्वी झाले, कारण त्यातील साहित्यिक चर्चा, उद्बोधन, उपस्थित झालेले प्रश्न कालानुरूप होते. यात जे बारा ठराव मंजूर करण्यात आले, त्यात अंबाजोगाई येथे मराठी विद्यापीठ स्थापण्याचा ठराव झाला. मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी अशा विद्यापीठाची गरज आहेच; पण त्याहीपेक्षा मराठी शाळा कशा जिवंत राहतील हा खरा प्रश्न आहे. इंग्रजी शाळांनी आता ग्रामीण भागात धडक मारल्यामुळे खरा धोका मराठीला तेथेच निर्माण झाला आणि मराठीचा प्राधान्यक्रम घसरला, असे असतानाही मराठीतील सकस साहित्य निर्मितीही ग्रामीण भागात होते आहे. मराठी शाळांचा आग्रह एका ठरावानुसार केला असला तरी सरकारी धोरण मात्र वेगळेच आहे.उत्तम नियोजन, साहित्यिकांची हजेरी, रसिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संमेलन यशस्वी झाले. ‘मसाप’च्या या पूर्वीच्या संमेलनांचा आढावा घेतला तर उदगीरचे साहित्य संमेलन नांदेडला हलवावे लागले. महिला साहित्य संमेलन यशस्वी झालेल्या जालन्यात मसापचे साहित्य संमेलन चटावरच्या श्राद्धाप्रमाणे उरकून घ्यावे लागले. याचा अर्थ आयोजक चांगले असतील तर संमेलन यशस्वी होते. संमेलनाच्या यशापयशाची जबाबदारी आयोजकांवर अवलंबून असेल, तर संमेलनाच्या आयोजनात ‘मसाप’ची नेमकी जबाबदारी काय असते? याचा उलगडा झाला तर पुढची सगळी संमेलने सोयगावसारखी होतील. भलेही गाव इतरांच्या नजरेने गैरसोयीचे का असेना.