शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणाची गुंतागुंत आणि उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 02:54 IST

भारत देशाच्या आद्य संस्कृती, समाजव्यवस्था आणि वैभवशाली इतिहासाला जन्म देणाऱ्या निमभटक्या पशुपालक आदिम-आदिवासी असलेल्या धनगर जमातीचा सन १९५६ मध्ये इंग्रजी शब्दोच्चारानुसार ‘धनगड’ या शब्दाने अनुसूचित जमातीच्या यादीत ३६व्या क्रमांकावर समावेश करण्यात आला.

- चंद्रशेखर सोनवणे(समन्वयक, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच)भारत देशाच्या आद्य संस्कृती, समाजव्यवस्था आणि वैभवशाली इतिहासाला जन्म देणाऱ्या निमभटक्या पशुपालक आदिम-आदिवासी असलेल्या धनगर जमातीचा सन १९५६ मध्ये इंग्रजी शब्दोच्चारानुसार ‘धनगड’ या शब्दाने अनुसूचित जमातीच्या यादीत ३६व्या क्रमांकावर समावेश करण्यात आला. १९५६च्या राष्ट्रपती अध्यादेशात अधिसूचित केलेल्या अनुसूचित जाती-जमातींच्या यादीतील अनेक जाती-जमातींच्या नावांच्या स्पेलिंग्जमधील चुका महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या टीमला संशोधनातून आढळून आल्या आहेत. उदाहरणार्थ मुंबई प्रांतातील काकाया, कांकया या जाती-जमातीचे खरे नाव कक्कय्या-कांकय्या आहे. म्हैसूर प्रांतातील कटताई व सिलिकेयथासस जाती-जमातीचे खरे नाव कटाई आणि सिललेकायथास आहे. वेस्ट बंगाल व मुंबई प्रांतातील धनगड जमातींचे खरे नाव ‘धनगर’ आहे. इत्यादी.मंचाच्या संशोधनातून त्याबाबतच्या सखोल पुराव्यावरून असे सिद्ध झाले होते की, महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत अनुसूचित जमातीच्या यादीत ३६व्या क्रमांकावर विनिर्दिष्ट केलेली जमात ओरान, धनगड नसून ओरान, धनगर ही जमात आहे. धनगड नावाची जमात महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात कुठेही अस्तित्वात नाही. याबाबतचे १८८१ पासून ते १९५१चे जनगणना अहवाल तपासले असता ‘धनगड’ कुठेही आढळत नाहीत. सगळीकडे ‘धनगर’ आढळतात. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायत अधिनियम (१९५९चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) खंड (१८) व (१९) अंतर्गत समाविष्ट अनुसूचित जमातीच्या यादीत ३६व्या क्रमांकावर ओरान, धनगर जमातींची नोंद आहे. धनगर जमात आजही पशुपालक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील आजवरच्या कोणत्याही राज्य सरकारने धनगर जमातीच्या संवैधानिक हक्काची मागणी पूर्ण केलेली नाही. सर्वच सरकारे धनगरांचा केवळ मतांसाठी उपयोग करून घेऊन त्यांना वाºयावर सोडत आले आहेत. मुकी मेंढरे... हाका कशीही... याच पद्धतीने सध्याचे निष्ठुर महायुतीचे सरकारदेखील धनगरांसोबत वागत आहे.२0१४च्या बारामतीच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या वेळी न बोलावता सामोरे जाताना खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी धनगर-धनगडचा प्रश्न मला माहीत आहे. आम्हाला निवडून द्या. पहिल्याच मंत्रिमंडळात आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यामुळेच जमातीने भाजपाच्या पारड्यात एकगठ्ठा मते टाकून सत्तेवर बसविले. सरकार स्थापन होऊन फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळात आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला तर नाहीच; उलट यासाठी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसचा अहवाल आवश्यक असल्याचे सांगत घटनात्मक पातळीवर कसलीही मान्यता नसलेल्या स्वायत्त संस्थेला त्यांनी सर्वेक्षण करण्याचे कंत्राटदिले.आता राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सकडून धनगर आरक्षणासंदर्भातील गुणवत्ता अभ्यास तसेच मुख्य अभ्यास आणि नमुना सर्वेक्षणाचा अभ्यासपूर्ण अहवाल आॅगस्टखेरीसच मागविला आहे. त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करून केंद्र सरकारकडे धनगर जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे समजते. (धनगरांची अनुसूचित जमातीच्या यादीत नव्याने समावेशाची मागणीच नाही.) धनगर जमातीच्या सर्वच पुढा-यांना आजवर आणि आताही अत्यंत साधी सोपी प्रक्रिया पार पाडली की काम होऊन जाईल असे वाटते. प्रक्रिया काय? तर राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करायची आणि केंद्राने त्याला मंजुरी देऊन आदेशित केले की काम संपले हीच प्रक्रिया राज्यात बहुप्रसिद्ध आहे.विविध राज्यांनी यापूर्वी केंद्राकडे पाठविलेल्या जुन्या २८३ शिफारशी धूळ खात पडलेल्या आहेत. त्यातील काही शिफारशी या २0 वर्षे इतक्या जुन्या आहेत. २0१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस सरकार शिफारस करून आपले हात वर करू शकते. स्वत:ची राजकीय सोय करून घेऊ शकते. अशा वेळी काय करायचे, याचा गंभीरपणे धनगरांनी विचार केला पाहिजे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील धनगरांच्या घटनादत्त आरक्षणाच्या मूलभूत प्रश्नाकडे सामाजिक परिप्रेक्षातून न बघता या प्रश्नावर राजकारण करीत आहेत असे ध्यानात आल्याबरोबर महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबईने २६ आॅक्टोबर २0१६ रोजी शक्तिशाली जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. सरकारच्या प्रतिकूलतेचा वा नकारात्मकतेचा प्रबोधन मंचाच्या आरक्षण याचिकेवर काहीएक परिणाम होणार नाही. केरळमधील पलुवन व चममन, उत्तर प्रदेशातील धनगर आणि महाराष्ट्रातील माना, गोवरी जमातींप्र्रमाणेच धनगरांना आरक्षणाचे लाभ न्यायालयातूनच मिळणार यात तिळमात्र शंका नाही.

टॅग्स :reservationआरक्षण