शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

समाजमनातील अस्वस्थतेचे हुंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 19:03 IST

एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, हत्या, आत्महत्या यासंबंधी नेहमी चर्चा होत असते

मिलिंद कुलकर्णीहिंगणघाटातील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून भररस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न, जळगावातील मानसी बागडे या तरुणीने समाजात घेतले जात नाही आणि त्यामुळे विवाह होत नसल्याने केलेली आत्महत्या, वयोवृध्द आईला घरात डांबून बाहेरगावी निघून गेलेले दोंडाईचातील निवृत्त मुख्याध्यापकाचे कृत्य...या आणि अशा प्रकारच्या सगळ्या घटना समाजमन घुसळून टाकणाऱ्या आहेत. हिंगणघाट, वर्ध्यात रोज निषेधाचे मोर्चे निघत आहेत. मानसी बागडे हिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाºया कंजरभाट समाजातील पंच, आजोबा या नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पहिल्या दिवसापासून या प्रकरणात लक्ष घातले असून प्रशासकीय कार्यवाहीकडे डोळ्यात तेल घालून निरीक्षण, पर्यवेक्षण केले जात आहे.या घटना का घडल्या, त्यांच्या कारणांचा शोध, आरोपी व्यक्ती, समूहाची मानसिकता, अनिष्ट रुढी व परंपरांचा असलेला बोजा अशा वेगवेगळ्या मुद्यांवर आता विचारमंथन सुरु आहे. या चिंतन, मनन आणि मंथनाचे स्वागत करायला हवे. निकोप समाजासाठी अशा चर्चेची आवश्यकता आहेच. जेवढ्या खुलेपणाने, मोकळेपणाने ही चर्चा होईल, त्यात समाजातील सर्व घटक सहभागी होतील, तेवढे त्या चर्चेतून निघणारे नवनीत म्हणजे निष्कर्ष हे समाजोपयोगी असे राहतील.एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, हत्या, आत्महत्या यासंबंधी नेहमी चर्चा होत असते. बहुसंख्य मंडळींचा आक्षेप हा चित्रपट, दूरचित्रवाहिनीवरील मालिकांवर असतो. तेथे अशा गोष्टी वारंवार दाखविल्या जातात, त्याचा प्रभाव समाजावर होत असतो, असा आक्षेप घेणाºया मंडळींचा दावा असतो. त्यात तथ्य असेलही. पण पूर्णत: दोष मनोरंजन करणाºया माध्यमांना देता येणार नाही. ‘कीर्तनाने समाज घडत नाही आणि तमाशाने बिघडत नाही’ असे जे म्हटले जाते, त्यात तथ्य आहे. सभोवताली असे प्रकार घडत असताना समाज म्हणून आम्ही मूकदर्शक राहतो, हे मान्य करायला हवे. केवळ दुसºयाकडे बोट दाखवून आपली दोषारोपातून सुटका होणार नाही, हे समाजातील सर्वच घटकांनी लक्षात घ्यायला हवे. शाळकरी मुलांवर संस्कार नाही, उद्याने, मोकळ्या जागा, आडोशाच्या जागांच्याठिकाणी नको त्या गोष्टी सुरु असतात असा सर्वसाधारण चर्चेचा सूर असतो. पोलिसांनी लक्ष द्यायला हवे, निर्भया पथक काय करते, मुलांचे पालक केवळ नोकरी-व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करतात, मुलांकडे लक्ष नसते असा लोकमानसातील सूर असतो. असा प्रकार घडत असेल तर जबाबदार नागरिक म्हणून आम्ही ते रोखणार नाही का? एकट्याला शक्य नसेल, दोन-पाच व्यक्ती जमवून आम्ही अशा गोष्टींना अटकाव करु शकतो. मुळात तसे करण्याची इच्छाशक्ती हवी. ‘मला काय त्याचे’ अशी बेपर्वावृत्ती धोकेदायक असून अशी वृत्ती असणाऱ्यांचे प्रमाण समाजात वाढत आहे. असा प्रकार आपल्यासोबत किंवा कुटुंबियांसोबत घडला तर मात्र आम्हाला समाजाची मदत अपेक्षित असते. माणुसकी लयाला गेली हो, असा कंठशोष तेव्हा आम्ही करतो. परंतु, दु:खिताच्या, पीडिताच्या जागी स्वत:ला कल्पून आम्ही धावून जायला हवे. परोपकार हा तर आमच्या अध्यात्माचा, संतांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा आहे. दुर्देवाने हा विचार केवळ पुस्तक, कीर्तन आणि भाषणापुरती उरला आहे, व्यवहारात आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो.मानसी बागडे या तरुणीने समाजाच्या अशाच प्रवृत्तीला कंटाळून अखेर जीवनयात्रा संपवली. सर्वसामान्य मुलीसारखे तिचे भावविश्व होते. संसार थाटावा, कुटुंब फुलावे, अशी छोटी अपेक्षा तिची होती. तिचा गुन्हा काय, का तिला आत्महत्या करायला भाग पाडले गेले, या प्रश्नांनी सुन्न व्हायला होते. आई-वडिलांनी आंतरधर्मीय विवाह केला. वडिलांचे नाव लावले, मात्र त्यांनी नंतर स्वजातीय महिलेशी दुसरे लग्न केल्याने मानसी व तिच्या कुटुंबियात अंतर आले. वडिलांच्या जातीने स्विकारले नाही. स्वत: आजोबा पंच होते. विवाह निश्चित होत असताना जात पंचायतीने आडमुठी भूमिका घेतली आणि तिचे भावविश्व उध्वस्त झाले.तिकडे दोंडाईचाला वयोवृध्द आईला घरात डांबून निवृत्त मुख्याध्यापक व त्यांची पत्नी दोन दिवस बाहेरगावी निघून गेले. शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर आजीबार्इंची सुटका झाली. किती भीषण घटना आहे. मुलाच्या जन्मासाठी आग्रह धरणाºया समाजाच्या कानशीलात लगावणारी ही घटना आहे. कुठल्या थराला आम्ही जातोय, हे पाहून थरकाप उडतो. वेळीच हे रोखले गेले नाही तर ‘मी माझे’ करणाºया प्रत्येकाच्या दारापर्यंत अशा घटना टकटक करत येतील, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव