शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'वाचेदयाळां'चा देश!

By admin | Updated: September 21, 2016 07:53 IST

पाकिस्तानी लष्कराने ज्यांना पुरस्कृत केल्याचा भारताचा दावा आहे आणि जो नेहमीप्रमाणे पाकने फेटाळून लावला आहे

पाकिस्तानी लष्कराने ज्यांना पुरस्कृत केल्याचा भारताचा दावा आहे आणि जो नेहमीप्रमाणे पाकने फेटाळून लावला आहे, त्या दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे जम्मू-काश्मिरातील उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्याचे आणि या हल्ल्यात हकनाक आपले प्राण गमवावे लागलेल्या सतरा जवानांच्या मृत्यूचे शल्य दीर्घकाळपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचत राहील यात शंका नाही. जेव्हा केव्हा असे शल्य मनात दाटून येते तेव्हा संवेदनशील माणूस अंतर्मुख होतो, आत्मपरीक्षण करतो आणि भविष्यात पुन्हा तसे काही घडू नये यासाठी काय तजवीज करायची याचा शांतपणे विचार करतो; पण कोणत्याही स्थितीत तो वाचाळपणा मात्र करीत नाही. दुर्दैवाने आजवर जेव्हा जेव्हा पाकिस्तानने स्वत: किंवा पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतात येऊन आगळीक केली तेव्हा तेव्हा भारतात उफाळून आली ती वाचाळता. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे', या सुभाषितवजा म्हणीची मग प्रकर्षाने आठवण होते. पाकी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला तेव्हा तो देशाच्या गंडस्थळावरील हल्ला मानला गेला. त्यानंतर मुंबई, पठाणकोट, उरी असे एकामागोमाग एक हल्ले झाले आणि देशाची एक नव्हे अनेक गंडस्थळे फोडली गेली. त्यावरील प्रतिक्रिया पुन्हा तीच, वाचाळवीरतेची. घातक्यांना त्यांच्या पापाची सजा दिली जाईल, ईट का जबाब पत्थर से दिया जायेगा, पाकिस्तानला हे खूप महागात पडेल, असे किंवा यासारखे इशारे पंतप्रधानांपासून निम्न स्तरावरील पुढार्‍यांपर्यंत सारे जणच जे देत असतात ते नेमके कोणाला उद्देशून असतात? आंतरराष्ट्रीय समुदायाला? आणि त्याचा लाभ काय? उलट असे इशारे किंवा अशी वक्तव्ये अकारण देशात एक उन्माद करतात आणि उन्मादात विवेक नेहमीच हरवून जात असतो. जे सतरा जवान मृत्युमुखी पडले त्यांच्या देहत्यागाचा पूर्ण आदर राखून जर असे म्हटले की, त्यांनी वास्तवात जे पत्करले ते वीरमरण नव्हते, तर तो अनास्थेने घेतलेला त्यांचा बळी होता, तर ते वावगे कसे ठरू शकेल? प्रत्यक्ष नियंत्रणरेषेपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या आणि म्हणूनच अत्यंत संवेदनशील मानल्या जाणार्‍या उरी येथील लष्करी तळाचा जर कडेकोट बंदोबस्त करण्यात लष्कर आणि लष्कराचे कर्तेकरविते अपयशी ठरत असतील तर 'आम्हाला सरकारने आता परवानगी द्यावी, आम्ही सीमा पार करून पाकवर हल्ला करू' ही लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांची भाषादेखील एक वाचाळताच ठरत असते. येथे प्रमोद महाजन संरक्षणमंत्री असतानाचा एक प्रसंग आठवतो. एका दूरचित्रवाणीवरील चर्चा कार्यक्रमात त्यांना एका विदेशी पत्रकाराने वारंवार 'पाकने हल्ला केला तर तुमची भूमिका काय राहाणार' हा एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यावर महाजन म्हणाले, 'कोणत्याही सार्वभौम देशाच्या संरक्षण सज्जतेची आणि धोरणात्मक बाबींची चर्चा अशी चावडीवर बसून होत नसते;' पण दुर्दैवाने आज तसेच सुरू आहे. पाकी लष्कराने अशा उघड परवानग्या मागून आणि घेऊन आजवरचे भारतावरील हल्ले केले होते काय? लष्करात सेवारत असलेल्या अधिकर्‍यांची ही तर्‍हा, तर नवृत्तांचे बोलायलाच नको. आता भारताने पाकिस्तानात 'फिदाईन' पाठविले पाहिजेत असे एक नवृत्त लष्करी जनरल म्हणतो, तर दुसरा मुलकी तथाकथित सुरक्षा सल्लागार सल्ला देतो की, टाकाच एकदा पाकिस्तानवर अणुबॉम्ब. फार तर काय होईल, पाकही टाकेल आणि मरतील भारतातील दहा-पाच कोटी लोक; पण प्रश्न तर कायमचा निकाली निघेल! युद्ध काय असते, त्याचे परिणाम काय संभवतात, आज समोरासमोरच्या युद्धाचा काळ राहिलेला नाही; पण तरीही संघर्ष सुरू करायचा म्हटला की, त्याचे गंभीर आर्थिक परिणाम जनतेला भोगणे भाग असते, प्रचंड महागाईचा सामना करणे क्रमप्राप्त ठरत असते; पण कांदा पन्नास रुपये झाला की, लगेच कासावीस होणारे व सरकारे उलथवून टाकणारे लोक समाजमाध्यमांमधून सल्ले देत असतात, बेचिराख करा पाकिस्तानला. आपले जपावे आणि दुसर्‍याला यश द्यावे, अशी मराठीत एक म्हण आहे; पण भारतावर आजतागायत जितके म्हणून अतिरेकी हल्ले झाले त्या प्रत्येक हल्ल्याच्या वेळी कोणत्या ना कोणत्या यंत्रणेचा गाफीलपणाच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले; पण पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ल्यात तर केवळ गाफिलीच नव्हे, तर शत्रूशी हातमिळवणी करणार्‍यांची गद्दारी कारणीभूत असल्याचे दिसून आले; पण अशा प्रत्येक हल्ल्यानंतर कोणता धडा शिकला गेला आणि दक्षतेचे व सावधगिरीचे कोणते उपाय योजले गेले. संसदेवर हल्ला झाल्यानंतर तेथील सुरक्षाव्यवस्था अत्यंत चोख करण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगितले.