शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

आचरण

By admin | Updated: June 18, 2014 09:55 IST

हिंदू धर्मात आचाराला फार महत्त्व दिलेले आहे. आचार, विचार व उच्चार हे सर्व एकदुसऱ्यावर अवलंबून आहेत. माणसाचे विचार जसे असतात, त्याप्रमाणे त्याचे वागणे असते.

अध्यात्मब्रह्मलीन क्षीरसागरमहाराजहिंदू धर्मात आचाराला फार महत्त्व दिलेले आहे. आचार, विचार व उच्चार हे सर्व एकदुसऱ्यावर अवलंबून आहेत. माणसाचे विचार जसे असतात, त्याप्रमाणे त्याचे वागणे असते. या विश्वामध्ये सुष्टशक्ती व दुष्टशक्ती दोन्ही वास करून आहेत. दोन्हींचा संघर्ष नेहमीच चालू असतो. सुष्टशक्ती ही विधायक शक्ती, तर दुष्टशक्ती ही विनाशक शक्ती आहे. मनुष्य वाईट कृत्ये करण्यास फार लवकर प्रवृत्त होतो; कारण त्यात तत्काळ फायदा दिसत असतो. मनुष्याचा एकदा तोल गेला म्हणजे दुष्टशक्ती त्या मनुष्याचा ताबा घेते. त्याची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते. दुष्टशक्तीने ताबा घेतल्यावर, त्याला योग्य निर्णय घेता येत नाही. त्याच्या जीवनात, व्यवहारात प्रगती होत नाही. त्याला योग्य वेळी निर्णय घेता येत नाहीत. त्याच्या खाण्यापिण्यात ताळमेळ राहात नाही व निषिद्ध खाणे आवडते. त्यामुळे त्यांचा विकार बळावतो.दुष्टशक्तीपासून नेहमी लांब राहण्यासाठी किंवा त्यापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी सतत ईश्वर-स्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. सतत नामस्मरणाने एक प्रकारच्या विधायक शक्ती-लहरी निर्माण होऊन दुष्टशक्तींची पकड कमी कमी होत जाते. मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार येऊ लागतात. चांगले विचार स्थिरावण्यासाठी चांगल्या आचरणाची आवश्यकता आहे. आचरण म्हणजे केवळ चांगले वागणे नव्हे तर मनातले विचारदेखील शुद्ध व सात्त्विक असणे होय. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. प्रत्येकाला स्वत:चे दोष लक्षात येतात व मान्यही होतात. या दोषांतून मुक्त होण्याचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे व त्याप्रमाणे प्रयत्नाला लागले पाहिजे. चांगले आचार आणि विचार हे नेहमी संस्काराधिष्ठित असतात. चांगल्या आचारांपासून दूर नेणारे कार्यक्रम पाहू नयेत. पुस्तकांचे वाचन करताना धार्मिक पुस्तकांचे वाचन करणे केव्हाही चांगले. तारतम्याने विचार करून योग्य मित्र निवडावेत व त्यांना जवळ करावे. नेहमी चांगल्या विचारांच्या मित्रांच्या संगतीत राहावे म्हणजे वाईट ऐकण्याचा प्रसंग येणार नाही.एक नियम लक्षात ठेवावा, ‘प्रवृत्तीतून निवृत्ती येत असते.’ कुणीही व्यक्ती चिरकाल तरुण राहू शकत नाही. ती काही दिवसांनी वृद्ध होणारच. राजकारणी असो, उद्योगपती असो किंवा सामान्य व्यक्ती असो ती काही दिवसांनी म्हणणारच. ‘बस, आता पुरे झाले.’ परंतु, त्यांच्यापुढे आचरण करून प्रगती करता येणे अवघड होईल. कारण मानवी देहाला हळूहळूच शिकवावे लागते. म्हणूनच आतापासूनच शरीराला, मनाला, बुद्धीला फार ताण न देता आमच्या उपदेशाप्रमाणे आचरण ठेवावे.व्यवहारातले वागणे नम्रतेचे असावे. शुद्ध व सात्त्विक आहार असल्यास मनातदेखील शुद्ध व सात्त्विक विचार येतात. आपल्या वागण्यात बदल होण्यासाठी संतांचा सहवास महत्त्वाचा व उपयुक्त असतो. तुमच्या शुद्ध आचरणामुळे अथवा दृढ भाव निर्माण झाल्यामुळे तुमच्यावर ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा होते, त्या वेळेला विरुद्ध विचारांच्या व्यक्ती तुमच्यापासून आपोआप दूर होतात व तुमच्या प्रगतीचा मार्ग सोपा होतो.