शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

साहित्य संमेलनांच्या ठरावांचा विनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:46 IST

साहित्य संमेलनांच्या ठरावामध्ये अस्सल विनोदांचे बीज असते. यामुळे प्रेरणा घेऊन खरे तर मराठी साहित्यात विनोदाच्या लडी फुटल्या पाहिजेत;

साहित्य संमेलनांच्या ठरावामध्ये अस्सल विनोदांचे बीज असते. यामुळे प्रेरणा घेऊन खरे तर मराठी साहित्यात विनोदाच्या लडी फुटल्या पाहिजेत; पण आज काल सारस्वतांना कसे विनोदाचे जरा वावडेच दिसते. विनोदापेक्षा कवितेचा घाणा काढणे सोपे असल्याने कवीचे अमाप पीक आल्याची कबुलीच देऊन टाकली आहे. तर विषयाला नको म्हणून ठराव आणि विनोद हे कसे काय बुवा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अंबाजोगाई येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचा ठराव झाला. मुकुंदराजाच्या पावन भूमीत असे विद्यापीठ होणे संयुक्तिकच आहे. मराठी ही वैश्विक भाषा व्हावी यासही कुणाची हरकत असण्याचे कारण नाही; पण मराठी राज्यातच मराठीची अवस्था बटकीसारखी झाली. गावापासून ते पार तावडेंच्या दालनापर्यंत इंग्रजीचा तोरा वाढला तो इतका की पोरगही बापाला बाबा न म्हणता पप्पा म्हणते. आईसुद्धा सुन्याचे पप्पा असे संबोधते, तर मराठीची अशी ही गळचेपी आपणच केली. मराठी कवीसारखे गावोगाव इंग्रजी शाळांचे काँग्रेस गवत उगवले आणि मराठी शाळा आचके देऊ लागल्या. त्यातच सरकारने दुर्गम भागातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तेथे तर मराठीचा श्वासच घोटण्यात आला. आता खासगी कंपन्यांना आपल्या लोककल्याण फंडातून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने मराठीची आणखीनच परवड होणार आहे, कारण हे उद्योग मराठी शाळा सुरू करून आतबट्ट्याचा व्यवहार करणार नाहीत. शालेय स्तरावर ही मराठीची अवस्था तर महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषयाच्या वाटेला जाणारे विद्यार्थी अभावानाचे दिसतात. कसे बसे विद्यार्थी गोळा करून तासिकांचा मेळ घालण्याचा उपद्व्याप प्राध्यापकांनाच करावा लागतो नसता ‘वर्कलोड’च्या मुद्यावर नोकरीचा धोका असतो. विद्यापीठाच्या स्तरावर तर याहीपेक्षा काळजी करण्याची स्थिती आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्या रोडावली. या अधोगतीचे कारण व्यवहारात मराठी भाषेची किंमत शून्य आहे. नोकरीची शाश्वती नाही त्यामुळे इकडे कुणी वळणार नाही. बरे जी मराठी शिकून मुले बाहेर पडतात त्यांना तरी ती शुद्ध लिहिता-बोलता येते का, तर हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. मुळातच इंग्रजीच्या शुद्धतेविषयी आपण जेवढे जागरूक असतो तेवढेच बेफिकीर मराठीबाबत. ही मानसिकता घट्ट झाल्याने मराठीत ‘सबकुछ चलता हेै’ असे आपण मानतो. दक्षिणेतील भाषेचा लोकाश्रय कमी झालेला नाही. उत्तरेची हिंदी ही तर राष्ट्रभाषा तिला धोका नाही आणि इंग्रजीच्या आक्रमणाने हिंदीचा संकोच झाल्याची तक्रार नाही. मराठीचे नाणे खोटे कारण तिच्याच मुलांनी तिला वृद्धाश्रमात पाठवायचे ठरवले. तर अशा मराठीचे विद्यापीठ स्थापून करणार काय?