शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सीताराम येचुरींना रोखण्याचा कम्युनिस्टांचा नादानपणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 08:15 IST

येचुरी गेली किमान १० वर्षे संसदेत काँग्रेसबरोबर काम करीत आहेत व त्यांची साथसंगत विरोधी पक्षाची ताकद वाढविणारी ठरली.

- राजू नायकमार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सांसद व बाहेरील एक सडेतोड नेते सीताराम येचुरी यांची राज्यसभेतील अनुपस्थिती आता पुढच्या काही काळात आपल्याला तीव्रतेने जाणवणार आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत पश्चिम बंगालमधून काँग्रेसचा पाठिंबा घेऊन त्यांना राज्यसभेवर पाठविण्यास नकार दर्शविण्यात आला. जो पक्ष तृणमूल काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या साहाय्याने सध्या बंगालमध्ये भाजपाविरोधात तीव्र लढे उभारतो आहे, तो राज्यसभेसाठी काँग्रेसची मदत घेण्यास प्रतिकूलता व्यक्त करतो आहे, ही तत्त्वनिष्ठेच्या तकलादूपणाची जशी गोष्ट आहे तशीच शहाणपणाचीही नाही, हे स्पष्टपणे सांगावेच लागेल. लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेसपेक्षाही कम्युनिस्ट पक्षाकडे देशात तत्त्वांवर आधारित जनमत तयार करणे व भाजपाविरोधात लढताना विरोधी पक्षांची प्रखर शक्ती उभी राहणे याबाबत अधिक जबाबदारी आली आहे. दुस-या बाजूला पश्चिम बंगालमध्ये आता नगरपालिकांच्या निवडणुकाही निकट येऊन ठेपल्या आहेत. भाजपाने या राज्यात विशेषत: सीमावर्ती भागात ज्या पद्धतीने हातपाय पसरविले आहेत तो नक्कीच विरोधी पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे.

सीमाभागात अल्पसंख्याकांविरोधात जनमत धुमसतेय याबद्दल शंका नाही; परंतु त्याच मुद्द्यावर जहालवाद निर्माण करून देशात असहिष्णू वातावरण तयार करीत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नांना शह देण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष काही एकटा लढू शकणार नाही. त्यासाठी त्या पक्षाला नक्कीच काँग्रेसची मदत मिळाली तर या लढ्याची ताकद वाढली असती. या संदर्भातील पार्श्वभूमी अशी की सीताराम येचुरी यांना काँग्रेस पक्षाने स्वत:हूनच मदत देऊ केली होती. येचुरी गेली किमान १० वर्षे संसदेत काँग्रेसबरोबर काम करीत आहेत व त्यांची साथसंगत विरोधी पक्षाची ताकद वाढविणारी ठरली. येचुरी यांचे राजकीय कौशल्य, बुद्धिमत्ता व मुत्सद्दीपणा यामुळे विरोधी पक्षांना सतत कार्यरत ठेवण्यात व संयुक्त हल्ले चढविण्यात नेहमी फायदा होत आला. स्वत: काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर व्यूहरचना तयार करताना येचुरी दिसले व काळाचीही तीच गरज आहे.
भाजपा जेव्हा विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी सर्व आयुधांचा वापर करते, तेव्हा विरोधकांमधील ऐक्य कायम राखणे व त्यासाठी सतत कार्यक्रम आखणे हाही युद्धनीतीचाच भाग बनतो. येचुरींसारखे नेते त्यासाठी सतत दारूगोळा पुरवत आले व त्यांची प्रतिमाही या लढय़ाला देशव्यापी फायदेशीर ठरत आली आहे. आता येचुरींना राज्यसभेवर जाण्यापासून रोखणे म्हणजे विरोधी पक्षांची मोहीम निश्चितच कमकुवत बनविणे! २०१९च्या लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला १६ टक्के मते गमवावी लागून त्यांचा एकही सदस्य विजयी झालेला नाही. ही नामुष्की स्पष्ट करते की हा पक्ष वास्तवापासून वेगाने दूर सरकू लागला आहे. केवळ राजकीय पराभवच नव्हे तर उद्धटपणा आणि राजकीय मूर्खपणाने त्याला ग्रासले आहे. येचुरी यांना राज्यसभेवर पाठविण्यास अपयश येणे याचा अर्थच कम्युनिस्ट पक्ष देशातील राजकीय वास्तवापासूनही दूर सरकला असा निघणार असून नागरिकत्व कायद्याविरोधात सत्ताधारी पक्षाला रोखण्यातील फोलपणा त्यामुळे आणखीनच सामोरे येणार आहे व विरोधी पक्षांबाबत लोकांचा भ्रमनिरास आणखी गडद होईल.