शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशाचे कोट्यवधी रुपये बँकांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:55 IST

गरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याची ७५ कोटींहून अधिकची रक्कम बँकांच्या घशात जात असेल तर हा नियमांवर बोट ठेवून केलेला सरकारमान्य भ्रष्टाचार आहे. आठव्या वर्गात शिकणाऱ्या पोरांचा शर्टदेखील २०० रुपयात मिळत नाही.

- गजानन चोपडेगरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याची ७५ कोटींहून अधिकची रक्कम बँकांच्या घशात जात असेल तर हा नियमांवर बोट ठेवून केलेला सरकारमान्य भ्रष्टाचार आहे. आठव्या वर्गात शिकणाऱ्या पोरांचा शर्टदेखील २०० रुपयात मिळत नाही. तेव्हा शासनाने देऊ केलेले ४०० रुपये आणि त्यातून बँकांनी केलेल्या कपातीनंतर हाती आलेल्या पैशातून गरीब बाप दोन जोड गणवेश घेणार तरी कसा...गणवेश हा शाळेतील अनुशासनाचा प्रमुख घटक मानला जातो. मात्र पैशांअभावी तो खरेदी करणेही अनेक पालकांना शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांची संख्या राज्यात ३७ लाखांहून अधिक असल्याचे शासकीय आकडे सांगतात. कालपर्यंत शाळेतून मिळणारा हा गणवेश यंदा गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांनाच खरेदी करावा लागला. आतापर्यंत शिक्षण खात्याकरवी होत असलेल्या गणवेशाच्या खरेदीला भ्रष्टाचाराची कीड लागल्याने आता गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करून पारदर्शी कारभाराचा पायंडा पाडल्याचा दावा शिक्षण मंत्र्यांनी केला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागतही झाले; परंतु जाचक अटींमुळे शासनाची थेट बँकेत रक्कम जमा करण्याची योजना पहिल्याच वर्षी अपयशी ठरली.शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये शिकणाºया सर्व प्रवर्गातील मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि दारिद्र्य रेषे खालील विद्यार्थ्यांचा या गणवेश योजनेत समावेश करण्यात आला आहे. ३७ लाख ६२ हजार २७ विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे १५० कोटी ४८ लाख १० हजार ८०० रुपयांची तजवीज करण्यात आली. सुरुवातीला आई किंवा वडिलांसोबत विद्यार्थ्याचे संयुक्त खाते असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली.नंतर आधार लिंक आणि मग वेगवेगळी कारणे देत शिक्षण खात्याने वेळ मारून नेली. अखेर विद्यार्थ्याच्या खात्यात पैसे जमा व्हायला डिसेंबर उजाडला. पैसे जमा झाले; पण बँकांनी जीएसटी, एसएमएस चार्ज आणि इतर दंडाच्या नावाखाली निम्म्याहून अधिक रकमेची कपात करून घेतली. कष्ट• करून आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरणाºया बापाने मायबाप सरकारने दिलेल्या शब्दापोटी ७०० ते ८०० रुपयांची व्यवस्था करून आपल्या पाल्यासाठी गणवेशाचे दोन जोड विकत घेतले त्याच्या खात्यात ४०० ऐवजी २०० ते २५० रुपयेच जमा झाले. काही ठिकाणी तर तब्बल २३८ रुपयांची कपात करण्यात आली. झिरो बॅलेन्सवर खाते उघडण्याचा दावा करणाºया केंद्र शासनालाही या बँका बधल्या नाहीत. ज्या विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्नच नाही त्याच्या खात्यातून विविध करांच्या नावावर कपात का करण्यात आली, याचा जाब शिक्षण खात्याने विचारू नये, याचेच नवल वाटते. एका अधिकाºयाच्या मते माहिती खरी असली तरी याबाबत अद्याप लेखी तक्रार आली नसल्याने बँकेकडे विचारणा केली जाऊ शकत नाही.गरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याची ७५ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम बँकांच्या घशात जात असेल तर हा नियमांवर बोट ठेवून केलेला सरकारमान्य भ्रष्टाचार आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पूर्वी शाळा व्यवस्थापनाकडे गणवेशाची रक्कम वळती केली जायची. एव्हाना त्यातही गैरव्यवहार झाल्याचे प्रकार घडले. उजेडात येणाºया प्रकरणात थातूरमातूर कारवाई करून मलिदा लाटला जायचा. आता याला पायबंद घालण्यासाठी थेट विद्यार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली तेव्हा बँकांनी यावर डल्ला मारला. आठव्या वर्गात शिकणाºया पोराचे शर्टदेखील २०० रुपयात मिळत नाही. तेव्हा शासनाने देऊ केलेले ४०० रुपये आणि त्यातून बँकांनी केलेल्या निम्म्या कपातीनंतर हाती आलेल्या पैशातून गरीब बाप दोन जोड गणवेश घेणार तरी कसा, या प्रश्नाचं उत्तर शिक्षण खात्यानेच दिलेलं बरं..!