शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

साहित्य संमेलनांच्या ठरावांचा विनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:46 IST

साहित्य संमेलनांच्या ठरावामध्ये अस्सल विनोदांचे बीज असते. यामुळे प्रेरणा घेऊन खरे तर मराठी साहित्यात विनोदाच्या लडी फुटल्या पाहिजेत;

साहित्य संमेलनांच्या ठरावामध्ये अस्सल विनोदांचे बीज असते. यामुळे प्रेरणा घेऊन खरे तर मराठी साहित्यात विनोदाच्या लडी फुटल्या पाहिजेत; पण आज काल सारस्वतांना कसे विनोदाचे जरा वावडेच दिसते. विनोदापेक्षा कवितेचा घाणा काढणे सोपे असल्याने कवीचे अमाप पीक आल्याची कबुलीच देऊन टाकली आहे. तर विषयाला नको म्हणून ठराव आणि विनोद हे कसे काय बुवा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अंबाजोगाई येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचा ठराव झाला. मुकुंदराजाच्या पावन भूमीत असे विद्यापीठ होणे संयुक्तिकच आहे. मराठी ही वैश्विक भाषा व्हावी यासही कुणाची हरकत असण्याचे कारण नाही; पण मराठी राज्यातच मराठीची अवस्था बटकीसारखी झाली. गावापासून ते पार तावडेंच्या दालनापर्यंत इंग्रजीचा तोरा वाढला तो इतका की पोरगही बापाला बाबा न म्हणता पप्पा म्हणते. आईसुद्धा सुन्याचे पप्पा असे संबोधते, तर मराठीची अशी ही गळचेपी आपणच केली. मराठी कवीसारखे गावोगाव इंग्रजी शाळांचे काँग्रेस गवत उगवले आणि मराठी शाळा आचके देऊ लागल्या. त्यातच सरकारने दुर्गम भागातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तेथे तर मराठीचा श्वासच घोटण्यात आला. आता खासगी कंपन्यांना आपल्या लोककल्याण फंडातून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने मराठीची आणखीनच परवड होणार आहे, कारण हे उद्योग मराठी शाळा सुरू करून आतबट्ट्याचा व्यवहार करणार नाहीत. शालेय स्तरावर ही मराठीची अवस्था तर महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषयाच्या वाटेला जाणारे विद्यार्थी अभावानाचे दिसतात. कसे बसे विद्यार्थी गोळा करून तासिकांचा मेळ घालण्याचा उपद्व्याप प्राध्यापकांनाच करावा लागतो नसता ‘वर्कलोड’च्या मुद्यावर नोकरीचा धोका असतो. विद्यापीठाच्या स्तरावर तर याहीपेक्षा काळजी करण्याची स्थिती आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्या रोडावली. या अधोगतीचे कारण व्यवहारात मराठी भाषेची किंमत शून्य आहे. नोकरीची शाश्वती नाही त्यामुळे इकडे कुणी वळणार नाही. बरे जी मराठी शिकून मुले बाहेर पडतात त्यांना तरी ती शुद्ध लिहिता-बोलता येते का, तर हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. मुळातच इंग्रजीच्या शुद्धतेविषयी आपण जेवढे जागरूक असतो तेवढेच बेफिकीर मराठीबाबत. ही मानसिकता घट्ट झाल्याने मराठीत ‘सबकुछ चलता हेै’ असे आपण मानतो. दक्षिणेतील भाषेचा लोकाश्रय कमी झालेला नाही. उत्तरेची हिंदी ही तर राष्ट्रभाषा तिला धोका नाही आणि इंग्रजीच्या आक्रमणाने हिंदीचा संकोच झाल्याची तक्रार नाही. मराठीचे नाणे खोटे कारण तिच्याच मुलांनी तिला वृद्धाश्रमात पाठवायचे ठरवले. तर अशा मराठीचे विद्यापीठ स्थापून करणार काय?