शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

कोरोना : गांभीर्य हरवू देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:33 IST

मिलिंद कुलकर्णी एखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी ...

मिलिंद कुलकर्णीएखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी मुकाबला करता येईल, असे तत्त्व सांगितले जाते. त्यात तथ्यांश आहे. परंतु, हे करीत असताना संकटाविषयीचे गांभीर्य कायम राहील, उपाययोजनांकडे दुर्लक्ष होणार नाही, सतर्क आणि सजग राहणे आवश्यक आहे, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनासंदर्भात सार्वजनिक आणि वैयक्तीक जीवनातील आमचे वर्तन आणि समाजमाध्यमातून व्यक्त होणारी अभिव्यक्ती पाहिली तर कुठे तरी गांभीर्य हरवत आहे, असे निश्चित वाटते.चिनपाठोपाठ इटलीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. अनेकांना प्राण गमवावे लागले. भारत हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठा देश असल्याने या संसर्गजन्य आजाराचा सर्वात मोठा धोका आपल्याला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक देशांशी विमानसेवेद्वारे थेट दळणवळण आहे. त्यामुळे महाराष्टÑात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळले आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तींचे प्रमाण त्यात जास्त आहे. हा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने आणि प्रभावीपणे पावले उचलली आहेत.नागरिक म्हणून आता आमची जबाबदारी आहे की, हा आजार आणखी पसरु नये, वाढू नये. त्यादृष्टीने गर्दी होईल, अशा ठिकाणी जाणे टाळायला हवे. रेल्वे आणि एस.टी.च्या फेऱ्या कमी करुन शासनाने नागरिकांना आवश्यक असेल तरच प्रवास करावा म्हणून बाध्य केले आहे. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल, शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा उद्देश सामूहिकरीत्या संसर्ग होऊ नये, हाच आहे. आठवडेबाजार बंद ठेवायचा असतानाही जळगाव शहरातील पिंप्राळ्याचा आठवडे बाजार बुधवारी भरला. गर्दी कमी होती, पण बाजार भरलाच. नियम, निर्बंध आम्ही पाळायचे नाही, आणि साथ पसरली तर शासनाच्या नावाने खडे फोडायला आम्ही तयार असतो.कोरोनाला प्रतिबंध करणारी लस, औषधांवर संशोधन सुरु आहे. रामबाण उपाय अद्याप सापडलेला नाही. हे सगळेच देश सांगत असताना आम्ही मात्र काही देशी उपायांचा प्रचार आणि प्रसार करुन काय साध्य करु इच्छितो हे कळायला मार्ग नाही. समाजमाध्यमांचा यासाठी दुरुपयोग केला जात आहे. वेगवेगळे व्हीडिओ आणि संदेश तयार करुन दिशाभूल केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही ठळक बाबी स्पष्ट केल्या असताना असे घडत आहे.मास्क आणि सॅनिटायझरची अचानक टंचाई होणे हे स्वाभाविक आहे. अचानक आलेल्या आपत्तीमुळे असे घडू शकते. परंतु, त्याची उपलब्धता होण्यासाठी काही प्रयत्न होणे, पर्याय उपलब्ध होणे यासाठी हालचाली दिसून येत नाही. टंचाई निर्माण झाली की, स्वार्थी मंडळी त्याचा काळाबाजार करतात. यापेक्षा रासायनिक कारखाने, प्रयोगशाळा यांनी पर्यायी जंतुरोधक द्रव्य उपलब्ध करण्यास काही हरकत नाही. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे या बाबी क्लिष्ट असल्याने कोणी पुढाकार घेताना दिसत नाही.भारतीय संस्कृती आणि पुराणात सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, असा दावा प्रत्येकवेळी करण्याचे वेड अलिकडे वाढले आहे. विज्ञानाचा आधार, प्रयोगातून सिध्द झाल्याचा पुरावा असे काहीही न देता भारतीय पुराणात म्हटले आहे, म्हणजे ते खरेच असे हटवादीपणे म्हटले जाते. कोरोनाचे भाकीत ७०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी केल्याचे संदेश असेच प्रसारीत होत आहेत. कधी ते संत तुकारामांचे म्हटले जाते तर कधी रामदास स्वामींचे म्हटले जाते. अशा प्रकारांमधून घटनेचे गांभीर्य कमी होते, हे जितक्या लवकर आम्हाला कळेल, तो सुदिन म्हणावा लागेल. 

टॅग्स :Jalgaonजळगाव