शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

कोरोना साथ : दक्षता हवी, भय नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 01:11 IST

गेल्या महिन्यात चीनला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांचीही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे.

- डॉ. अमोल अन्नदाते(वैद्यकतज्ज्ञ)चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या साथीचे थैमान सुरू असल्याने आता ही साथ जगात पसरणार का? या साथीला जागतिक साथ म्हणजे पँडेमीकचे स्वरूप येणार का? भारताला याचा धोका किती? भारताची आरोग्य यंत्रणा कोरोनाचे संकट रोखण्यासाठी आणि ते आल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? असे अनेक प्रश्न कोरोनाच्या निमित्ताने पडत आहेत.सध्या जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित केलेली नाही, पण भारत हा मुळातच संसर्गजन्य रोगांची जागतिक राजधानी असल्याने व भारत-चीन या दोन देशांमध्ये दळणवळणाचे प्रमाण जास्त असल्याने, ही साथ भारतात दाखल होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी नागरी वाहतूक, विदेश आणि आरोग्य मंत्रालयाला समन्वयाने ही साथ रोखण्यासाठी कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तापमान आणि सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास असल्याची चौकशी करणे आवश्यक आहे. ताप व ही लक्षणे आढळल्यास त्यांना तातडीने आयसोलेशन म्हणजेच उपचारासाठी स्वतंत्र कक्षात बरे होईपर्यंत ठेवणे आवश्यक असते. हवाई वाहतूक सोडून चीन व नेपाळ सीमेवरील लष्करातही सैनिकांमध्ये ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने निदान आवश्यक आहे. गेल्या महिन्यात चीनला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांचीही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे.नवी साथ दाखल होते, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे असते, देशातील पहिल्या काही केसेस ओळखणे आणि त्यांना वेगळे ठेवून त्यांचे उपचार करणे, पण आपल्या देशात अजून तत्पर निदानाची यंत्रणा सज्ज नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरॉलॉजी, पुणे सोडून आपल्याकडे अशा नव्या व्हायरसेस व साथीचे निदान करणारी यंत्रणा अपुरी आहे. साथ अजून दाखल झालेली नाही, पण ती झालीच, तर या पहिल्या केसेसच्या निदानाची तयारी असायला हवी. झिका व्हायरस भारतात दाखल झाला, तेव्हा २००७ साली ही माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेने दडवून ठेवली. घबराट निर्माण होऊ नये, हा हेतू असला, तरी इतर यंत्रणेच्या सतर्कतेवर याचे दुष्परिणाम होतात.

यासाठीची तुलना २००३च्या सार्सशी केली जाते आहे, पण हा त्या इतका घातक नक्कीच नाही. सर्वसामान्यांनी लगेचच कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, पण चीनला प्रवास झाला असल्यास व श्वसनाची कुठलीही तक्रार असल्यास तपासणी करून घ्यायला हवी, तसेच चीनला प्रवासही टाळायला हवा. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. न्युमोनिया व किडनी फेल्युअर हे कॉम्लिकेशन्स होऊ शकतात, पण साधा सर्दी खोकला झाला, तरी कोरोना असेल म्हणून घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. हा आजार टाळण्यासाठी मानवाकडून मानवाला होणाºया श्वसन मार्गाच्या आजाराला जी काळजी घ्यावी लागते, तीच घ्यायची आहे.

यात प्रामुख्याने बाहेरून आल्यावर आणि जेवण्याआधी कुठला साबण व पाण्याने हात धुणे, शिंक आल्यावर किंवा खोकताना तोंड, नाक, झाकणे, सर्दी, खोकला असलेल्यांनी इतरांपासून लांब राहणे आणि प्राण्यांशी संपर्क टाळणे हेच आहे, पण यात प्राण्यांशी संपर्क सोडून इतर गोष्टी कुठलीही साथ नसली, तरी करायच्याच आहेत. ही साथ चीनमधून इतर देशात पसरत असताना शक्यतो मांसाहारी, त्यातच न शिजविलेले मांसाहारी अन्न व समुद्रातील मांसाहारी अन्न म्हणजे मासे, प्रॉन्स खाणे टाळलेले बरे.

हा आजार व्हायरल असल्याने तो आपोआप बरा होणारा आहे. त्यावर इतर व्हायरल आजारांसारखे निश्चित असे काही उपचार नाहीत. कोरोनावर उपचारच नाहीत, अशी भीतिदायक वृत्तेही येत आहेत, पण याचा अर्थ हा आपोआप बरा होणारा आहे. सध्या चीनमध्ये मृत्यूचे प्रमाण तीन टक्के आहे, पण भारतात हे किती असेल, हे सध्या सांगता येणे कठीण आहे, पण अशा कुठल्याही व्हायरल आजारात काही काळानंतर मानवामध्ये हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची प्रतिकारशक्ती निर्माण होते व साथ हळूहळू ओसरू लागते. म्हणून उद्या ही साथ आलीच व कोरोनाची लागण झालीच, तर आपला मृत्यू निश्चित आहे, अशा भीतीत मुळीच राहू नये. आपली प्रतिकारशक्ती हेच अशा साथीमध्ये सगळ्यात मोठे हत्यार असते व त्यासाठी संतुलित आहार, व्यायाम व चांगली जीवनशैली हेच उत्तर आहे. कोरोनासाठी स्वाइन फ्लूप्रमाणे कुठलीही गोळी किंवा लस उपलब्ध नाही, तसेच फ्लूची लस घेऊन कोरोनापासून संरक्षण मिळू शकते, असा अपप्रचारही सुरू झाला, पण यात काही तथ्य नाही.अशा साथीत मास्कच्या वापराचा खूप अतिरेक होतो. मास्कचा वापर हा स्वत:च्या संरक्षणासाठी नव्हे, तर आपल्याकडून इतरांना जंतुसंसर्ग होऊ नये, म्हणून केला जातो. कोरोनाचा निश्चित किंवा संशयित रुग्णांसाठीच मास्कचा वापर योग्य आहे. स्वस्थ व्यक्तींनी मास्क वापरून काहीच उपयोग नाही, कारण जर जंतुसंसर्ग होणार असेल, तर तो मास्कच्या बाजूला खुल्या जागेतूनही होऊ शकतो. कोरोनासारख्या साथी म्हणजे घाबरलेल्या सर्वसामान्यांच्या फसवणुकीसाठी अनेकांना एक संधी असते. अमुक साबण वापरा, अमुक औषध घेऊन कोरोनाची शक्यता टाळा, समाज माध्यमांवरील घरगुती उपायांचे वायरल होणारे सल्ले यापासून सगळ्यांनी दूर राहायला हवे.

टॅग्स :corona virusकोरोना