शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बनावट पदव्यांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:48 IST

शैक्षणिक क्षेत्राकडे नेहमी आदराने पाहिले गेले आहे; मात्र तेथे दिवसेंदिवस नीतिमूल्यांचा -हास होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

शैक्षणिक क्षेत्राकडे नेहमी आदराने पाहिले गेले आहे; मात्र तेथे दिवसेंदिवस नीतिमूल्यांचा -हास होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. महाराष्टÑात बनावट पदव्या, त्याचे वाटप करणारी बोगस विद्यापीठे यांचा सुळसुळाट झाला आहे. पीएच.डी., एम.फिल.सारख्या पदव्यांची बोगस विद्यापीठांमधून विक्री करण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांची गंभीर दखल उच्च शिक्षण विभागाकडून घेतली जाणे आवश्यक आहे, अन्यथा पदव्यांची विश्वासार्हताच धोक्यात येण्याची भीती आहे. पुण्यातील स्पायसर अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू नोबल प्रसाद पिल्ले यांचीच पीएच.डी.ची पदवी बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे. या प्रकरणी पिल्ले यांच्यासह विद्यापीठाचे मुख्य वित्तीय अधिकारी रत्नास्वामी जयेम, कला शाखेचे प्रमुख चाको पॉल, क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे संचालक गोपाल भिकाजी खंदारे यांच्यावर चतु:शृृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट पदवीचा आधार घेऊन पिल्ले यांनी विद्यापीठाचे सर्वोच्च असे कुलगुरूपद मिळविले. त्यामुळे बनावट पदवी प्रकरणातील गांभीर्य लक्षात येते. इतकेच काय, राज्यातील एका मंत्र्याचीच पीएच.डी. बनावट असल्याचा गौप्यस्फोट खुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी जाहीर कार्यक्रमात केलेला आहे. साताऱ्यामधील आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असे नाव धारण करणाºया एका बोगस विद्यापीठातून अनेक नामवंत व्यक्तींंसह शेकडो जणांना बनावट पीएच.डी. पदव्यांचे वाटप करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता पीएच.डी.सारख्या महत्त्वाच्या पदवीवरचा विश्वासच उडून चालला आहे. एका खोलीमधून चालवली जाणारी अनेक बोगस विद्यापीठे राज्यात कार्यरत आहेत. तिथल्या पदव्या घेऊन अनेक जण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. अशा बोगस पदव्या धारण करणारे प्राध्यापक विद्यार्थ्यांना कसले शिक्षण देणार आहेत? या बाजारूपणामुळे शैक्षणिक गुणवत्तेचा ºहास होत आहे. बोगस विद्यापीठांमधून सर्रास बनावट पदव्यांचे वाटप केले जात असताना त्याविरोधात ठोस कारवाई का करण्यात येत नाही? त्याचबरोबर महाविद्यालयांमध्ये नोकºया देताना संबंधितांची पदवी बनावट असल्याचे शासनाच्या लक्षात कसे आले नाही? असे गंभीर प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. शासनाने बनावट पदव्यांची कीड वेळीच नष्ट न केल्यास नव्या पिढीचे भविष्य तर अंधारेलच, पण अनेक गंभीर परिणामांनाही सामोरे जावे लागेल.