शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

सहकारातील नोकरभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:23 IST

सहकारातील नोकरभरतीवर सध्या राज्य सरकारचे नियंत्रण नाही. मात्र, ही नोकरभरती पारदर्शीपणे होण्यासाठी सरकार व नाबार्ड या दोघांनीही ठोस निकष ठरविण्याची

- सुधीर लंकेसहकारातील नोकरभरतीवर सध्या राज्य सरकारचे नियंत्रण नाही. मात्र, ही नोकरभरती पारदर्शीपणे होण्यासाठी सरकार व नाबार्ड या दोघांनीही ठोस निकष ठरविण्याची गरज आहे. खासगी संस्थांमार्फत होणारी भरती उमेदवारांना विश्वासार्ह वाटत नाही. सहकार हा जनतेतूनच उभा राहिला. पण, सहकाराला सरकारचे सर्वच नियम आज लागू होत नाहीत. सहकार क्षेत्राला सरकारचे निर्बंध पाळावे लागतात. पण, काही बाबींमध्ये या क्षेत्राला स्वायत्तता आहे. उदाहरणार्थ सहकारी संस्था या थेट शासकीय आस्थापना नसल्याने त्यांना माहिती अधिकार कायदा लागू होत नाही. सहकारी संस्था आपली नोकर भरती आपल्या स्तरावर करतात, हाही त्यांच्या स्वायत्ततेचा एक भाग आहे. पण, या नोकरभरतीबाबत सहकारातील सर्वच प्रमुख बँकांनी एकत्रित येऊन काही धोरण ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी नुकतीच सातारा जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार बँकेचे काही संचालक व आमदारांनीच केली. या तक्रारी थेट सहकार मंत्र्यांपर्यंत गेल्या. सध्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया सुरू आहे. लिपिक, वरिष्ठ अधिकारी अशा ४६५ जागांसाठी राज्यभरातून १७ हजारहून अधिक अर्ज आले आहेत. बेकारीचे प्रमाणच प्रचंड असल्याने अर्जांचा हा पाऊस पडणे अपेक्षितच होते. या भरतीची परीक्षा अजून व्हावयाची आहे. मात्र, तत्पूर्वीच शंकांचे काहूर उठले आहे. जिल्हा बँकांना खासगी संस्थांची मदत घेऊन आपली भरती प्रक्रिया राबविता येते असे नाबार्डचे धोरण आहे. नाबार्डने पाच संस्थांची यादीही जिल्हा बँकांना पुरवली आहे. त्या संस्थांच्या आधारे बँका आपली भरती प्रक्रिया राबवितात. मात्र, तरीदेखील सातारा येथील भरतीबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला. नगरला जी भरती होणार आहे, त्या भरतीत उमेदवारांना परीक्षा संपताच प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी मिळावी, अशी मागणी झाली आहे. बँकेच्या धोरणानुसार मात्र उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिली जाणार नाही. राज्य लोकसेवा आयोग व सर्वच परीक्षांमध्ये आता उमेदवारांना परीक्षा संपताच उत्तरपत्रिकेची प्रत देण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळे आपणाला किती गुण मिळू शकतील, याची पडताळणी उमेदवाराला करता येते. त्यातून बराचसा संशय दूर होतो. लेखी परीक्षेनंतर ज्या मुलाखती होतात, त्यातही गडबडी होतात. त्यामुळे वर्ग तीनच्या पदांसाठी तर लेखी परीक्षा घेण्याची पद्धतच आता काही शासकीय विभागांनी बंद केली आहे. जेणेकरून संशयाला जागा नको. नाबार्डनेही सहकार क्षेत्रातील सर्व बँकांच्या भरतीबाबत असे ठोस निकष ठरविण्याची आवश्यकता आहे. सहकार क्षेत्र हे थेट राजकारण्यांच्या नियंत्रणात आहे. बँकेचा कार्यकारी संचालक कोण हवा, इथपासून सर्व बाबी या बँकांचे संचालक मंडळ ठरविते. संचालक मंडळच मुलाखती घेते. सहकार क्षेत्रातील उपनिबंधक या बैठकांना असतात, पण त्यांनाही मर्यादा पडतात.सहकारी बँकांतील भरती प्रक्रियेत थेट संचालकांना ‘कोटा’ ठरवून देऊन भरती प्रक्रिया राबविली जाते, असा जनतेचा समज आहे. काही बँकांत यापूर्वी असे प्रकार घडलेही आहेत. संचालकांनी उमेदवारांकडून पैसे घेऊन भरती केली. शासकीय भरती प्रक्रियेबाबत व राष्ट्रीयकृत बँकांतील भरती प्रक्रियेबाबत जो एक विश्वास निर्माण झाला आहे, तसाच विश्वास सहकार क्षेत्रातील भरतीबाबतही निर्माण होण्याची गरज आहे. त्यासाठी या बँकांनीच एकत्रित येऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. राज्यपातळीवर भरतीसाठीचेच एखादे बोर्ड करुन त्याआधारेही सहकारातील सर्व बँकांची भरती प्रक्रिया राबविता येणे शक्य आहे. राज्य सरकारने यावर्षी अनुदानित शाळांची भरती प्रक्रिया खासगी संस्थाचालकांकडून काढून आपणाकडे घेतली. संस्थाचालक आपल्या मर्जीतील उमेदवारच निवडतात, त्यात गुणवंतांना डावलले जाते, असा मुख्य आक्षेप संस्थाचालकांबाबत आहे. असाच आक्षेप सहकार क्षेत्राबाबत आहे. सरकार व सहकार क्षेत्र या दोघांनाही याबाबत विचार करावा लागेल.