शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

coronavirus: कोरोनाचा जीवनमान कमी होण्यावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 04:35 IST

सध्याची कोरोनाची बाधा होण्यापूर्वी भिन्न भिन्न सरकारांचे जे महसुली उत्पन्न होते त्यात सुद्धा ३० ते ५० टक्के इतकी घट झाली आहे. असे असले तरी सर्व सरकारांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आणि उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे लागणार आहे. आता प्रश्न असा आहे की हा पैसा कुठून उभा करणार आणि कोणत्या कामासाठी खर्च करणार?

- डॉ. भारत झुनझुनवाला(आर्थिक विषयाचे तज्ज्ञ)कोरोना महामारीमुळे आपण आपले जीवनमान कमी करण्याचा प्रयत्न करू की कसेही करून कृत्रिम उपायांनी का होईना, आपले उच्च दर्जाचे जीवनमान कायम ठेवण्याचा प्रयत्न करून आणखी मोठ्या संकटाला तोंड देण्याची तयारी करू? या महामारीमुळे सर्व सरकारांचा महसूल कमी होणार असला तरी त्यांना वाढत्या खर्चांना तोंड द्यावे लागणार आहे. सध्याची कोरोनाची बाधा होण्यापूर्वी भिन्न भिन्न सरकारांचे जे महसुली उत्पन्न होते त्यात सुद्धा ३० ते ५० टक्के इतकी घट झाली आहे. असे असले तरी सर्व सरकारांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आणि उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे लागणार आहे. आता प्रश्न असा आहे की हा पैसा कुठून उभा करणार आणि कोणत्या कामासाठी खर्च करणार?महसूलवाढीसाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. पहिला मार्ग बाजारातून कर्ज घेण्याचा आहे; पण कर्ज काढल्यास त्यावरचे व्याज बरीच वर्षे द्यावे लागेल. ते देण्यासाठी एकतर सरकारला नोटांची छपाई करावी लागेल किंवा करभार वाढवून त्याचा भार लोकांवर टाकावा लागेल. त्याचे लाभ मात्र मूठभर उद्योगांनाच मिळतील. आपण हवाई वाहतुकीचे उदाहरण घेऊ. या विभागासाठी सरकारने कर्ज काढून त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्या कर्जावरील व्याजाचा भार सर्व जनतेला सोसावा लागेल; पण त्याचा फायदा मात्र हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच होईल. अशा तºहेने सामान्य करदात्यांवर भार टाकून त्याचा लाभ मात्र श्रीमंतांना होईल पण सरकारने आयातीत तेलावरील करभार वाढवून त्यापासून होणाºया उत्पन्नाचा लाभ देशातील सर्व कुटुंबांना मिळू दिला तर त्याचा परिणाम वेगळाच दिसून येईल. आयातीत तेलाचा वापर प्रामुख्याने श्रीमंत लोक करीत असल्याने त्या कराचा भार श्रीमंतांवर पडेल पण त्याचे फायदे मात्र सामान्य जनतेला मिळतील!तेव्हा मी दुसºया मार्गाचाच पुरस्कार करीत आहे. महामारीमुळे आपल्या अर्थकारणाचा संकोच होणार आहे, हे त्याचे कारण आहे. सध्या सरकारसमोर खरे आव्हान महामारीपूर्व स्थितीवर देशाचे अर्थकारण आणण्याचे आहे. याचा अर्थ असा की, कोरोनापूर्व काळात जो महसूल गोळा होत होता त्या पातळीवर कोरोनोत्तर काळातील महसूल आणायचा. सरकार जे कर्ज काढणार आहे त्यावरील व्याजाचा भार सरकारवर पडणार आहे. उलट महसुलाची स्थिती गोठलेली असेल. तेव्हा व्याजाच्या भारामुळे कोरोनापूर्व पातळीपर्यंत अर्थकारण पोहचणे कठीण आहे. न्यूयॉर्क येथील प्रोफेसर रौबिनी यांच्या मते, सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सरकारने कर्ज काढले तर त्यावरील व्याज देण्यासाठी सरकारला अधिक नोटा छापाव्या लागतील पण तसे करूनसुद्धा आर्थिक स्थितीत फारसा बदल घडणार नाही. त्यामुळे अर्थकारणात गतिरोध निर्माण होईल तसेच कर्जावर व्याज द्यावे लागणार असल्याने चलनवाढीचे संकट ओढवेल. एकूणच महामारीला तोंड देण्यासाठी कर्ज काढल्यास आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी स्थिती ओढवेल. असे असले तरी सरकारला आपल्या खर्चात वाढ ही करावीच लागणार आहे. एकूण कोरोनाचा भार भविष्यावर टाकण्याऐवजी सरकारने लोकांचे जीवनमान कमी होणार आहे हे मान्य करून त्या गोष्टीचा स्वीकार करायला हवा. प्रत्येक कुटुंबाला आपले राहणीमान कमी करायचे आहे. त्यासाठी फळांवरचा खर्च कमी करून त्याऐवजी भाजलेले शेंगदाणे खाणे वाढवले पाहिजे. कपड्यांवरील खर्च कमी करून मोजके कपडेच परिधान केले पाहिजे त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीचे आरोग्य सुधारेल आणि कुटुंबाचा खर्चही कमी होईल, पण तसे न करता आपल्या राहणीमानाचा दर्जा पूर्ववत ठेवण्यासाठी कुटुंबाने जर कर्ज काढले तर कुटुंबाला कर्ज आणि त्यावरील व्याज यांची परतफेड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल आणि त्याचा परिणाम जीवनमानाचा दर्जा कमी करण्यावर होईल!तेव्हा कोरोनामुळे प्रत्येकाचे राहणीमान कमी होणार आहे, ही गोष्ट साºया समाजाने स्वीकारायला हवी. सरकारनेदेखील आयातीत खनिज तेल आणि आयातीत अन्य वस्तूंवरील करात वाढ करून त्यापासून मिळणारे उत्पन्न लोकांच्या कल्याणकारी कार्यक्रमांवर खर्च करायला हवे. हा खर्च केल्यामुळे बाजारातील मागणीत वाढ होऊन देशाच्या अर्थकारणाला चालना मिळेल. त्यामुळे भविष्यात द्याव्या लागणारा कर्जावरील व्याजाचा भार फारसा जाणवणार नाही. तसेच आपण कोरोनाच्या संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकू, असे मला वाटते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था