शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

साहित्य संमेलनांच्या ठरावांचा विनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:46 IST

साहित्य संमेलनांच्या ठरावामध्ये अस्सल विनोदांचे बीज असते. यामुळे प्रेरणा घेऊन खरे तर मराठी साहित्यात विनोदाच्या लडी फुटल्या पाहिजेत;

साहित्य संमेलनांच्या ठरावामध्ये अस्सल विनोदांचे बीज असते. यामुळे प्रेरणा घेऊन खरे तर मराठी साहित्यात विनोदाच्या लडी फुटल्या पाहिजेत; पण आज काल सारस्वतांना कसे विनोदाचे जरा वावडेच दिसते. विनोदापेक्षा कवितेचा घाणा काढणे सोपे असल्याने कवीचे अमाप पीक आल्याची कबुलीच देऊन टाकली आहे. तर विषयाला नको म्हणून ठराव आणि विनोद हे कसे काय बुवा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अंबाजोगाई येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचा ठराव झाला. मुकुंदराजाच्या पावन भूमीत असे विद्यापीठ होणे संयुक्तिकच आहे. मराठी ही वैश्विक भाषा व्हावी यासही कुणाची हरकत असण्याचे कारण नाही; पण मराठी राज्यातच मराठीची अवस्था बटकीसारखी झाली. गावापासून ते पार तावडेंच्या दालनापर्यंत इंग्रजीचा तोरा वाढला तो इतका की पोरगही बापाला बाबा न म्हणता पप्पा म्हणते. आईसुद्धा सुन्याचे पप्पा असे संबोधते, तर मराठीची अशी ही गळचेपी आपणच केली. मराठी कवीसारखे गावोगाव इंग्रजी शाळांचे काँग्रेस गवत उगवले आणि मराठी शाळा आचके देऊ लागल्या. त्यातच सरकारने दुर्गम भागातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तेथे तर मराठीचा श्वासच घोटण्यात आला. आता खासगी कंपन्यांना आपल्या लोककल्याण फंडातून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने मराठीची आणखीनच परवड होणार आहे, कारण हे उद्योग मराठी शाळा सुरू करून आतबट्ट्याचा व्यवहार करणार नाहीत. शालेय स्तरावर ही मराठीची अवस्था तर महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषयाच्या वाटेला जाणारे विद्यार्थी अभावानाचे दिसतात. कसे बसे विद्यार्थी गोळा करून तासिकांचा मेळ घालण्याचा उपद्व्याप प्राध्यापकांनाच करावा लागतो नसता ‘वर्कलोड’च्या मुद्यावर नोकरीचा धोका असतो. विद्यापीठाच्या स्तरावर तर याहीपेक्षा काळजी करण्याची स्थिती आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्या रोडावली. या अधोगतीचे कारण व्यवहारात मराठी भाषेची किंमत शून्य आहे. नोकरीची शाश्वती नाही त्यामुळे इकडे कुणी वळणार नाही. बरे जी मराठी शिकून मुले बाहेर पडतात त्यांना तरी ती शुद्ध लिहिता-बोलता येते का, तर हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. मुळातच इंग्रजीच्या शुद्धतेविषयी आपण जेवढे जागरूक असतो तेवढेच बेफिकीर मराठीबाबत. ही मानसिकता घट्ट झाल्याने मराठीत ‘सबकुछ चलता हेै’ असे आपण मानतो. दक्षिणेतील भाषेचा लोकाश्रय कमी झालेला नाही. उत्तरेची हिंदी ही तर राष्ट्रभाषा तिला धोका नाही आणि इंग्रजीच्या आक्रमणाने हिंदीचा संकोच झाल्याची तक्रार नाही. मराठीचे नाणे खोटे कारण तिच्याच मुलांनी तिला वृद्धाश्रमात पाठवायचे ठरवले. तर अशा मराठीचे विद्यापीठ स्थापून करणार काय?