शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

सृजनात्मक साक्षरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

ज्ञान विज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना, होणारा अक्षरसंकोच चिंताजनक आहे. सा-यांचाच प्रवास साक्षरतेकडून सुजाणतेकडे आणि सुजाणतेकडून सुसंस्कृतपणाकडे व्हायला हवा...

ज्ञान विज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना, होणारा अक्षरसंकोच चिंताजनक आहे. सा-यांचाच प्रवास साक्षरतेकडून सुजाणतेकडे आणि सुजाणतेकडून सुसंस्कृतपणाकडे व्हायला हवा...माणसाच्या मूलभूत गरजा तीन. अन्न, वस्त्र आणि निवारा! पण याही पलीकडे एक गरज उरतेच. ती म्हणजे संवादाची! त्यामुळेच जन्माला आली अक्षरे आणि लिपी. त्याच्या विकासातून आले शिक्षण. माणसाचा विकास होत गेला तसतसे प्रत्येक टप्प्यावर शिक्षण विकसित होत गेले आणि माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे अवकाश विस्तारत गेले. अक्षरांना गुंफणारी भाषा नसती तर संवाद प्रक्रियेला मोठी खीळ बसली असती. म्हणूनच साक्षरतेचे महत्त्व सर्वकालिक आहे. आज जो एक संपन्न समृद्ध वारसा आपण अनुभवतो आहोत, त्यामागे भाषिक विरासत हा फार मोठा आधार आहे. सुरेश भटांसारख्या प्रख्यात कवीनेही ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या शब्दांत भाषेचा गौरव केला तो यामुळेच असावा. जागतिक साक्षरता दिन साजरा होत असताना तर अक्षरांचे महत्त्व, त्याची गरज अधोरेखित करतानाच त्याचा पैस विस्तारणे आवश्यक आहे.असं म्हणतात, की ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’ आणि ज्याला अक्षर कळतं तो ‘साक्षर’! रामायण, महाभारतापासून ते शेक्सपीअरच्या नाटकांपर्यंत आणि संत ज्ञानेश्वर-तुकारामांपासून ते खांडेकर-शिरवाडकर-पाडगांवकरांपर्यंत जी काही साहित्य संपदा वैभवशाली वारसा जपून आहे ती केवळ अक्षरांमुळेच.१९६५ रोजी तेहरान येथे जागतिक पातळीवरील एक परिषद भरली होती. या परिषदेत पार पडलेल्या ठरावानुसार ८ सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. भारतात १९७८ पासून साक्षरता दिनाचे रोपटे लावले गेले. पण या रोपट्याचे वटवृक्षात अद्यापही रूपांतर होऊ शकले नाही ही खरी खंत आहे. राष्ट्रीय स्तरावर ५ मे १९८८ रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशन स्थापण्यात आले. त्यानुसार इ.स. २००० पर्यंत संपूर्ण भारत पूर्ण साक्षर अशी आपल्या राज्यकर्त्यांनी घोषणा केली होती. ही मुदत संपून आज १७ वर्षे झाली तरी संपूर्ण भारत पूर्ण साक्षर आहे, अशी आपल्याला घोषणा करता येत नाही. देशात राष्ट्रीय प्रौढ शिक्षणाचीही सुरुवात झाली.देशाचा विचार करताना लक्षात येते की, आपल्याकडे अद्यापही साक्षरतेचे प्रमाण शंभर टक्के नाही. २०१५ अखेरपर्यंत भारतात ग्रामीण भागात ७१ टक्के तर शहरी भागात ते ८६ टक्के होते. काल-परवापर्यंत साक्षरतेचे १०० टक्के प्रमाण असलेले केरळ राज्यही पाच टक्क्यांनी घसरून ९५ टक्क्यांवर आले आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड ही राज्ये अद्यापही ७० टक्क्यांहून कमी साक्षरता असलेली आहेत तर महाराष्ट्रात हे प्रमाण ८५ टक्के आहे. आज युरोप अमेरिकेपेक्षा आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. त्याला कारण आपल्या देशात विशिष्ट समाजालाच शिकण्याचा व शिकवण्याचाही अधिकार होता. त्यात स्त्रियांना तर नव्हताच. मग ती स्त्री उच्च वर्गातील असो वा कनिष्ठ. तेव्हा हजारो वर्षांची ही त्रुटी पूर्ण करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, सामूहिक प्रयत्न याद्वारेच साध्य करता येईल. त्यासाठी शैक्षणिक वातावरण पूरक आणि पोषक असणे फार गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकाची भूमिका कमालीची महत्त्वाची आहे. शिक्षक बुद्धिमान, संस्कारप्रेमी आणि सदैव सतर्क आणि दक्ष असायला हवा. शिक्षकानं विद्यार्थ्यांना केवळ अर्थच समजून सांगावा असे नाही तर त्यांच्यात जीवनाचे भान, जाण निर्माण करावी. शिक्षण हे माणूस घडविण्यासाठी, माणूसपण वाढविण्यासाठी आणि जीवनाच्या साफल्यासाठी असायला हवं. विद्यार्थ्यांच्या जाणिवांचा विकास शिक्षकानं करावा. शिक्षणाचा संबंध केवळ अक्षरांशी, पुस्तकी ज्ञानाशी नाही तर तो जगण्याशी आहे. जगण्याचं सार आत्मसात करणं हाच शिक्षणाचा गाभा आहे.दुर्दैवानं आजकाल ज्ञान विज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना, होणारा अक्षरसंकोच चिंंताजनक आहे. साक्षरतेकडून सुजाणतेकडे आणि सुजाणतेकडून सुसंस्कृतपणाकडे असा प्रवास व्हायला हवा तरच आपण खºया अर्थाने सुजाण जबाबदार नागरिक म्हणवून घेण्यास पात्र ठरू शकू.- विजय बाविस्कर