शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

न्यायालयही चुकते !

By admin | Updated: January 30, 2016 03:45 IST

इंग्लंडमध्ये ‘क्वीन कॅन डू नो राँग’ अशी म्हण प्रचलित आहे. म्हणजे राणी किंवा राजा चूक करुच शकत नाही! त्याच धर्तीवर भारतात ‘न्यायालये कधी चूक करुच शकत नाहीत’ असे मानले जाते.

इंग्लंडमध्ये ‘क्वीन कॅन डू नो राँग’ अशी म्हण प्रचलित आहे. म्हणजे राणी किंवा राजा चूक करुच शकत नाही! त्याच धर्तीवर भारतात ‘न्यायालये कधी चूक करुच शकत नाहीत’ असे मानले जाते. पण या गृहीतकाला छेद देणारा किंवा अपवादाने नियम सिद्ध होत असल्याने अपवाद म्हणून का होईना एक चूक थेट सर्वोच्च न्यायालयानेच केल्याचे आणि नंतर आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर ती स्वत:च दुरुस्त करण्याचा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेश राज्यात लोकआयुक्तांच्या नियुक्तीचा घोळ कित्येक दिवसांपासून सुरु आहे. तो घोळ लवकर आवरा आणि नियुक्ती करा असा तगादा सर्वोच्च न्यायालयाने वारंवार लावला आणि त्यासाठी अनेकदा अंतिम मुदतदेखील दिली. पण काहीही उपयोग झाला नाही. लोकआयुक्तांच्या निवडीसाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची समिती असते व समितीच्या सर्व सदस्यांमध्ये ज्या नावावर एकवाक्यता होईल ते नाव निवडले जाते. पण तसे होत नव्हते. काही नावांवर मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते सहमत होते तर मुख्य न्यायाधीश असहमत होते. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने जी नावे विचाकार्थ घेतली गेली होती ती सारी स्वत:कडे मागवून घेतली. त्या नावांमधूनच निवृत्त न्यायाधीश विरेन्द्र सिंह यांचे नाव उचलून त्यांना लोकआयुक्त म्हणून नियुक्त करुन टाकले. सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार घटनेनेच दिला आहे. पण विरेन्द्र सिंह यांच्या नावास अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश धनंजय चन्द्रचूड यांनी आक्षेप घेतला. तो आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरुन सिंह यांना लोकआयुक्तपदाची शपथ घेण्यास मज्जाव केला. हे सर्व घडून गेल्यानंतर आता जवळजवळ महिनाभराने पुन्हा सर्वोच्च न्यायालयानेच निवृत्त न्यायाधीश संजय मिश्रा यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. याचा अर्थ कोणत्याही एका नावावर एकमत होणे उत्तर प्रदेश सरकारला किती आणि का अवघड जात होते याचा प्रत्यय खुद्द सर्वोच्च न्यायालयालाच आला असे म्हणता येईल. मुळात लोकआयुक्तपदी कोणाला बसवायचे याबाबत इतका घोळ आणि इतके मतभेद का व्हावेत हा एक प्रश्नच आहे. आजवर जे जे लोक या पदावर राहून गेले त्यांचा अभिप्राय लक्षात घेता लोकआयुक्त किंवा उप लोकआयुक्त ही पदे म्हणजे न्यायपालिका वा प्रशासनातून निवृत्त झालेल्यांच्या पुनर्वसनाचे एक साधन म्हणून बनले आहे. या पदांना ‘टूथलेस टायगर’ म्हणजे दात पाडलेला वाघ असेही यातील काहींनी संबोधले आहे. जी अवस्था आज राज्याराज्यातील लोकआयुक्तांची आहे, त्यापेक्षा वेगळी अवस्था जनलोकपाल किंवा अण्णा हजारे यांच्या स्वप्नातील जनलोकपालाची होईल असे समजण्याचे कारण नाही. अशी पदे म्हणजे केवळ अलंकार असतात व तो कोणाला द्यायचा यावरुनच मतभेद होतात आणि त्यात न्यायपालिकाही येते इतकाच याचा अर्थ.