शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘गोरक्षकां’ची गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:17 IST

गायीचे रक्षण करण्याच्या नावाखाली माणसे मारणा-यांची गय करू नका, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश गायीच्या नावाने देशभक्तीचे टिळे लावून मिरविणा-या सा-या भोंदू देशसेवकांना लगावलेल्या चपराकीसारखा आहे

गायीचे रक्षण करण्याच्या नावाखाली माणसे मारणा-यांची गय करू नका, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश गायीच्या नावाने देशभक्तीचे टिळे लावून मिरविणा-या सा-या भोंदू देशसेवकांना लगावलेल्या चपराकीसारखा आहे. गेल्या दीड वर्षात या तथाकथित गोरक्षकांनी पन्नासहून अधिक गरीब माणसांची हत्या केली आहे. मेलेल्या गायीचे कातडे सोलणा-या निरपराधांना सा-या गावक-यांसमोर बांधून तासन्तास मारायचे आणि ती चित्रे दूरचित्रवाहिन्यांवरून देशाला दाखवायची हा जीवघेणा पण बेशरम उद्योग या गोरक्षकांनी मध्यंतरी केला. दुर्दैव याचे की महाराष्ट्रापासून हरियाणापर्यंतच्या राज्य सरकारांनीच याविषयी जे कायदे केले ते गोवंशाच्या रक्षणाचे असले तरी त्यामुळेच आपल्याला गोमांसाच्या संशयावरून एखाद्याला ठार मारण्याचा अधिकार मिळाला आहे असा मूर्ख समज अनेक गोभक्तांनी करून घेतला. त्यांनी महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेशापर्यंत आणि गुजरातपासून थेट मणिपुरापर्यंत तेवढ्या निमित्ताने माणसे मारण्याचा उद्योग केला. केंद्र सरकारची व त्याला पाठिंबा देणा-या विकाऊ प्रसिद्धी माध्यमांची या संदर्भातील भूमिका केवळ संशयास्पदच नव्हे तर अपराधी म्हणावी अशी राहिली. दादरीच्या इकलाख या इसमाच्या घरी सापडलेले मांस गायीचे की बकरीचे याचीच चर्चा या माध्यमांनी व सरकारी प्रवक्त्यांनी अधिक केली. झुंडखोरांचा एक जमाव एका कुटुंबाची निर्घृण हत्या करतो या गुन्ह्याहून मांस कुणाचे याचीच चर्चा या शहाण्यांना अधिक महत्त्वाची वाटली. माणसांहून जनावरे मोलाची झाली असे चित्र या साºया प्रकारातून देशात उभे राहिले. या अपराधी गोभक्तांचा गौरव करणारे लोकही या काळात पुढे आले तेव्हा आपल्या समाजाचेच अपराधीकरण झाले आहे की काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला. शिवाय गायीच्या नावाने माणसे मारणा-या एकाही खुनी इसमाला वा झुंडीला या घटकेपर्यंत अटक वा शिक्षा न होणे ही बाबही याच मनोवृत्तीला बळ देणारी ठरली. गोवंशाच्या हत्येवर बंदी घालण्यापूर्वी तिच्या परिणामांचीही चर्चा सरकारांनी कधी केली नाही. गावोगावची मांसाची किती दुकाने बंद झाली, कोल्हापूरसारख्या शहरातील चपलांच्या उद्योगाला कशी अवकळा आली, देशातून निर्यात केल्या जाणा-या कातड्यांची कमाई किती कमी झाली यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा विचारही हा निर्णय घेण्याआधी सरकारने केल्याचे दिसले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आता जे निर्देश दिले आहेत त्यामुळे तरी या सरकारांना व त्यांच्या संरक्षक यंत्रणांना माणसांना संरक्षण द्यावे आणि माणसे मारणा-यांना शिक्षा करावी अशी बुद्धी व्हावी ही अपेक्षा आहे. आजवर जी माणसे या गोरक्षकांनी मारली त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याचे आदेश या न्यायालयाने दिले आहेत. यापुढे अशी हत्याकांडे घडणार नाहीत याची काळजी संबंधित सरकारांनी घ्यावी असेही निर्देश या न्यायालयाने दिले आहेत. वास्तविक न्यायालयाने ही भूमिका फार पूर्वी घेणे गरजेचे होते. ती तशी न घेतल्याने अनेक निरपराध माणसे प्राणाला मुकली आणि धर्माच्या नावावर ज्यांना केवळ सूडच सुचतो त्या उठवळ माणसांना त्यामुळे दंगलीही करता आल्या. या सूडापायी जी माणसे मृत्यू पावली त्यांच्या बाजूने देशातील सत्ताधारी पक्ष कधी निषेधाची भाषा बोलला नाही आणि बहुसंख्यकांची भीती मनात बाळगणारे इतर पक्षही त्याविषयी कधी अश्रू ढाळताना दिसले नाहीत. हा प्रकार अंधश्रद्धेकडून विज्ञाननिष्ठेचा झालेला पराभव सांगणाराही होता. आपल्या घटनेने वैज्ञानिक दृष्टीचा स्वीकार हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरविले आहे. मात्र सूड बळावला की सा-यांनाच कर्तव्याची भूल पडते. ती दूर करणा-या सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन.

टॅग्स :Courtन्यायालय