शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

आचरण

By admin | Updated: June 18, 2014 09:55 IST

हिंदू धर्मात आचाराला फार महत्त्व दिलेले आहे. आचार, विचार व उच्चार हे सर्व एकदुसऱ्यावर अवलंबून आहेत. माणसाचे विचार जसे असतात, त्याप्रमाणे त्याचे वागणे असते.

अध्यात्मब्रह्मलीन क्षीरसागरमहाराजहिंदू धर्मात आचाराला फार महत्त्व दिलेले आहे. आचार, विचार व उच्चार हे सर्व एकदुसऱ्यावर अवलंबून आहेत. माणसाचे विचार जसे असतात, त्याप्रमाणे त्याचे वागणे असते. या विश्वामध्ये सुष्टशक्ती व दुष्टशक्ती दोन्ही वास करून आहेत. दोन्हींचा संघर्ष नेहमीच चालू असतो. सुष्टशक्ती ही विधायक शक्ती, तर दुष्टशक्ती ही विनाशक शक्ती आहे. मनुष्य वाईट कृत्ये करण्यास फार लवकर प्रवृत्त होतो; कारण त्यात तत्काळ फायदा दिसत असतो. मनुष्याचा एकदा तोल गेला म्हणजे दुष्टशक्ती त्या मनुष्याचा ताबा घेते. त्याची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते. दुष्टशक्तीने ताबा घेतल्यावर, त्याला योग्य निर्णय घेता येत नाही. त्याच्या जीवनात, व्यवहारात प्रगती होत नाही. त्याला योग्य वेळी निर्णय घेता येत नाहीत. त्याच्या खाण्यापिण्यात ताळमेळ राहात नाही व निषिद्ध खाणे आवडते. त्यामुळे त्यांचा विकार बळावतो.दुष्टशक्तीपासून नेहमी लांब राहण्यासाठी किंवा त्यापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी सतत ईश्वर-स्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. सतत नामस्मरणाने एक प्रकारच्या विधायक शक्ती-लहरी निर्माण होऊन दुष्टशक्तींची पकड कमी कमी होत जाते. मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार येऊ लागतात. चांगले विचार स्थिरावण्यासाठी चांगल्या आचरणाची आवश्यकता आहे. आचरण म्हणजे केवळ चांगले वागणे नव्हे तर मनातले विचारदेखील शुद्ध व सात्त्विक असणे होय. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. प्रत्येकाला स्वत:चे दोष लक्षात येतात व मान्यही होतात. या दोषांतून मुक्त होण्याचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे व त्याप्रमाणे प्रयत्नाला लागले पाहिजे. चांगले आचार आणि विचार हे नेहमी संस्काराधिष्ठित असतात. चांगल्या आचारांपासून दूर नेणारे कार्यक्रम पाहू नयेत. पुस्तकांचे वाचन करताना धार्मिक पुस्तकांचे वाचन करणे केव्हाही चांगले. तारतम्याने विचार करून योग्य मित्र निवडावेत व त्यांना जवळ करावे. नेहमी चांगल्या विचारांच्या मित्रांच्या संगतीत राहावे म्हणजे वाईट ऐकण्याचा प्रसंग येणार नाही.एक नियम लक्षात ठेवावा, ‘प्रवृत्तीतून निवृत्ती येत असते.’ कुणीही व्यक्ती चिरकाल तरुण राहू शकत नाही. ती काही दिवसांनी वृद्ध होणारच. राजकारणी असो, उद्योगपती असो किंवा सामान्य व्यक्ती असो ती काही दिवसांनी म्हणणारच. ‘बस, आता पुरे झाले.’ परंतु, त्यांच्यापुढे आचरण करून प्रगती करता येणे अवघड होईल. कारण मानवी देहाला हळूहळूच शिकवावे लागते. म्हणूनच आतापासूनच शरीराला, मनाला, बुद्धीला फार ताण न देता आमच्या उपदेशाप्रमाणे आचरण ठेवावे.व्यवहारातले वागणे नम्रतेचे असावे. शुद्ध व सात्त्विक आहार असल्यास मनातदेखील शुद्ध व सात्त्विक विचार येतात. आपल्या वागण्यात बदल होण्यासाठी संतांचा सहवास महत्त्वाचा व उपयुक्त असतो. तुमच्या शुद्ध आचरणामुळे अथवा दृढ भाव निर्माण झाल्यामुळे तुमच्यावर ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा होते, त्या वेळेला विरुद्ध विचारांच्या व्यक्ती तुमच्यापासून आपोआप दूर होतात व तुमच्या प्रगतीचा मार्ग सोपा होतो.