शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सीताराम येचुरींना रोखण्याचा कम्युनिस्टांचा नादानपणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 08:15 IST

येचुरी गेली किमान १० वर्षे संसदेत काँग्रेसबरोबर काम करीत आहेत व त्यांची साथसंगत विरोधी पक्षाची ताकद वाढविणारी ठरली.

- राजू नायकमार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सांसद व बाहेरील एक सडेतोड नेते सीताराम येचुरी यांची राज्यसभेतील अनुपस्थिती आता पुढच्या काही काळात आपल्याला तीव्रतेने जाणवणार आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत पश्चिम बंगालमधून काँग्रेसचा पाठिंबा घेऊन त्यांना राज्यसभेवर पाठविण्यास नकार दर्शविण्यात आला. जो पक्ष तृणमूल काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या साहाय्याने सध्या बंगालमध्ये भाजपाविरोधात तीव्र लढे उभारतो आहे, तो राज्यसभेसाठी काँग्रेसची मदत घेण्यास प्रतिकूलता व्यक्त करतो आहे, ही तत्त्वनिष्ठेच्या तकलादूपणाची जशी गोष्ट आहे तशीच शहाणपणाचीही नाही, हे स्पष्टपणे सांगावेच लागेल. लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेसपेक्षाही कम्युनिस्ट पक्षाकडे देशात तत्त्वांवर आधारित जनमत तयार करणे व भाजपाविरोधात लढताना विरोधी पक्षांची प्रखर शक्ती उभी राहणे याबाबत अधिक जबाबदारी आली आहे. दुस-या बाजूला पश्चिम बंगालमध्ये आता नगरपालिकांच्या निवडणुकाही निकट येऊन ठेपल्या आहेत. भाजपाने या राज्यात विशेषत: सीमावर्ती भागात ज्या पद्धतीने हातपाय पसरविले आहेत तो नक्कीच विरोधी पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे.

सीमाभागात अल्पसंख्याकांविरोधात जनमत धुमसतेय याबद्दल शंका नाही; परंतु त्याच मुद्द्यावर जहालवाद निर्माण करून देशात असहिष्णू वातावरण तयार करीत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नांना शह देण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष काही एकटा लढू शकणार नाही. त्यासाठी त्या पक्षाला नक्कीच काँग्रेसची मदत मिळाली तर या लढ्याची ताकद वाढली असती. या संदर्भातील पार्श्वभूमी अशी की सीताराम येचुरी यांना काँग्रेस पक्षाने स्वत:हूनच मदत देऊ केली होती. येचुरी गेली किमान १० वर्षे संसदेत काँग्रेसबरोबर काम करीत आहेत व त्यांची साथसंगत विरोधी पक्षाची ताकद वाढविणारी ठरली. येचुरी यांचे राजकीय कौशल्य, बुद्धिमत्ता व मुत्सद्दीपणा यामुळे विरोधी पक्षांना सतत कार्यरत ठेवण्यात व संयुक्त हल्ले चढविण्यात नेहमी फायदा होत आला. स्वत: काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर व्यूहरचना तयार करताना येचुरी दिसले व काळाचीही तीच गरज आहे.
भाजपा जेव्हा विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी सर्व आयुधांचा वापर करते, तेव्हा विरोधकांमधील ऐक्य कायम राखणे व त्यासाठी सतत कार्यक्रम आखणे हाही युद्धनीतीचाच भाग बनतो. येचुरींसारखे नेते त्यासाठी सतत दारूगोळा पुरवत आले व त्यांची प्रतिमाही या लढय़ाला देशव्यापी फायदेशीर ठरत आली आहे. आता येचुरींना राज्यसभेवर जाण्यापासून रोखणे म्हणजे विरोधी पक्षांची मोहीम निश्चितच कमकुवत बनविणे! २०१९च्या लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला १६ टक्के मते गमवावी लागून त्यांचा एकही सदस्य विजयी झालेला नाही. ही नामुष्की स्पष्ट करते की हा पक्ष वास्तवापासून वेगाने दूर सरकू लागला आहे. केवळ राजकीय पराभवच नव्हे तर उद्धटपणा आणि राजकीय मूर्खपणाने त्याला ग्रासले आहे. येचुरी यांना राज्यसभेवर पाठविण्यास अपयश येणे याचा अर्थच कम्युनिस्ट पक्ष देशातील राजकीय वास्तवापासूनही दूर सरकला असा निघणार असून नागरिकत्व कायद्याविरोधात सत्ताधारी पक्षाला रोखण्यातील फोलपणा त्यामुळे आणखीनच सामोरे येणार आहे व विरोधी पक्षांबाबत लोकांचा भ्रमनिरास आणखी गडद होईल.