शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हे जाणकार की अपराधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:05 IST

ज्यांनी याचा आरंभ करू नये त्यांनीच तो केल्यानंतर मागाहून येणाऱ्या बावळटांनी त्याची री ओढली आणि ती ओढताना आपण धर्मरक्षण करीत असल्याचा भक्तिभाव मनात आणला तर तो त्यांचा दोष कसा म्हणायचा?

ज्यांनी याचा आरंभ करू नये त्यांनीच तो केल्यानंतर मागाहून येणाऱ्या बावळटांनी त्याची री ओढली आणि ती ओढताना आपण धर्मरक्षण करीत असल्याचा भक्तिभाव मनात आणला तर तो त्यांचा दोष कसा म्हणायचा? माणसाच्या देहावर हत्तीचे मस्तक लावून त्याचा गणपती करणारी पहिली प्लास्टिक सर्जरी भारतात झाली असे पंतप्रधान मोदीच म्हणाल्यानंतर त्यांच्या निष्ठावंत भगतांना त्यांचे मूर्खपण मोकळे करायला सारे रानच सापडले. मग माणसाच्या देहावर माकडाचे डोके लावून हनुमान तर मगरीचे डोके लावून मकरध्वज तयार झाला आणि नागाचा फणा लावून नागलोकांची निर्मिती झाली अशा पौराणिक शस्त्रक्रियांचे वर्णन त्यांचे पक्षीगण व मंत्रीगणही करू लागले. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देब आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी महाभारताच्या काळातच देशात संगणक, दूरचित्रवाणी आणि अण्वस्त्रे होती असे सांगितले. त्याखेरीज संजयाने धृतराष्टÑाला कुरुक्षेत्रावरील युद्धकथा कशा ऐकविल्या असतील असा पुरावा त्यांनी पुढे केला. अग्न्यास्त्र किंवा पर्जन्यास्त्र ही खरोखरीची आधुनिक अस्त्रे होती व त्यांनीच ते युद्ध लढविले गेले असेही त्या शहाण्यांनी सांगितले. तशा समजुतींना शहाणपण मानणाºयांची संख्या त्यांच्या पक्षात व देशातही लहान नाही. त्यांची ही वक्तव्ये जाहीर होण्याआधी देशातील ‘वैज्ञानिकांनी’ जागतिक परिषदांसमोर ‘रामायणकालीन पुष्पक विमानावर’ प्रबंध वाचले आणि हनुमानाचे उड्डाण हे शास्त्रीय सत्य असल्याचेही सांगून टाकले. या शस्त्रक्रिया व शस्त्रांचे शोध यांना पूरक ठरणारे वैैद्यकही मग पुढे आले. गायीचे शेण खाल्ल्याने (त्याला श्रावणी म्हणायचे) वा मूत्र प्राशन केल्याने कर्करोग बरा होतो असे सांगणारे वैदू मग प्रगट झाले. त्या पार्श्वभूमीवर संभाजी मास्तरांनी ‘माझ्या शेतातील आंबे खा आणि पोरांना (पोरींना नव्हे) जन्म द्या’ असे सांगून पुरुषांची संख्या वाढवण्याचा संदेश आपल्या अनुयायांसह समाजाला दिला असेल तर तो त्यांचा दोष न मानता त्यांच्या देशभक्तीचा आविष्कार मानला पाहिजे. गोव्यात विजय सरदेसाई नावाचे एक मंत्री आहेत. शेतातील पीक वाचवायला त्यात मृत्युंजय मंत्राचा जागर करण्याचा सल्ला त्यांनी शेतकºयांना दिला आहे. मृत्युंजयाचा मंत्र माणसांसाठी वापरण्याची श्रद्धा लोकात आहे. आता ती पिकांवरील प्रयोगासाठी करून पाहण्याची बुद्धी या सरदेसायाला झाली असेल तर तो त्याच्या प्रयोगशीलतेचा नमुनाच मानायचा की नाही? श्रद्धांचे साम्राज्य मोठे आहे. ते मोडून काढणे विज्ञानाला अजून जमले नाही. मात्र ज्या श्रद्धा आपल्याएवढ्याच आपल्या समाजाला हास्यास्पद बनवतील त्याबाबत न बोलण्याचे किमान तारतम्य जनतेचे नेते व प्रतिनिधी यांनी बाळगावे की नाही? कर्करोगाविषयीची जगातली सगळी प्रगत संशोधने अजून त्याच्या परिणामकारक उपायांपर्यंत पोहचली नाहीत. अशावेळी शेण खावून तो रोग बरा होतो असे म्हणणाºयांना जाणकार समजायचे की गुन्हेगार? देशात व महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे आहेत. त्यांना विरोध करणाºया ‘शेणवाल्या’ लोकांचा वर्गही मोठा आहे. त्यांच्या श्रद्धांपायी स्त्रियांचा होणारा छळ, अनेकांना आलेले आंधळेपण आणि देवीला मुरळी म्हणून सोडलेल्या बायका यांची या कायद्यांतर्गत कधी तपासणी व सर्वेक्षण करायचे की नाही? की तसे न करता या मृत्युंजयवाल्यांची आणि शेणाचे गुणवर्णन करणाºयांची छायाचित्रे वर्तमानपत्रात छापून आणायची? देश स्वतंत्र झाला तेव्हा एका विदेशी पत्रकाराने नेहरूंना प्रश्न विचारला, ‘तुमच्यासमोरची सर्वात बिकट समस्या कोणती?’ नेहरू म्हणाले ‘एका धर्मश्रद्ध समाजाला विज्ञाननिष्ठ व धर्मनिरपेक्ष बनविण्याची’. नेहरूंची ती समस्या गेल्या ७० वर्षात सैल झाली की घट्ट? आणि तशी ती करणारे कोण? जेव्हा सरकारच अंधश्रद्धांना खतपाणी घालते तेव्हा त्यांचा समाजाभोवतीचा विळखा सुटायचा कधी? दिल्लीसारख्या शहरात एकाचवेळी एक डझन माणसे अशा अंधश्रद्धेपायी सामूहिक आत्महत्या करीत असतील तर त्याचा दोष अशा श्रद्धा पसरविणाºयांचा की त्याविरुद्ध लढणाºयांचा?

टॅग्स :newsबातम्या