शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

Coronavirus : जनाची नाही, मनाची तरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 02:28 IST

coronavirus : वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी तर ‘मी हात जोडतो, पाया पडतो, पण बिनकामाचे घराबाहेर पडू नका’, असे सांगितले. त्याचाही परिणाम होताना दिसत नाही.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीजवळ गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सगळ्या पक्षांचे नेते, या क्षेत्रातील जगभरातले अभ्यासक, तज्ज्ञ डॉक्टर, वैज्ञानिक घसा कोरडा करून सांगत आहेत. ‘घरात बसा, कोरोना संसर्गाची साखळी त्याशिवाय तुटणार नाही. सक्ती किंवा सरकारी जबरदस्ती करायला भाग पाडू नका,’ तरीही महाराष्ट्रावर याचा कसलाही परिणाम होताना दिसत नाही. राज्याचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी तर ‘मी हात जोडतो, पाया पडतो, पण बिनकामाचे घराबाहेर पडू नका’, असे सांगितले. त्याचाही परिणाम होताना दिसत नाही.

चीनमधून सुरुवात झालेला हा विषाणू आता जगभरात पसरला आहे. चीनने तत्काळ यावर उपाय शोधला आणि त्यांची शहरे तातडीने कडेकोट बंद करून टाकली. त्याचा परिणाम काही दिवसांतच समोर आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत चीनमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. मात्र इटली, फ्रान्स, अमेरिका या देशांमध्ये लोकांना काही सांगण्याचा किंवा सल्ले देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांना त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आल्यासारखे वाटते. त्यामुळे त्या देशांनी वारंवार सांगूनही तिथल्या नागरिकांनी सरकारचे म्हणणे ऐकले नाही. परिणामी इटलीतील बाधित भागात मरून पडलेले लोक नेण्यासाठी नातेवाईक पुढे येताना दिसत नाहीत. ज्या देशातील लोक तसेही कोणामध्ये फारसे मिसळत नाहीत, फारसे ‘सोशल’ नाहीत त्या देशांमध्ये कोरोनाने हाहाकार उडवला आहे. एकट्या इटलीत एका दिवसात ८०० हून अधिक लोकांचे जीव गेले.

प्रेते नेण्यासाठी लष्कराच्या गाड्या आणाव्या लागल्या. भारत हा तर सभा, समारंभात रमणारा देश. येथे कधीही, कशासाठीही सहज गर्दी होऊ शकते. अशा वेळी सामाजिक जीवनात बाळगायची शिस्त कोणी फारशी पाळत नाही. त्यामुळे आपल्याकडे कोरोना तिसऱ्या टप्प्यात शिरला तर चीन, इटलीपेक्षा भयावह परिस्थिती येऊ शकते. म्हणूनच सगळे वारंवार सांगत आहेत. घराबाहेर पडू नका, अशा विनवण्या करत आहेत. तरीही महाराष्टÑ हे गांभीर्याने घ्यायला तयार नाही. लोक स्वत:ला समजतात तरी काय कोणास ठाऊक? कोरोनावरून सोशल मीडियात वाट्टेल ते विनोद, आचरट विचकट किस्से, अफवा, अश्लील चित्रफिती पसरवण्यात काही महाभागांना आनंद वाटतोय.

जे कोणी अशा गोष्टी करत आहेत त्यांच्या घरात कोरोनाचा रुग्ण आढळला तर ते असेच वागतील का? याचे उत्तर त्यांनी स्वत:लाच द्यावे. कशाची मस्ती, झींग अशा लोकांना आली आहे? काही जण ‘आम्ही खासगी नोकºया करतो, आमचे पोट हातावर आहे’ अशी कारणे पुढे करत आहेत. मात्र आपल्याकडे दंगल झाली असती, कर्फ्यू लावण्याची वेळ आली असती तर, तेव्हा आम्ही असेच वागलो असतो का? दुर्दैवाने आपण तिसºया-चौथ्या टप्प्यात गेलो तर आपल्याकडे लाखो रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स नाहीत, डॉक्टर नाहीत. रुग्णालयांमधून खाटाही मिळणार नाहीत. उपचारांअभावी अनेकांचे तडफडून जीव जातील. जागतिक आरोग्यतज्ज्ञ रामानन लक्ष्मीनारायण यांच्या मते भारतात जर हा आजार पसरला तर ६० टक्के भारतीयांना याची लागण होऊ शकते. याचा अर्थ १३० कोटी लोकसंख्येपैकी ७० ते ७५ कोटी जनतेला कोरोनाची लागण होईल. हे वाचताना अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, पण आज राज्यातील लोक हे विधान खरे ठरवण्याच्या मागेच लागल्यासारखे वागताना दिसत आहेत.

पैसे कधीही कमावता येतील, मात्र जीव गेला तर तो कधीच परत येणार नाही. इटली, फ्रान्समधल्या महाराष्टÑातील तरुणांनी संदेश पाठवणे सुरू केले आहे. काय घडू शकते हे आम्ही अनुभवले आहे, घरात बसा, असे ते तरुण कळवळून सांगत आहेत. आम्ही मात्र हाती तिरंगा घेऊन जल्लोष करत फिरण्यात धन्यता मानत आहोत. ही देशभक्ती नाही. हा देशाशी केलेला द्रोह आहे. असे लोक केवळ स्वत:चाच नाही तर आपल्या आप्तस्वकीयांचा जीवही धोक्यात घालत आहेत. घरात बसून विराट कोहलीला क्रिकेटचे धडे देण्यात ज्यांची हयात जाते त्यांना देशभक्ती काय कळणार? वेळ गेलेली नाही. अजूनही भानावर या. घरात बसून देशभक्ती दाखवा. जनाची नाही तरी मनाची तरी बाळगा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या