शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

Coronavirus : कोरोनाचे संकट जागतिक असले तरी भारताला अत्यंत गंभीर धोका, निर्धाराने बचाव करण्याचा पर्यायच हाती

By विजय दर्डा | Updated: March 23, 2020 04:44 IST

Coronavirus : तुलनेसाठी आपण चीनचे उदाहरण घेऊ. कारण लोकसंख्येच्या बाबतीत आपण व चीन जवळजवळ सारखेच आहोत.

- विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

कोरोना प्रसाराची सुरुवात जेथून झाली त्या चीनने या साथीवर तीन महिन्यांनी जवळजवळ नियंत्रण मिळविले आहे. पण जगाच्या अन्य देशांत या महामारीने कहर केला आहे. इटली, इराण आणि स्पेन या देशांची अवस्था खूपच बिकट आहे. युरोपमधील अन्य शहरे व अमेरिकेतील परिस्थितीही चांगली नाही. जेथे लोक भारताएवढे मिळून-मिसळून राहात नाहीत अशा देशांतील ही स्थिती आहे. तेथील वैद्यकीय सुविधा आधुनिक व अधिक सुसज्ज आहेत. तरीही ते कोरोनाचा अटकाव करू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत भारताची स्थिती काय आहे, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.तुलनेसाठी आपण चीनचे उदाहरण घेऊ. कारण लोकसंख्येच्या बाबतीत आपण व चीन जवळजवळ सारखेच आहोत. चीनचे क्षेत्रफळ मात्र भारताच्या जवळपास तिप्पट आहे. लोकसंख्येच्या घनतेच्या दृष्टीने विचार केला तर आपली अवस्था अधिक गंभीर दिसते. ताज्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १३८कोटींहून थोडी जास्त, तर चीनची १४३ कोटी आहे. घनतेचा विचार केला तर चीनमध्ये लोकसंख्येची घनता प्रति चौ. किमी १४७ तर भारतात ती ४०० हून जास्त आहे! कोरोनाचा सुगावा लागताच चीनने संपूर्ण वुहान शहरात ‘लॉकडाउन’ लागू केले. संपूर्ण वुहान शहर निर्जंतुक केले गेले. असे कठोर उपाय योजणे आपल्याला शक्य आहे? तेवढ्या सुविधा आपल्याकडे आहेत?आपले डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पॅरामेडिकल कर्मचारी व अधिकारी केवळ सक्षमच नव्हेत तर पूर्णपणे समर्पित आहेत, याविषयी जराही शंका नाही. सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत ते जे अहोरात्र काम करत आहेत त्याची प्रशंसा करावी तेवढी थोडी होईल. स्वत:ची गंभीर आजारी असलेली आई इस्पितळात असूनही कोरोनाविरुद्धच्या लढाईत रात्रंदिवस आघाडी सांभाळणारे राजेश टोपे यांच्यासारखे सार्वजनिक आरोग्यमंत्री महाराष्ट्रात आहेत. जागरूकतेने व तातडीने निर्णय घेण्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही अभिनंदन करीन. कोरोनाची पहिली बातमी आल्यापासून कामाला जुंपून घेऊन परिस्थिती आटोक्यात ठेवणारे पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम व यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनाही माझा सलाम! अशा संकटसमयी जनतेपर्यंत बातम्या त्वरेने पोहोचाव्यात यासाठी निर्भयपणे काम करणारे इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांमधील पत्रकार, वृत्तपत्रे घरोघरी पोहोचविणारे व मीडियात काम करणाऱ्या इतर सर्वांनाही माझा दंडवत.एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेली बातमी वाचून मी थक्क झालो. भारतात दिवसाला आठ हजार चाचण्या घेण्याची क्षमता आहे. पण प्रत्यक्षात खूपच कमी चाचण्या केल्या जातात. १८ मार्चपर्यंत देशभरात फक्त ११ हजार ५०० चाचण्या केल्या गेल्या होत्या आणि २२ मार्चपर्यंत त्या अवघ्या १७ हजारांवर पोहोचल्या़ पण त्या पुरेशा आहेत, असे तर नक्कीच म्हणता येणार नाही. दक्षिणकोरिया, तैवान व जपान हे आपल्या तुलनेत खूपच लहान देश आहेत. पण या देशांनी कोरोनासाठी लाखो लोकांच्या चाचण्या केल्या आहेत.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम व संकल्पाचे जे आवाहन केले आहे ते खूप महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रमाणावर चाचण्यांची सोय करणे ही जशी सरकारची जबाबदारी आहे, तसेच विनाकारण घराबाहेर न पडणे हेही लोकांचे कर्तव्य आहे. आपण देवभूमीचे रहिवासी आहोत, श्रद्धाळू आहोत व आपल्याकडे बºयाच गोष्टी रामभरोसे होत असतात. पण लोक गांभीर्य ओळखतील व पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे सांगतील त्याचे पूर्णपणे पालन करतील, अशी आशा धरायला हवी. ‘जनता कर्फ्यू’च्या यशाने याचे चांगले संकेतही मिळाले आहेत.थोडा वेळ लागेल, पण कोरोनाविरुद्धचे हे युद्ध आपण नक्की जिंकू. पण त्यानंतर कोरोनानंतरचे जे परिणाम मागे राहतील त्याविरुद्धची दुसरी लढाई सुरू होईल. ती लढाई आर्थिक संकटाशी असेल. भारत आधीपासूनच आर्थिक अडचणीत असल्याने आपल्या दृष्टीने या संकटाचे गांभीर्य इतरांहून जास्त आहे. कोरोनावर आपण विजय मिळवू, पण त्यानंतरच्या मंदीवर मात करणे हे खूप मोठे आव्हान असेल, हे विचारवंत उद्योगपती आनंद महिंद्र यांचे म्हणणे योग्यच आहे.आणखी दोन गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे ज्या शहरांमध्ये ‘लॉकडाउन’ सुरू झाले आहे, तेथे हातावर पोट असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. कोरोना संकटाने डबघाईला आलेल्या उद्योगधंद्यांनाही सरकारला मदतीचा हात द्यावा लागेल. दुसरे असे की, अशा प्रकारच्या संकटांशी मुकाबला करण्याचा ‘डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन’ आपल्याला तयार करावा लागेल. अशा सुनिश्चित योजनेमुळेच गेल्या वर्षी फानी चक्रीवादळाने ओदिशात फारसे नुकसान झाले नाही. आज त्या यशस्वी योजनेचा जगात अभ्यास केला जात आहे. तशीच तयारी आपल्याला जैविक संकटासाठीही करावी लागेल.काही झाले तरी कोरोनाने घाबरून जाऊ नका. स्वत:ची काळजी घ्या, आपल्या परिसरात स्वच्छता ठेवा. त्यानेच आपण हे युद्ध जिंकू शकणार आहोत, याची खात्री बाळगा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या