शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घर घेताना तिथल्या हवा-पाण्याच्या दर्जाचा विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 08:33 IST

एखाद्या शहरातल्या हवा-पाण्याच्या दर्जानुसार तिथल्या घरांच्या किमती ठरायला हव्यात, असा विचार ‘झिरोधा’चे सीईओ नितीन कामत यांनी मांडला आहे.

संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार

आपण जेव्हा कधी मोठ्या शहरात नवे घर विकत वा भाड्याने घेण्याचे ठरवतो, तेव्हा किती विचार करतो?  आपल्याला परवडेल अशा किमतीत घरे जिथे आहेत, त्या जागा शोधतो. त्यानंतर ते घर रेल्वे स्टेशन, बस स्टॉपपासून जवळ आहे का,  दुकाने, शाळा, कॉलेज, रुग्णालय, रेस्टॉरंट, मंडई, औषधाचे दुकान, दवाखाना आसपास आहे का, हे पाहतो. शिवाय  पार्किंगची सोय, रस्ते, लोकवस्ती कशी आहे, हेही विचारून घेतो. जवळपास कारखाने, घाणेरडी गटारे, कचरा आणि झोपडपट्टी असेल, तर  तिथे घर घेण्याचे टाळतो. त्यात काहीही गैर नाही. अनेक जण तर त्या वसाहतीत कोणती भाषा बोलणारे वा कोणत्या जाती-धर्माचे लोक राहतात, याचीही बारकाईने चौकशी करतात.  

हे सारे करण्यामागे जीवन सुसह्य, आनंददायी किंवा कमीत कमी त्रासदायक व्हावे, हा प्रयत्न वा इच्छा असते. आपली नोकरी, पगार, मुले या हिशेबाने प्रत्येकाला चांगले, सुखी जीवन हवे असते. मग त्यासाठी घरात एअर कंडिशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, शक्यतो स्मार्ट टीव्ही, कराओके, उत्तम साऊंड सिस्टीम, घराला द्यायच्या रंगांच्या शेड, चांगले मोबाइल व कार, वॉर्डरोब यासह काय काय हवे, याचीही यादी केली जाते. एकूणच ज्याला उत्तम दर्जाचे जीवन म्हटले जाते, त्याचा सर्वांनाच ध्यास असतो. मध्यवर्गीय लोक वा एकूणच सामान्य लोक आयुष्यात शक्यतो एकदाच घर विकत घेतात, त्यामुळे हे सारे केले जाते. इतका सारा विचार आपल्यापैकी बहुदा प्रत्येक जण करत असणार वा तो पूर्वी केला असणार.  बांधकाम व्यावसायिकही घरांच्या जाहिराती करताना काय-काय नागरी सुविधा तिथे आहेत आणि फ्लॅट लवकर बुक केल्यास किंमत किती कमी करणार हे नमूद करतात. 

पण आपण जिथे घर घेणार आहोत वा ते घेतले आहे, तेथील हवेची गुणवत्ता कशी आहे, तिथे स्वच्छ हवा मिळते की प्रदूषित, हा विचारही आपल्या मनात अजिबात म्हणजे अजिबातच येत नाही. दिल्लीतील हवा फार वाईट आहे, तिथे केवळ थंडीतच नव्हे, तर वर्षाचे बारा महिने प्रदूषण असते, हे आपल्याला माहीत असते. त्यामुळे बरे झाले, आपल्याला तिथे राहण्याची वेळ आली नाही, असे बोलून दाखवतो. पण मुंबई, बंगळुरू या शहरांची स्थितीही तितकीच वाईट आहे. जितक्या सुविधा अधिक तितकी घराची किंमत अधिक असे गणित असेल, तर जिथे प्रदूषण अधिक वा हवेची गुणवत्ता म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स वाईट तिथे घरांच्या किमती कमीच असायला हव्यात की! हा विचार आपण करत नसलो तरी रिअल इस्टेट व्यवसायातील झिरोधा या बड्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनी सुरू केला आहे.

स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी विविध प्रयोग करणारे ब्रायन जॉनसन यांच्या एका ताज्या वक्तव्यानंतर ही बाब त्यांचा लक्षात आली. ब्रायन जॉनसन हे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील खूप मोठे नाव आहे. नितीन यांचे बंधू निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये मुलाखत द्यायला आलेले जॉनसन बंगळुरूमध्ये तोंडाला मास्क लावून बोलत होते आणि अचानक संभाषण थांबवून त्या स्टुडिओतून ते निघून गेले. इथे भयंकर प्रदूषण आहे, असा शेराही त्यांनी जाताना मारला. या घटनेची बरीच चर्चाही झाली. नितीन कामत यांच्या लक्षात आले की केवळ दिल्लीत नव्हे, तर बंगळुरूमध्येही प्रचंड प्रदूषण आहे आणि वांद्र्यात समुद्रासमोरील भागातही हवेचा दर्जा कमालीचा खराब असतो.

खराब व प्रदूषित हवेमुळे लोकांना श्वसनाचे आजार होतात आणि काहींना, तर कर्करोगही होतो, याचा उल्लेख कामत यांनी सोशल मीडियावर केला आहे. ते लिहितात की, वांद्रे समुद्रकिनारा वा बंगळुरूच्या जेपी नगरमध्ये हवेचा दर्जा खराब असूनही घरांच्या किमती चढ्या आहेत. पण, हवा व पाण्याचा दर्जा आणि घरांच्या किमती यांची सांगड घालणे आवश्यक आहे. जिथे दर्जा वाईट, तिथे घरांच्या किमती कमी असाव्यात आणि जिथे तो उत्तम आहे, तिथे लोकांनी राहायला यावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  नितीन कामत यांनी मांडलेला विचार प्रत्यक्षात येईल का कोणास ठाऊक, पण किमान आपण घर घेताना हा मुद्दा लक्षात घ्यायलाच हवा.

sanjeevsabade1@gmail.com