शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

कोरोना : गांभीर्य हरवू देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:33 IST

मिलिंद कुलकर्णी एखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी ...

मिलिंद कुलकर्णीएखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी मुकाबला करता येईल, असे तत्त्व सांगितले जाते. त्यात तथ्यांश आहे. परंतु, हे करीत असताना संकटाविषयीचे गांभीर्य कायम राहील, उपाययोजनांकडे दुर्लक्ष होणार नाही, सतर्क आणि सजग राहणे आवश्यक आहे, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनासंदर्भात सार्वजनिक आणि वैयक्तीक जीवनातील आमचे वर्तन आणि समाजमाध्यमातून व्यक्त होणारी अभिव्यक्ती पाहिली तर कुठे तरी गांभीर्य हरवत आहे, असे निश्चित वाटते.चिनपाठोपाठ इटलीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. अनेकांना प्राण गमवावे लागले. भारत हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठा देश असल्याने या संसर्गजन्य आजाराचा सर्वात मोठा धोका आपल्याला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक देशांशी विमानसेवेद्वारे थेट दळणवळण आहे. त्यामुळे महाराष्टÑात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळले आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तींचे प्रमाण त्यात जास्त आहे. हा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने आणि प्रभावीपणे पावले उचलली आहेत.नागरिक म्हणून आता आमची जबाबदारी आहे की, हा आजार आणखी पसरु नये, वाढू नये. त्यादृष्टीने गर्दी होईल, अशा ठिकाणी जाणे टाळायला हवे. रेल्वे आणि एस.टी.च्या फेऱ्या कमी करुन शासनाने नागरिकांना आवश्यक असेल तरच प्रवास करावा म्हणून बाध्य केले आहे. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल, शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा उद्देश सामूहिकरीत्या संसर्ग होऊ नये, हाच आहे. आठवडेबाजार बंद ठेवायचा असतानाही जळगाव शहरातील पिंप्राळ्याचा आठवडे बाजार बुधवारी भरला. गर्दी कमी होती, पण बाजार भरलाच. नियम, निर्बंध आम्ही पाळायचे नाही, आणि साथ पसरली तर शासनाच्या नावाने खडे फोडायला आम्ही तयार असतो.कोरोनाला प्रतिबंध करणारी लस, औषधांवर संशोधन सुरु आहे. रामबाण उपाय अद्याप सापडलेला नाही. हे सगळेच देश सांगत असताना आम्ही मात्र काही देशी उपायांचा प्रचार आणि प्रसार करुन काय साध्य करु इच्छितो हे कळायला मार्ग नाही. समाजमाध्यमांचा यासाठी दुरुपयोग केला जात आहे. वेगवेगळे व्हीडिओ आणि संदेश तयार करुन दिशाभूल केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही ठळक बाबी स्पष्ट केल्या असताना असे घडत आहे.मास्क आणि सॅनिटायझरची अचानक टंचाई होणे हे स्वाभाविक आहे. अचानक आलेल्या आपत्तीमुळे असे घडू शकते. परंतु, त्याची उपलब्धता होण्यासाठी काही प्रयत्न होणे, पर्याय उपलब्ध होणे यासाठी हालचाली दिसून येत नाही. टंचाई निर्माण झाली की, स्वार्थी मंडळी त्याचा काळाबाजार करतात. यापेक्षा रासायनिक कारखाने, प्रयोगशाळा यांनी पर्यायी जंतुरोधक द्रव्य उपलब्ध करण्यास काही हरकत नाही. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे या बाबी क्लिष्ट असल्याने कोणी पुढाकार घेताना दिसत नाही.भारतीय संस्कृती आणि पुराणात सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, असा दावा प्रत्येकवेळी करण्याचे वेड अलिकडे वाढले आहे. विज्ञानाचा आधार, प्रयोगातून सिध्द झाल्याचा पुरावा असे काहीही न देता भारतीय पुराणात म्हटले आहे, म्हणजे ते खरेच असे हटवादीपणे म्हटले जाते. कोरोनाचे भाकीत ७०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी केल्याचे संदेश असेच प्रसारीत होत आहेत. कधी ते संत तुकारामांचे म्हटले जाते तर कधी रामदास स्वामींचे म्हटले जाते. अशा प्रकारांमधून घटनेचे गांभीर्य कमी होते, हे जितक्या लवकर आम्हाला कळेल, तो सुदिन म्हणावा लागेल. 

टॅग्स :Jalgaonजळगाव