शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गर्दी ओसरली, उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:42 IST

न्यायालयाने दहीहंडीवरील थरांचे आणि वयाचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही दहीहंडी उत्सवातील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले.

न्यायालयाने दहीहंडीवरील थरांचे आणि वयाचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही दहीहंडी उत्सवातील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले. मात्र उत्सवात सहभागी झालेल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या गोविंदांच्या उत्साहाने मुंबापुरीवर हंडीचा ‘फिव्हर’ चढल्याचे चित्र होते. विशेषत: प्रायोजक आणि आयोजक यांची घटलेली संख्या ओसरत्या गर्दीला कारणीभूत असली तरी ‘माना’च्या हंड्या फोडणाºया मोजक्या गोविंदा पथकांसह सातत्य टिकवून ठेवणाºया गोविंदांच्या रेट्यामुळे का होईना उत्सवातील उत्साही गोविंदांनी जान आणली होती. गोविंदा पथकांमध्ये सामील होणाºया गोविंदांचे वय आणि थरांचे निर्बंध अशा दोन प्रमुख कारणांमुळे गोविंदा गेल्या काही वर्षांपासून हिरमुसला होता. न्यायालयीन प्रक्रिया, राज्य सरकारची भूमिका आणि गोविंदांमधील अंतर्गत स्पर्धा; अशा अनेक कलहांनी हंडीला घेरले होते. विशेषत: लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये लागलेल्या चढाओढीने उत्साहासोबतच स्पर्धा आणि अर्थकारणाचा खेळ दिसून आला. विशेषत: मोठ्या गोविंदा पथकांसह छोटी गोविंदा पथके लाखमोलाच्या हंड्या फोडून येणाºया गणेश उत्सवाची तजवीज करण्यात मग्न होते. विशेषत: नऊ एक वर्षांपूर्वी पूर्व उपनगरात सुरू झालेल्या ‘देशातील सर्वांत मोठ्या हंडी’ने उत्सवाला ‘बाजारीकरणा’चे स्वरूप दिले. ठाण्यातील लाखमोलाच्या हंड्यांसह वरळी येथील तारकादळांच्या हंडीनेही गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचविला होता. प्रत्यक्षात मात्र थरांसह बालगोविंदांच्या मुद्द्यांवर सुरू झालेली न्यायालयीन प्रक्रिया आणि दरम्यानच्या काळात प्रायोजकांसह आयोजकांनी मागे घेतलेले पाऊल ओसरत्या गर्दीला कारणीभूत ठरले. परिणामी लाखमोलाच्या हंड्याही कमी झाल्या. उत्सवाला राजकारणाचे गालबोट लागले आणि उत्साह आणि उत्सवाभोवती केंद्रित असणारी हंडी अर्थकारणाभोवती फिरू लागली. गेल्या वर्षी न्यायालयाच्या निर्णयामुळे उत्साह ओसरला होता. यंदा वाट मोकळी होऊनही प्रायोजकांअभावी दहीहंडीतील उत्साह पूर्वीप्रमाणे दिसला नाही. त्यातूनच ६० ते ७० टक्के आयोजन कमी झाले. नोटाबंदीपाठोपाठ आलेल्या जीएसटीचा परिणाम असल्याचे आयोजक दबक्या आवाजात सांगू लागले आहेत. तथापि, ‘गर्दी ओसरली तरी उत्साह कायम’ हे ठळकपणे निदर्शनास आले. एकूणच न्यायालयाचे निर्बंध हटनूही ‘वलयप्राप्त’ हंडी कोरडीच राहिल्याचे अधोरेखित झाले.