शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बहुपक्षीय समतेच्या जुळणीकडे...

By किरण अग्रवाल | Updated: February 8, 2018 08:54 IST

समता प्रस्थापित होऊ शकली का, हा प्रश्न खरे तर तसा अनुत्तरितच आहे.

समतेचा ध्वज हाती घेऊन छगन भुजबळ यांनी गतकाळात देशभर जे मेळावे घेतले त्यातून ‘ओबीसीं’च्या एकीला बळ भलेही लाभले असेल; पण समता प्रस्थापित होऊ शकली का, हा प्रश्न खरे तर तसा अनुत्तरितच आहे. तथापि, सरकारकडून भुजबळांवर अन्याय केला जात असल्याच्या मुद्द्यावर चक्क बहुपक्षीय समता साधली जाताना दिसून येत असल्याने त्यामागील कारणमीमांसा होणे गरजेचे ठरून गेले आहे.

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. निरनिराळ्या चौकशांचा ससेमिरा लावून राज्य शासन भुजबळांच्या जामिनावर सुटकेच्या मार्गात अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. याचबाबतचा रोष व्यक्त करण्यासाठी मागे ऑक्टोबरमध्ये नाशकात विराट मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात सत्याग्रह आंदोलन केले गेले, तर आता ‘अन्याय पे चर्चा’ असा कार्यक्रम घडवून आणत ठिकठिकाणी विविध पक्षीयांना त्यात सहभागी करून घेतले जात आहे. स्थानिक पातळीवरील या सामीलकीखेरीज मनसेचे नेते राज ठाकरे व भाजपातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचीही यासंदर्भात भेट घेतली गेली. भुजबळ आणि माझे दु:ख एकसारखेच असल्याची भावना खडसे यांनी या भेटीत व्यक्त केल्याचे सांगितले जात असल्याने समदु:खींची समता म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. या सर्व भेटीतून राजकीय अभिनिवेशाच्या पलीकडले मतैक्य समोर येत असून, बदलत्या राजकीय संदर्भात त्यातून नवे संकेत प्रसृत होणेही स्वाभाविक ठरले आहे.

मुळात, भुजबळांमागे उभे असलेले सामान्य व खरे समर्थक कालही त्यांच्या पाठीशी होते व आजही आहेत. परंतु यासंबंधीच्या पहिल्या मोर्चात कुठेच न दिसलेल्या खुद्द राष्ट्रवादीचे नेते व पक्षांतर्गत विरोधकांसह भाजपा समर्थक आमदारही ‘मी भुजबळ’च्या टोप्या परिधान करून सत्याग्रह आंदोलनात उतरलेले दिसले तेव्हाच त्यांचा सहभाग भुजबळांसाठी की आगामी निवडणुकांतील मतांसाठी, असा प्रश्न उपस्थित होऊन गेला होता. त्यानंतर आता ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रमात काँग्रेस, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत जवळजवळ सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या अहमहमिकेने सहभागी होत असल्याचे पाहता, सामान्यजनांचे डोळे विस्फारले गेले आहेत. ही आश्चर्यकारकता यासाठी की, भुजबळांना तुरुंगात जावे लागल्यावर यातीलच अनेकांनी आनंद व्यक्त करीत राजकारणात स्वत:ची जागा शोधण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. परंतु भाजपाचा वारू असा उधळला की, अन्य पक्षीयांना राजकारणाच्या फेरमांडणीची गरज भासू लागलीच, शिवाय भाजपामध्ये अडगळीत पडलेल्यांनाही वेगळ्या वाटा खुणावू लागल्या. सुमारे दोन वर्षांनंतर भुजबळांवरील कथित अन्यायाची जाणीव संबंधितांना होण्यामागे हेच सूत्र असण्याची शक्यता नाकारता येऊ नये.

महत्त्वाचे म्हणजे, २०१२ मधील नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळवताना ‘मनसे’ने छगन भुजबळ यांनाच ‘टार्गेट’ केले होते. भुजबळांमुळे गुंडगिरी बोकाळली असून हे, म्हणजे भुजबळांचे पार्सल परत पाठवा असे आवाहन राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून केले होते. थेट मातब्बर नेत्यालाच शह देण्याची भाषा केली गेल्याने नाशिककरांनी त्यावेळी ‘मनसे’ला काहीशी जास्तीची पसंती दिली. त्यामुळे महापालिकेत मनसे सत्तेतही आली. पण त्यासाठी त्यांना पहिल्या अडीचकीच्या आवर्तनात भाजपाशी राजकीय घरोबा करावा लागला. अडीच वर्षांतच या दोघांत काडीमोड झाल्यावर मात्र राष्ट्रवादीचीच मदत घेऊन मनसेने सत्ता राखली होती. गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांचे ‘टार्गेट’ बदलले होते. भुजबळ कारागृहात व भाजपा फार्मात असल्याने टीकेच्या तोंडी भाजपाच होती. परंतु त्यांना रोखण्यात कुणाला यश आले नाही. आताही स्वबळाचे हाकारे झाले आहेतच. अशात ‘अन्याय पे चर्चा’ करण्यासाठी राज ठाकरे यांचीही भेट घेतली गेली. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा मुद्दा पुढे करीत त्यांनी याबाबत फारसा उत्साह दाखविला नाही हा भाग वेगळा; परंतु यानिमित्ताने राजकीय विरोधकांनाही सोबत घेऊ पाहण्याच्या प्रयत्नांमुळे राजकीय समतेचे नवे पर्व आकारास येण्याची शक्यता चर्चेत येऊन गेली आहे.

अर्थात, हा काळाचा महिमा म्हणायला हवा. कारण एकेकाळी गृह खाते सांभाळणाऱ्या भुजबळांकडे अन्य नेते त्यांच्या सहकाºयांना सोडविण्याच्या मदतीसाठी जात असत. आज भुजबळांच्या समर्थनार्थ अन्य पक्षीयांचे उंबरठे झिजविण्याची वेळ भुजबळ समर्थकांवर आली आहे. ‘अन्याय पे चर्चा’ हे सर्वपक्षीय अभियान असल्याचे सांगत अजून अन्य पक्षीयांनाही यासंदर्भात भेटले जाणार आहे. तेव्हा राजकारणात आता कुणालाच कशाचे वावडे राहिले नसल्याचे पाहता, भुजबळांवर राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या कथित अन्यायानिमित्त बहुपक्षीय समतेची नवी गुढी उभारण्याचे काम घडून येऊ पाहत असेल तर काय सांगावे? देशात एकपक्षीय व एकचालकानुवर्ती शासनव्यवस्था लादण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कसल्या का निमित्ताने होईना अशी बहुपक्षीय समतेची जुळणी घडून येणार असेल, तर ते राजकारणाच्या नवीन समीकरणांची चाहूल देणारेच म्हणता यावे.

टॅग्स :PoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेChagan Bhujbalछगन भुजबळEknath Khadaseएकनाथ खडसे