शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

Coronavirus : जनाची नाही, मनाची तरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 02:28 IST

coronavirus : वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी तर ‘मी हात जोडतो, पाया पडतो, पण बिनकामाचे घराबाहेर पडू नका’, असे सांगितले. त्याचाही परिणाम होताना दिसत नाही.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीजवळ गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सगळ्या पक्षांचे नेते, या क्षेत्रातील जगभरातले अभ्यासक, तज्ज्ञ डॉक्टर, वैज्ञानिक घसा कोरडा करून सांगत आहेत. ‘घरात बसा, कोरोना संसर्गाची साखळी त्याशिवाय तुटणार नाही. सक्ती किंवा सरकारी जबरदस्ती करायला भाग पाडू नका,’ तरीही महाराष्ट्रावर याचा कसलाही परिणाम होताना दिसत नाही. राज्याचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी तर ‘मी हात जोडतो, पाया पडतो, पण बिनकामाचे घराबाहेर पडू नका’, असे सांगितले. त्याचाही परिणाम होताना दिसत नाही.

चीनमधून सुरुवात झालेला हा विषाणू आता जगभरात पसरला आहे. चीनने तत्काळ यावर उपाय शोधला आणि त्यांची शहरे तातडीने कडेकोट बंद करून टाकली. त्याचा परिणाम काही दिवसांतच समोर आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत चीनमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. मात्र इटली, फ्रान्स, अमेरिका या देशांमध्ये लोकांना काही सांगण्याचा किंवा सल्ले देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांना त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आल्यासारखे वाटते. त्यामुळे त्या देशांनी वारंवार सांगूनही तिथल्या नागरिकांनी सरकारचे म्हणणे ऐकले नाही. परिणामी इटलीतील बाधित भागात मरून पडलेले लोक नेण्यासाठी नातेवाईक पुढे येताना दिसत नाहीत. ज्या देशातील लोक तसेही कोणामध्ये फारसे मिसळत नाहीत, फारसे ‘सोशल’ नाहीत त्या देशांमध्ये कोरोनाने हाहाकार उडवला आहे. एकट्या इटलीत एका दिवसात ८०० हून अधिक लोकांचे जीव गेले.

प्रेते नेण्यासाठी लष्कराच्या गाड्या आणाव्या लागल्या. भारत हा तर सभा, समारंभात रमणारा देश. येथे कधीही, कशासाठीही सहज गर्दी होऊ शकते. अशा वेळी सामाजिक जीवनात बाळगायची शिस्त कोणी फारशी पाळत नाही. त्यामुळे आपल्याकडे कोरोना तिसऱ्या टप्प्यात शिरला तर चीन, इटलीपेक्षा भयावह परिस्थिती येऊ शकते. म्हणूनच सगळे वारंवार सांगत आहेत. घराबाहेर पडू नका, अशा विनवण्या करत आहेत. तरीही महाराष्टÑ हे गांभीर्याने घ्यायला तयार नाही. लोक स्वत:ला समजतात तरी काय कोणास ठाऊक? कोरोनावरून सोशल मीडियात वाट्टेल ते विनोद, आचरट विचकट किस्से, अफवा, अश्लील चित्रफिती पसरवण्यात काही महाभागांना आनंद वाटतोय.

जे कोणी अशा गोष्टी करत आहेत त्यांच्या घरात कोरोनाचा रुग्ण आढळला तर ते असेच वागतील का? याचे उत्तर त्यांनी स्वत:लाच द्यावे. कशाची मस्ती, झींग अशा लोकांना आली आहे? काही जण ‘आम्ही खासगी नोकºया करतो, आमचे पोट हातावर आहे’ अशी कारणे पुढे करत आहेत. मात्र आपल्याकडे दंगल झाली असती, कर्फ्यू लावण्याची वेळ आली असती तर, तेव्हा आम्ही असेच वागलो असतो का? दुर्दैवाने आपण तिसºया-चौथ्या टप्प्यात गेलो तर आपल्याकडे लाखो रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स नाहीत, डॉक्टर नाहीत. रुग्णालयांमधून खाटाही मिळणार नाहीत. उपचारांअभावी अनेकांचे तडफडून जीव जातील. जागतिक आरोग्यतज्ज्ञ रामानन लक्ष्मीनारायण यांच्या मते भारतात जर हा आजार पसरला तर ६० टक्के भारतीयांना याची लागण होऊ शकते. याचा अर्थ १३० कोटी लोकसंख्येपैकी ७० ते ७५ कोटी जनतेला कोरोनाची लागण होईल. हे वाचताना अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, पण आज राज्यातील लोक हे विधान खरे ठरवण्याच्या मागेच लागल्यासारखे वागताना दिसत आहेत.

पैसे कधीही कमावता येतील, मात्र जीव गेला तर तो कधीच परत येणार नाही. इटली, फ्रान्समधल्या महाराष्टÑातील तरुणांनी संदेश पाठवणे सुरू केले आहे. काय घडू शकते हे आम्ही अनुभवले आहे, घरात बसा, असे ते तरुण कळवळून सांगत आहेत. आम्ही मात्र हाती तिरंगा घेऊन जल्लोष करत फिरण्यात धन्यता मानत आहोत. ही देशभक्ती नाही. हा देशाशी केलेला द्रोह आहे. असे लोक केवळ स्वत:चाच नाही तर आपल्या आप्तस्वकीयांचा जीवही धोक्यात घालत आहेत. घरात बसून विराट कोहलीला क्रिकेटचे धडे देण्यात ज्यांची हयात जाते त्यांना देशभक्ती काय कळणार? वेळ गेलेली नाही. अजूनही भानावर या. घरात बसून देशभक्ती दाखवा. जनाची नाही तरी मनाची तरी बाळगा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या