शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पदव्यांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:48 IST

शैक्षणिक क्षेत्राकडे नेहमी आदराने पाहिले गेले आहे; मात्र तेथे दिवसेंदिवस नीतिमूल्यांचा -हास होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

शैक्षणिक क्षेत्राकडे नेहमी आदराने पाहिले गेले आहे; मात्र तेथे दिवसेंदिवस नीतिमूल्यांचा -हास होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. महाराष्टÑात बनावट पदव्या, त्याचे वाटप करणारी बोगस विद्यापीठे यांचा सुळसुळाट झाला आहे. पीएच.डी., एम.फिल.सारख्या पदव्यांची बोगस विद्यापीठांमधून विक्री करण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांची गंभीर दखल उच्च शिक्षण विभागाकडून घेतली जाणे आवश्यक आहे, अन्यथा पदव्यांची विश्वासार्हताच धोक्यात येण्याची भीती आहे. पुण्यातील स्पायसर अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू नोबल प्रसाद पिल्ले यांचीच पीएच.डी.ची पदवी बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे. या प्रकरणी पिल्ले यांच्यासह विद्यापीठाचे मुख्य वित्तीय अधिकारी रत्नास्वामी जयेम, कला शाखेचे प्रमुख चाको पॉल, क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे संचालक गोपाल भिकाजी खंदारे यांच्यावर चतु:शृृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट पदवीचा आधार घेऊन पिल्ले यांनी विद्यापीठाचे सर्वोच्च असे कुलगुरूपद मिळविले. त्यामुळे बनावट पदवी प्रकरणातील गांभीर्य लक्षात येते. इतकेच काय, राज्यातील एका मंत्र्याचीच पीएच.डी. बनावट असल्याचा गौप्यस्फोट खुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी जाहीर कार्यक्रमात केलेला आहे. साताऱ्यामधील आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असे नाव धारण करणाºया एका बोगस विद्यापीठातून अनेक नामवंत व्यक्तींंसह शेकडो जणांना बनावट पीएच.डी. पदव्यांचे वाटप करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता पीएच.डी.सारख्या महत्त्वाच्या पदवीवरचा विश्वासच उडून चालला आहे. एका खोलीमधून चालवली जाणारी अनेक बोगस विद्यापीठे राज्यात कार्यरत आहेत. तिथल्या पदव्या घेऊन अनेक जण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. अशा बोगस पदव्या धारण करणारे प्राध्यापक विद्यार्थ्यांना कसले शिक्षण देणार आहेत? या बाजारूपणामुळे शैक्षणिक गुणवत्तेचा ºहास होत आहे. बोगस विद्यापीठांमधून सर्रास बनावट पदव्यांचे वाटप केले जात असताना त्याविरोधात ठोस कारवाई का करण्यात येत नाही? त्याचबरोबर महाविद्यालयांमध्ये नोकºया देताना संबंधितांची पदवी बनावट असल्याचे शासनाच्या लक्षात कसे आले नाही? असे गंभीर प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. शासनाने बनावट पदव्यांची कीड वेळीच नष्ट न केल्यास नव्या पिढीचे भविष्य तर अंधारेलच, पण अनेक गंभीर परिणामांनाही सामोरे जावे लागेल.