शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोरोना साथ : दक्षता हवी, भय नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 01:11 IST

गेल्या महिन्यात चीनला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांचीही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे.

- डॉ. अमोल अन्नदाते(वैद्यकतज्ज्ञ)चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या साथीचे थैमान सुरू असल्याने आता ही साथ जगात पसरणार का? या साथीला जागतिक साथ म्हणजे पँडेमीकचे स्वरूप येणार का? भारताला याचा धोका किती? भारताची आरोग्य यंत्रणा कोरोनाचे संकट रोखण्यासाठी आणि ते आल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? असे अनेक प्रश्न कोरोनाच्या निमित्ताने पडत आहेत.सध्या जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित केलेली नाही, पण भारत हा मुळातच संसर्गजन्य रोगांची जागतिक राजधानी असल्याने व भारत-चीन या दोन देशांमध्ये दळणवळणाचे प्रमाण जास्त असल्याने, ही साथ भारतात दाखल होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी नागरी वाहतूक, विदेश आणि आरोग्य मंत्रालयाला समन्वयाने ही साथ रोखण्यासाठी कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तापमान आणि सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास असल्याची चौकशी करणे आवश्यक आहे. ताप व ही लक्षणे आढळल्यास त्यांना तातडीने आयसोलेशन म्हणजेच उपचारासाठी स्वतंत्र कक्षात बरे होईपर्यंत ठेवणे आवश्यक असते. हवाई वाहतूक सोडून चीन व नेपाळ सीमेवरील लष्करातही सैनिकांमध्ये ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने निदान आवश्यक आहे. गेल्या महिन्यात चीनला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांचीही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे.नवी साथ दाखल होते, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे असते, देशातील पहिल्या काही केसेस ओळखणे आणि त्यांना वेगळे ठेवून त्यांचे उपचार करणे, पण आपल्या देशात अजून तत्पर निदानाची यंत्रणा सज्ज नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरॉलॉजी, पुणे सोडून आपल्याकडे अशा नव्या व्हायरसेस व साथीचे निदान करणारी यंत्रणा अपुरी आहे. साथ अजून दाखल झालेली नाही, पण ती झालीच, तर या पहिल्या केसेसच्या निदानाची तयारी असायला हवी. झिका व्हायरस भारतात दाखल झाला, तेव्हा २००७ साली ही माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेने दडवून ठेवली. घबराट निर्माण होऊ नये, हा हेतू असला, तरी इतर यंत्रणेच्या सतर्कतेवर याचे दुष्परिणाम होतात.

यासाठीची तुलना २००३च्या सार्सशी केली जाते आहे, पण हा त्या इतका घातक नक्कीच नाही. सर्वसामान्यांनी लगेचच कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, पण चीनला प्रवास झाला असल्यास व श्वसनाची कुठलीही तक्रार असल्यास तपासणी करून घ्यायला हवी, तसेच चीनला प्रवासही टाळायला हवा. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. न्युमोनिया व किडनी फेल्युअर हे कॉम्लिकेशन्स होऊ शकतात, पण साधा सर्दी खोकला झाला, तरी कोरोना असेल म्हणून घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. हा आजार टाळण्यासाठी मानवाकडून मानवाला होणाºया श्वसन मार्गाच्या आजाराला जी काळजी घ्यावी लागते, तीच घ्यायची आहे.

यात प्रामुख्याने बाहेरून आल्यावर आणि जेवण्याआधी कुठला साबण व पाण्याने हात धुणे, शिंक आल्यावर किंवा खोकताना तोंड, नाक, झाकणे, सर्दी, खोकला असलेल्यांनी इतरांपासून लांब राहणे आणि प्राण्यांशी संपर्क टाळणे हेच आहे, पण यात प्राण्यांशी संपर्क सोडून इतर गोष्टी कुठलीही साथ नसली, तरी करायच्याच आहेत. ही साथ चीनमधून इतर देशात पसरत असताना शक्यतो मांसाहारी, त्यातच न शिजविलेले मांसाहारी अन्न व समुद्रातील मांसाहारी अन्न म्हणजे मासे, प्रॉन्स खाणे टाळलेले बरे.

हा आजार व्हायरल असल्याने तो आपोआप बरा होणारा आहे. त्यावर इतर व्हायरल आजारांसारखे निश्चित असे काही उपचार नाहीत. कोरोनावर उपचारच नाहीत, अशी भीतिदायक वृत्तेही येत आहेत, पण याचा अर्थ हा आपोआप बरा होणारा आहे. सध्या चीनमध्ये मृत्यूचे प्रमाण तीन टक्के आहे, पण भारतात हे किती असेल, हे सध्या सांगता येणे कठीण आहे, पण अशा कुठल्याही व्हायरल आजारात काही काळानंतर मानवामध्ये हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची प्रतिकारशक्ती निर्माण होते व साथ हळूहळू ओसरू लागते. म्हणून उद्या ही साथ आलीच व कोरोनाची लागण झालीच, तर आपला मृत्यू निश्चित आहे, अशा भीतीत मुळीच राहू नये. आपली प्रतिकारशक्ती हेच अशा साथीमध्ये सगळ्यात मोठे हत्यार असते व त्यासाठी संतुलित आहार, व्यायाम व चांगली जीवनशैली हेच उत्तर आहे. कोरोनासाठी स्वाइन फ्लूप्रमाणे कुठलीही गोळी किंवा लस उपलब्ध नाही, तसेच फ्लूची लस घेऊन कोरोनापासून संरक्षण मिळू शकते, असा अपप्रचारही सुरू झाला, पण यात काही तथ्य नाही.अशा साथीत मास्कच्या वापराचा खूप अतिरेक होतो. मास्कचा वापर हा स्वत:च्या संरक्षणासाठी नव्हे, तर आपल्याकडून इतरांना जंतुसंसर्ग होऊ नये, म्हणून केला जातो. कोरोनाचा निश्चित किंवा संशयित रुग्णांसाठीच मास्कचा वापर योग्य आहे. स्वस्थ व्यक्तींनी मास्क वापरून काहीच उपयोग नाही, कारण जर जंतुसंसर्ग होणार असेल, तर तो मास्कच्या बाजूला खुल्या जागेतूनही होऊ शकतो. कोरोनासारख्या साथी म्हणजे घाबरलेल्या सर्वसामान्यांच्या फसवणुकीसाठी अनेकांना एक संधी असते. अमुक साबण वापरा, अमुक औषध घेऊन कोरोनाची शक्यता टाळा, समाज माध्यमांवरील घरगुती उपायांचे वायरल होणारे सल्ले यापासून सगळ्यांनी दूर राहायला हवे.

टॅग्स :corona virusकोरोना