शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

काँग्रेसला लढावेच लागेल; राष्ट्रीय राजकारणात प्रबळ विरोधकाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 07:31 IST

उत्तर प्रदेशासह पाच राज्यांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. पाचपैकी पंजाब या एकमेव राज्यात काँग्रेसचे सरकार होते. उर्वरित चार राज्यांत ...

उत्तर प्रदेशासह पाच राज्यांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. पाचपैकी पंजाब या एकमेव राज्यात काँग्रेसचे सरकार होते. उर्वरित चार राज्यांत भाजपचे सरकार होते. भाजपने चारही राज्यांत विजय मिळवून सत्ता राखली. काँग्रेसकडे असलेले एकमेव पंजाब राज्यही या पक्षाला राखता आले नाही. यापेक्षा मोठा पराभव उत्तर प्रदेशात काँग्रेसचा झाला. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लढला होता. तरीही पक्षाला मागील निवडणुकीपेक्षा चार टक्के मते कमी मिळाली आणि केवळ दोन उमेदवार विजयी झाले. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसचे भवितव्य काय असणार आणि भाजप विरोधात राष्ट्रीय राजकारणात प्रबळ विरोधकाची भूमिका कोण घेणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

देशपातळीवर जेव्हा सार्वत्रिक निवडणुका होतात, त्यात बहुमतांनी सत्तेवर येणाऱ्या पक्षाला चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळत नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा आहे की, झालेल्या मतदानापैकी साठ टक्के मते विरोधकांना मिळालेली असतात. ती विविध पक्षांमध्ये विभागलेली असतात. राष्ट्रीय पातळीवर आणि सर्वच प्रदेशात ती एकत्रित एका पक्षाला मिळत नाहीत, म्हणून भाजपला पर्याय दिसत नाही. अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष बलवान आहेत. तेथे काँग्रेसला नगण्य स्थान आहे. १९८९ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला तेव्हापासून भाजप आपला विस्तार करण्यासाठी धडपड करतो आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, आदी राज्यांत काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळालीच नाही. परिणामी, बहुमतही मिळाले नाही. तरीदेखील १९९१, २००४ आणि २००९ पासून प्रत्येकी पाच वर्षे अशी पंधरा वर्षे देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार होते. या देशात काँग्रेसला आणि आता भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देऊ शकेल, असा राजकीय पक्ष उदयासच आला नाही.

जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर त्या पक्षाचा जन्म झाला होता, हे लक्षात असू द्या. भारतीय लोकशाहीने विविधतेने नटलेल्या देशाला एक ठेवण्यात  फार मोठी कामगिरी बजावली आहे. त्याचे श्रेय काँग्रेसशिवाय आजही कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या लोकशाही मूल्यांना बाजूला ठेवून हा देश चालविणे कठीण आहे. आभासी जनमानस तयार करून मते मिळविता येतील, सत्ताही मिळेल; पण त्या सत्तेचे बहुजन, बहुसंख्याक लोककल्याणकारी राज्य व्यवस्थेत रूपांतर करण्याचे आव्हान कायम राहते. ते तयार करण्यात सत्तारूढ पक्ष अपयशी ठरतो तेव्हा विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या सक्षम राष्ट्रीय पक्षाची गरज असते. राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या निवडणुकीमध्ये मते कमी मिळविली असतील; मात्र त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलेले प्रश्न खोटे, आभासी नव्हते, तर ते जीवन-मरणाचे मूलभूत प्रश्न होते. महाराष्ट्रात सत्ताधारी असताना काँग्रेसला अनेक दशके आव्हान निर्माण करणारा राजकीय पक्ष नव्हता. याचा अर्थ सरकारला जाब विचारणारा आवाजच नव्हता असे कधीच घडले नाही.

शेतकरी कामगार पक्षाला त्याचे श्रेय द्यावे लागेल. संख्येने कमी, पण गुणवत्तेने प्रबळ असणाऱ्या या पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी सरकारला लोककल्याणकारी धोरणांपासून बाजूला जाऊ देत नव्हते. काँग्रेसच्या धोरणांमुळे बदललेल्या आर्थिक धोरणातून अनेक निरुत्तरित प्रश्न आजही जनतेसमोर आहेत. त्यावर आवाज उठविणारा देशव्यापी पक्ष काँग्रेसच आहे. भाजपचा अनेकदा पराभव झाला होता, तरी तो पक्ष विरोधकांची भूमिका घेऊन लढत राहिला. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस पक्षाला खूप महत्त्व आहे. काही राज्यात प्रादेशिक पक्ष पर्याय म्हणून उभे राहिलेले असले तरी शेजारच्या राज्या-राज्यांत काँग्रेसचाच पर्याय आहे. गुजरातमध्ये काट्याची टक्कर कोणी दिली होती? राजस्थान आणि मध्य प्रदेशात सत्तांतर घडवून आणले होते. मणिपूर आणि गोव्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला होता.

लोकशाही संकेतानुसार तेथे सरकार स्थापन करण्याची संधी याच पक्षाला द्यायला हवी होती. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून या राज्यांत काँग्रेसला रोखण्यात आले. मध्य प्रदेश किंवा कर्नाटकात फोडाफोडीचे राजकारण करून मागील दाराने काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यात आले. पक्ष संघटन बळकट करणे, पर्यायी नेतृत्वाची फळी तयार करणे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकीय बळ देणे, सक्रिय नसलेल्यांना बाजूला करणे आणि जनतेचे प्रश्न घेऊन वारंवार रस्त्यावरची लढाई लढत राहणे ही गरज आहे. ती केवळ काँग्रेसची नाही, तर भारतीय लोकशाही व्यवस्थेसाठीचीही गरज आहे. त्यामुळे काँग्रेसला लढावेच लागेल!

टॅग्स :congressकाँग्रेस